शहरं
Join us  
Trending Stories
1
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
2
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
3
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
4
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
5
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
6
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
8
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
9
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
10
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
11
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
12
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
13
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
14
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
15
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
16
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
17
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
18
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
19
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
20
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...

२४ तासांपासून ४५ गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:32 IST

मंगळवारी सायंकाळपासून झालेल्या वादळी पावसामुळे घोट व परिसरातील शेतकऱ्यांच्या रबी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मंगळवारी रात्री ९ वाजता या भागातील वीज पुरवठा खंडित झाला.

ठळक मुद्देघोट परिसर : वादळी वाºयासह पाऊस व गारपीट

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : मंगळवारी सायंकाळपासून झालेल्या वादळी पावसामुळे घोट व परिसरातील शेतकऱ्यांच्या रबी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मंगळवारी रात्री ९ वाजता या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. तब्बल २४ तासानंतरही वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने जवळपास ४० ते ४५ गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.घोट परिसरात मंगळवारी सायंकाळपासूनच वातावरण बदल झाला. त्यानंतर ७ ते ७.३० वाजतापासून वादळी पावसाला सुरूवात झाली. दरम्यान लहान स्वरूपात गारपीटही झाली. त्यामुळे या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेले उडीद, मूग, हरभरा, जवस, पोपट, वटाणा, मटकी यासह अन्य कडधान्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. घोट येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या ४० ते ४५ गावातील वीज पुरवठा मंगळवारच्या ९ वाजतापासून बुधवारी रात्री उशिरापर्यंत खंडितच होता. या संदर्भात महावितरणच्या अभियंत्यांना विचारणा केली असता, वीज दुरूस्तीचे काम सुरू आहे, असे सांगितले. परिसरात वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्याने या भागातील वीज तारांवर झाडे कोसळली. मुलचेरा तालुक्याच्या काही भागातही वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना त्रास झाला.मुलचेरा तालुक्यात पिकांचे नुकसानमुलचेरा तालुक्यातील गणेशनगरसह परिसरात मंगळवारी रात्री अवकाळी पाऊस झाल्याने या भागातील शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. गणेशनगर येथील मका, हरभरा तसेच भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे या भागातील नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विदर्भ कृती समितीचे अध्यक्ष बादलशहा यांच्या नेतृत्त्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुभाष गणपती, निकुरे, शंकर हलदार, रंजीत मंडल, रामपद मंडल, लक्ष्मण बाला, विश्वनाथ मंडल, सुभाष पटेल उपस्थित होते. या संदर्भात नाराजी व्यक्त करीत महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी झालेल्या नुकसानीची पाहणी न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे, अशी प्रतिक्रिया मुलचेराचे नगराध्यक्ष सुभाष आत्राम यांनी दिली.