शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रोहयोतून पाच लाख मनुष्य दिवस रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:19 IST

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ५ लाख १८ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वाधिक रोजगार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्दे१ लाख ७८ हजार जॉब कार्डधारक : एप्रिलपासून २ हजार १९१ कुटुंबांना दिले १०० दिवसांचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ५ लाख १८ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वाधिक रोजगार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे.गडचिरोली जिल्ह्यात शेती व्यतिरिक्त रोजगाराचे साधन नाही. सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने शेतीतही बारमाही रोजगार मिळत नाही. केवळ दोन ते तीन महिनेच रोजगार उपलब्ध होते. प्रती शेतकरी जमीनधारण क्षमता सुध्दा कमी असल्याने शेतकऱ्यांनाही मोलमजुरी करावीच लागते. इतर रोजगारांचे साधन उपलब्ध नसल्याने धानाचा हंगाम संपल्याबरोबर शेतकरी रोहयोच्या कामांची मागणी करतात. जवळपास चार ते पाच महिने रोहयोची कामे चालत असल्याने यातून मजुरांना रोजगार उपलब्ध होते.गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ७८ हजार जॉब कार्ड आहेत. त्यातील १ लाख २२ हजार जॉबकार्डधारक अ‍ॅक्टिव्ह आहेत. सदर मजूर वेळोवेळी रोजगाराची मागणी करतात. धानाचा हंगाम संपल्याबरोबर रोहयो कामांची मागणी होत असल्याची बाब प्रशासनाला माहित असल्याने आधीच कामांना मंजुरी देऊन रोजगाराची मागणी झाल्याबरोबर काम उपलब्ध करून दिले जाते. रोहयोच्या माध्यमातून प्रामुख्याने मजगी, शेततळे, विहिरी, तलाव, बोड्यांची दुरूस्ती, पांदन रस्त्यांची निर्मिती आदी कामे केली जातात. ही कामे पावसाळ्यानंतरच सुरूवात होतात. धानाचे पीक निघाल्यानंतर मजगीची कामे सुरू होतात. आता धानपीक निघाले असल्याने रोहयोची कामे करण्यास जमीन उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कामाची मागणी होताच काम उपलब्ध करून दिले जात आहे.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नियमानुसार प्रत्येक कुटुंबाला वर्षभरातून किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून द्यावा लागतो. १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला नसताना एखाद्या मजुराने कामाची मागणी केल्यास व काम उपलब्ध नसल्यास बेरोजगारी भत्ता सुध्दा द्यावा लागतो. गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ९९१ कुटुंबांना यावर्षीच्या आर्थिक वर्षात १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. २०१७-१८ या वर्षात ८ हजार ६७६, २०१६-१७ या वर्षात ७ हजार ६४७ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला होता. २०१५-१६ मध्ये सर्वाधिक १५ हजार ८३० कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला.कामाची मागणी वाढलीधानाचे पीक निघाल्याने आता ग्रामीण व दुर्गम भागातील मजुरांना रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे कामाची मागणी वाढली आहे. तेंदूपत्त्याचा हंगाम सुरू होईपर्यंत मजूर आता रोहयो कामांवर राहणार आहेत. रोहयोच्यामाध्यमातून विशेष करून मजगीची कामे केली जात असल्याने धानाच्या बांध्या आता रिकाम्या झाल्याने रोहयोची कामे करण्यास प्रशासनालाही सोयीचे झाले आहे. यावर्षी काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने रोहयो कामांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. गचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोहयोच्या कामांची मागणी होत असल्याने त्यानुसार प्रशासन नियोजन करते.

टॅग्स :jobनोकरी