शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

४६ बंगाली शाळा चालताहेत पुस्तकांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:44 IST

चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात बंगाली माध्यमाच्या एकूण ४६ शाळा आहेत.

शिक्षण विभाग म्हणते, प्रिंटिंग सुरू : ३ हजार १५० विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जिल्हा परिषदेचा खेळलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात बंगाली माध्यमाच्या एकूण ४६ शाळा आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पुरविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. शाळा सुरू होऊन २० दिवसांचा कालावधी उलटला तरी अजूनपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचली नाहीत. याबाबत पालकांनी जिल्हा परिषदेकडे विचारणा केली असता, पाठ्यपुस्तकांची प्रिंटिंग सुरू आहे, असे उत्तर जिल्हा परिषदेमार्फत दिले जात आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिवाळीनंतर उपलब्ध करून देणार काय, असा उपहासात्मक प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. मुलचेरा व चामोर्शी तालुक्यात बंगाली समाज वास्तव्यास आहे. या नागरिकांची मातृभाषा बंगाली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण विभागाने मुलचेरा तालुक्यात २३ व चामोर्शी तालुक्यात २३ अशा एकूण ४६ शाळांमध्ये बंगाली माध्यम सुरू केले आहे. बंगाली माध्यमाचे शिक्षण पहिली ते पाचवीपर्यंत दिले जाते. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये टाकले जाते. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. राज्यभरात बंगाली माध्यमाच्या शाळा केवळ गडचिरोली जिल्ह्यात आहेत. एवढ्या कमी विद्यार्थ्यांसाठी पुस्तके छापणे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम मंडळाला शक्य नाही. त्यामुळे बंगाली माध्यमाची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागावर सोपविण्यात आली आहे.शाळेच्या पहिल्या दिवशीच पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावी, यासाठी इतर माध्यमाची पुस्तके उन्हाळ्यातच पुरविली जातात व शाळेच्या पहिल्याच दिवशी त्याचे वितरण केले जाते. मात्र बंगाली माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग नेहमीच अन्याय करीत आला आहे. आजपर्यंत कधीच पहिल्या दिवशी बंगाली माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध झाली नाहीत. यावर्षी सुध्दा शाळा सुरू होऊन आता २० दिवसांचा कालावधी उलटला तरी पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली नाहीत. याबाबत संबंधित विद्यार्थ्यांचे पालक जिल्हा परिषद प्रशासनाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. जिल्हा परिषदेने तत्काळ पुस्तकांचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. मात्र बंगाली माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तकेच उपलब्ध नाही. त्यामुळे सदर विद्यार्थी अध्यापन कसे करीत असावे व त्यांची गुणवत्ता कशी काय वाढणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. दस्तरखुद्द शिक्षणाधिकाऱ्यांनी शांतीग्राम बंगाली माध्यमाच्या शाळेला भेट दिली असता, चवथ्या वर्गाच्या एकाही विद्यार्थ्याला बंगाली भाषा वाचता आली नाही.नियोजनाचा अभाव बंगाली भाषेची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. त्यामुळे उन्हाळ्यातच नियोजन करून पाठ्यपुस्तके छापल्यास शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे शक्य आहे. मात्र शिक्षण विभाग शाळा सुरू झाल्याशिवाय पाठ्यपुस्तके छपाईचे काम सुरू करीत नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर ऐन वेळेवर घर बांधण्यासाठी सुरू करणाऱ्या माकडाची फजिती होते, या कहाणीच्या माध्यमातून वेळेचे महत्त्व सांगणारा शिक्षण विभाग मात्र वेळेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.बंगाली माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांची प्रिंटिंग करण्याचे काम शिक्षण विभागाने सुरू केले आहे. पाठ्यपुस्तकांचा तत्काळ पुरवठा करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहे. प्रिंटिंग होताच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातील. - एम. एन. चलाख, प्रभारी शिक्षणाधिकारी, गडचिरोली