शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

रोहयोतून पाच लाख मनुष्य दिवस रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:19 IST

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ५ लाख १८ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वाधिक रोजगार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्दे१ लाख ७८ हजार जॉब कार्डधारक : एप्रिलपासून २ हजार १९१ कुटुंबांना दिले १०० दिवसांचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ५ लाख १८ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वाधिक रोजगार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे.गडचिरोली जिल्ह्यात शेती व्यतिरिक्त रोजगाराचे साधन नाही. सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने शेतीतही बारमाही रोजगार मिळत नाही. केवळ दोन ते तीन महिनेच रोजगार उपलब्ध होते. प्रती शेतकरी जमीनधारण क्षमता सुध्दा कमी असल्याने शेतकऱ्यांनाही मोलमजुरी करावीच लागते. इतर रोजगारांचे साधन उपलब्ध नसल्याने धानाचा हंगाम संपल्याबरोबर शेतकरी रोहयोच्या कामांची मागणी करतात. जवळपास चार ते पाच महिने रोहयोची कामे चालत असल्याने यातून मजुरांना रोजगार उपलब्ध होते.गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ७८ हजार जॉब कार्ड आहेत. त्यातील १ लाख २२ हजार जॉबकार्डधारक अ‍ॅक्टिव्ह आहेत. सदर मजूर वेळोवेळी रोजगाराची मागणी करतात. धानाचा हंगाम संपल्याबरोबर रोहयो कामांची मागणी होत असल्याची बाब प्रशासनाला माहित असल्याने आधीच कामांना मंजुरी देऊन रोजगाराची मागणी झाल्याबरोबर काम उपलब्ध करून दिले जाते. रोहयोच्या माध्यमातून प्रामुख्याने मजगी, शेततळे, विहिरी, तलाव, बोड्यांची दुरूस्ती, पांदन रस्त्यांची निर्मिती आदी कामे केली जातात. ही कामे पावसाळ्यानंतरच सुरूवात होतात. धानाचे पीक निघाल्यानंतर मजगीची कामे सुरू होतात. आता धानपीक निघाले असल्याने रोहयोची कामे करण्यास जमीन उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कामाची मागणी होताच काम उपलब्ध करून दिले जात आहे.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नियमानुसार प्रत्येक कुटुंबाला वर्षभरातून किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून द्यावा लागतो. १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला नसताना एखाद्या मजुराने कामाची मागणी केल्यास व काम उपलब्ध नसल्यास बेरोजगारी भत्ता सुध्दा द्यावा लागतो. गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ९९१ कुटुंबांना यावर्षीच्या आर्थिक वर्षात १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. २०१७-१८ या वर्षात ८ हजार ६७६, २०१६-१७ या वर्षात ७ हजार ६४७ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला होता. २०१५-१६ मध्ये सर्वाधिक १५ हजार ८३० कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला.कामाची मागणी वाढलीधानाचे पीक निघाल्याने आता ग्रामीण व दुर्गम भागातील मजुरांना रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे कामाची मागणी वाढली आहे. तेंदूपत्त्याचा हंगाम सुरू होईपर्यंत मजूर आता रोहयो कामांवर राहणार आहेत. रोहयोच्यामाध्यमातून विशेष करून मजगीची कामे केली जात असल्याने धानाच्या बांध्या आता रिकाम्या झाल्याने रोहयोची कामे करण्यास प्रशासनालाही सोयीचे झाले आहे. यावर्षी काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने रोहयो कामांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. गचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोहयोच्या कामांची मागणी होत असल्याने त्यानुसार प्रशासन नियोजन करते.

टॅग्स :jobनोकरी