शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

अपेक्षित प्रमाणाच्या ६३ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:49 IST

मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असली तरी अपेक्षित पावसाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमीच झाला आहे. २७ जुलैपर्यंत ६३७.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ४०२.१ मिमी पाऊस पडला आहे.

ठळक मुद्देतलाव भरलेच नाही। १ जूनपासून २७ जुलैपर्यंत ४०२ मिमी पाऊस पडल्याची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असली तरी अपेक्षित पावसाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमीच झाला आहे. २७ जुलैपर्यंत ६३७.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ४०२.१ मिमी पाऊस पडला आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला आहे. अगदी सुरुवातीला काही दिवस पाऊस झाला नाही. त्यानंतर सतत १० दिवस पाऊस पडला. त्यामुळे पेरण्या व धानाचे पऱ्हे टाकण्याचे काम थांबले होते. त्यानंतर पावसाने सुमारे १५ दिवस दडी मारली होती. धानाचे पऱ्हे व इतर पिके पावसाअभावी करपण्यास सुरुवात झाली होती. सुदैवाने पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने धानाचे पऱ्हे व इतर पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तरीही अपेक्षित पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात पाऊस कमी प्रमाणातच झाला आहे. १ जून ते २७ जुलै पर्यंत ६३७.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ४०२.१ मिमी एवढाच पाऊस पडला. अपेक्षित पावसाच्या यावर्षी पडलेल्या पावसाची टक्केवारी ६३ एवढी आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने तलाव, बोड्यांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला नाही. त्यामुळे धानपीक उत्पादक शेतकरी अजुनही चिंतेत आहे.धान पिकाला शेवटपर्यंत पाण्याची गरज भासते. त्यामुळे तलाव, बोड्या न भरल्यास सिंचनाची अडचण जाणार आहे.चामोर्शी तालुक्यात सर्वात कमी पाऊस१२ तालुक्यांपैकी चामोर्शी तालुक्यात यावर्षी सर्वात कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या तालुक्यात यावर्षी २७ जुलैपर्यंत केवळ २५२.७ मिमी पाऊस पडला आहे. भामरागड तालुक्यात सर्वाधिक ५५८.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गडचिरोली तालुक्यात ३७१.४ मिमी, धानोरा ४३८ मिमी, मुलचेरा ३०७ मिमी, देसाईगंज ६६७ मिमी, आरमोरी ४१७ मिमी, कुरखेडा ४४२ मिमी, कोरची ४६३ मिमी, अहेरी ४४५ मिमी, सिरोंचा ३१७ मिमी, एटापल्ली ४४५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वच तालुक्यांमध्ये अपेक्षित पावसाच्या कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे, चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र याच तालुक्यात कमी पाऊस झाला आहे.वार्षिक सरासरीच्या २९ टक्के पडला पाऊसगडचिरोली जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी १३५४.७ मिमी पाऊस पडते. यावर्षी २७ जुलैपर्यंत ६३७.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. एकूण वार्षिक सरासरीच्या केवळ २९.७ मिमी पाऊस झाला आहे. सुमारे ७० टक्के पाऊस अजून पडणे बाकी आहे. विशेषत: जुलै, आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस पडत असल्याचा अनुभव आहे. मात्र यावर्षी जुलै महिन्यातील बहुतांश दिवस कोरडे गेले. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात किती पाऊस पडते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पुढील महिन्यात पाऊस न झाल्यास धान पिकाला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे.

टॅग्स :Rainपाऊस