शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

२४ तासांपासून ४५ गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:32 IST

मंगळवारी सायंकाळपासून झालेल्या वादळी पावसामुळे घोट व परिसरातील शेतकऱ्यांच्या रबी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मंगळवारी रात्री ९ वाजता या भागातील वीज पुरवठा खंडित झाला.

ठळक मुद्देघोट परिसर : वादळी वाºयासह पाऊस व गारपीट

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : मंगळवारी सायंकाळपासून झालेल्या वादळी पावसामुळे घोट व परिसरातील शेतकऱ्यांच्या रबी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मंगळवारी रात्री ९ वाजता या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. तब्बल २४ तासानंतरही वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने जवळपास ४० ते ४५ गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.घोट परिसरात मंगळवारी सायंकाळपासूनच वातावरण बदल झाला. त्यानंतर ७ ते ७.३० वाजतापासून वादळी पावसाला सुरूवात झाली. दरम्यान लहान स्वरूपात गारपीटही झाली. त्यामुळे या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेले उडीद, मूग, हरभरा, जवस, पोपट, वटाणा, मटकी यासह अन्य कडधान्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. घोट येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या ४० ते ४५ गावातील वीज पुरवठा मंगळवारच्या ९ वाजतापासून बुधवारी रात्री उशिरापर्यंत खंडितच होता. या संदर्भात महावितरणच्या अभियंत्यांना विचारणा केली असता, वीज दुरूस्तीचे काम सुरू आहे, असे सांगितले. परिसरात वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्याने या भागातील वीज तारांवर झाडे कोसळली. मुलचेरा तालुक्याच्या काही भागातही वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना त्रास झाला.मुलचेरा तालुक्यात पिकांचे नुकसानमुलचेरा तालुक्यातील गणेशनगरसह परिसरात मंगळवारी रात्री अवकाळी पाऊस झाल्याने या भागातील शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. गणेशनगर येथील मका, हरभरा तसेच भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे या भागातील नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विदर्भ कृती समितीचे अध्यक्ष बादलशहा यांच्या नेतृत्त्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुभाष गणपती, निकुरे, शंकर हलदार, रंजीत मंडल, रामपद मंडल, लक्ष्मण बाला, विश्वनाथ मंडल, सुभाष पटेल उपस्थित होते. या संदर्भात नाराजी व्यक्त करीत महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी झालेल्या नुकसानीची पाहणी न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे, अशी प्रतिक्रिया मुलचेराचे नगराध्यक्ष सुभाष आत्राम यांनी दिली.