शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

रोहयोतून पाच लाख मनुष्य दिवस रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:19 IST

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ५ लाख १८ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वाधिक रोजगार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्दे१ लाख ७८ हजार जॉब कार्डधारक : एप्रिलपासून २ हजार १९१ कुटुंबांना दिले १०० दिवसांचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ५ लाख १८ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वाधिक रोजगार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे.गडचिरोली जिल्ह्यात शेती व्यतिरिक्त रोजगाराचे साधन नाही. सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने शेतीतही बारमाही रोजगार मिळत नाही. केवळ दोन ते तीन महिनेच रोजगार उपलब्ध होते. प्रती शेतकरी जमीनधारण क्षमता सुध्दा कमी असल्याने शेतकऱ्यांनाही मोलमजुरी करावीच लागते. इतर रोजगारांचे साधन उपलब्ध नसल्याने धानाचा हंगाम संपल्याबरोबर शेतकरी रोहयोच्या कामांची मागणी करतात. जवळपास चार ते पाच महिने रोहयोची कामे चालत असल्याने यातून मजुरांना रोजगार उपलब्ध होते.गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ७८ हजार जॉब कार्ड आहेत. त्यातील १ लाख २२ हजार जॉबकार्डधारक अ‍ॅक्टिव्ह आहेत. सदर मजूर वेळोवेळी रोजगाराची मागणी करतात. धानाचा हंगाम संपल्याबरोबर रोहयो कामांची मागणी होत असल्याची बाब प्रशासनाला माहित असल्याने आधीच कामांना मंजुरी देऊन रोजगाराची मागणी झाल्याबरोबर काम उपलब्ध करून दिले जाते. रोहयोच्या माध्यमातून प्रामुख्याने मजगी, शेततळे, विहिरी, तलाव, बोड्यांची दुरूस्ती, पांदन रस्त्यांची निर्मिती आदी कामे केली जातात. ही कामे पावसाळ्यानंतरच सुरूवात होतात. धानाचे पीक निघाल्यानंतर मजगीची कामे सुरू होतात. आता धानपीक निघाले असल्याने रोहयोची कामे करण्यास जमीन उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कामाची मागणी होताच काम उपलब्ध करून दिले जात आहे.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नियमानुसार प्रत्येक कुटुंबाला वर्षभरातून किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून द्यावा लागतो. १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला नसताना एखाद्या मजुराने कामाची मागणी केल्यास व काम उपलब्ध नसल्यास बेरोजगारी भत्ता सुध्दा द्यावा लागतो. गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ९९१ कुटुंबांना यावर्षीच्या आर्थिक वर्षात १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. २०१७-१८ या वर्षात ८ हजार ६७६, २०१६-१७ या वर्षात ७ हजार ६४७ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला होता. २०१५-१६ मध्ये सर्वाधिक १५ हजार ८३० कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला.कामाची मागणी वाढलीधानाचे पीक निघाल्याने आता ग्रामीण व दुर्गम भागातील मजुरांना रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे कामाची मागणी वाढली आहे. तेंदूपत्त्याचा हंगाम सुरू होईपर्यंत मजूर आता रोहयो कामांवर राहणार आहेत. रोहयोच्यामाध्यमातून विशेष करून मजगीची कामे केली जात असल्याने धानाच्या बांध्या आता रिकाम्या झाल्याने रोहयोची कामे करण्यास प्रशासनालाही सोयीचे झाले आहे. यावर्षी काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने रोहयो कामांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. गचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोहयोच्या कामांची मागणी होत असल्याने त्यानुसार प्रशासन नियोजन करते.

टॅग्स :jobनोकरी