शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षित प्रमाणाच्या ६३ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:49 IST

मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असली तरी अपेक्षित पावसाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमीच झाला आहे. २७ जुलैपर्यंत ६३७.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ४०२.१ मिमी पाऊस पडला आहे.

ठळक मुद्देतलाव भरलेच नाही। १ जूनपासून २७ जुलैपर्यंत ४०२ मिमी पाऊस पडल्याची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असली तरी अपेक्षित पावसाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमीच झाला आहे. २७ जुलैपर्यंत ६३७.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ४०२.१ मिमी पाऊस पडला आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला आहे. अगदी सुरुवातीला काही दिवस पाऊस झाला नाही. त्यानंतर सतत १० दिवस पाऊस पडला. त्यामुळे पेरण्या व धानाचे पऱ्हे टाकण्याचे काम थांबले होते. त्यानंतर पावसाने सुमारे १५ दिवस दडी मारली होती. धानाचे पऱ्हे व इतर पिके पावसाअभावी करपण्यास सुरुवात झाली होती. सुदैवाने पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने धानाचे पऱ्हे व इतर पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तरीही अपेक्षित पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात पाऊस कमी प्रमाणातच झाला आहे. १ जून ते २७ जुलै पर्यंत ६३७.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ४०२.१ मिमी एवढाच पाऊस पडला. अपेक्षित पावसाच्या यावर्षी पडलेल्या पावसाची टक्केवारी ६३ एवढी आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने तलाव, बोड्यांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला नाही. त्यामुळे धानपीक उत्पादक शेतकरी अजुनही चिंतेत आहे.धान पिकाला शेवटपर्यंत पाण्याची गरज भासते. त्यामुळे तलाव, बोड्या न भरल्यास सिंचनाची अडचण जाणार आहे.चामोर्शी तालुक्यात सर्वात कमी पाऊस१२ तालुक्यांपैकी चामोर्शी तालुक्यात यावर्षी सर्वात कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या तालुक्यात यावर्षी २७ जुलैपर्यंत केवळ २५२.७ मिमी पाऊस पडला आहे. भामरागड तालुक्यात सर्वाधिक ५५८.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गडचिरोली तालुक्यात ३७१.४ मिमी, धानोरा ४३८ मिमी, मुलचेरा ३०७ मिमी, देसाईगंज ६६७ मिमी, आरमोरी ४१७ मिमी, कुरखेडा ४४२ मिमी, कोरची ४६३ मिमी, अहेरी ४४५ मिमी, सिरोंचा ३१७ मिमी, एटापल्ली ४४५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वच तालुक्यांमध्ये अपेक्षित पावसाच्या कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे, चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र याच तालुक्यात कमी पाऊस झाला आहे.वार्षिक सरासरीच्या २९ टक्के पडला पाऊसगडचिरोली जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी १३५४.७ मिमी पाऊस पडते. यावर्षी २७ जुलैपर्यंत ६३७.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. एकूण वार्षिक सरासरीच्या केवळ २९.७ मिमी पाऊस झाला आहे. सुमारे ७० टक्के पाऊस अजून पडणे बाकी आहे. विशेषत: जुलै, आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस पडत असल्याचा अनुभव आहे. मात्र यावर्षी जुलै महिन्यातील बहुतांश दिवस कोरडे गेले. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात किती पाऊस पडते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पुढील महिन्यात पाऊस न झाल्यास धान पिकाला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे.

टॅग्स :Rainपाऊस