ंगडचिरोली : निराधार, अपंग, वृद्ध नागरिकांना मदत व्हावी, यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील १ लाख १ हजार ८१८ नागरिकांना वर्षभरात ४५ कोटी १0 लाख २ हजार रूपयाचे वितरण करण्यात आले आहे. कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये गरीब व निराधार नागरिकांना राज्य शासनाने मदत करणे अपेक्षीत आहे. अपंग, निराधार नागरिक व वृद्ध नागरिकांना परावलंबी जीवन जगावे लागते. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वेळप्रसंगी भीक मागून सुद्धा जीवन जगावे लागते. या नागरिकांना मदत करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून राष्ट्रीय वृद्धपकाळ नवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब कल्याण सहाय्य योजना, राष्ट्रीय विधवा नवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय अपंग नवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना व o्रावणबाळ सेवा योजना चालविल्या जातात. पात्र लाभार्थ्यांंची तहसीलदार व समितीच्या माध्यमातून निवड करण्यात येते. निवड झालेल्या नागरिकांना जवळपास महिन्याकाठी ६00 रूपये अर्थसहाय्य दिल्या जाते. o्रावणबाळ सेवा योजनेच्या ५१ हजार २२५ लाभार्थ्यांंना २५ कोटी ४३ लाख ४३ हजार रूपये एवढी मदत देण्यात आली. या ६ योजनांचे एकूण १ लाख १ हजार ८१८ लाभार्थी असून त्यांना वर्षभरात ४५ कोटी १0 लाख २ हजार रूपयाचे वितरण करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी) गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय वृद्धपकाळ योजनेचे ३२ हजार ४0९ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांंना वर्षभरात ६ कोटी ९३ लाख ८0 हजार रूपयाचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेच्या ६१९ लाभार्थ्यांंना १ कोटी ९ लाख ८0 हजार रूपये, राष्ट्रीय विधवा नवृत्ती वेतन योजनेच्या २ हजार २६ लाभार्थ्यांंना ४५ लाख ४६ हजार रूपये, राष्ट्रीय अपंग नवृत्ती वेतन योजनेच्या ३६८ लाभार्थ्यांंना ७ लाख ५६ हजार रूपयाचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनातर्फे चालविल्या जाणार्या संजय गांधी निराधार योजनेच्या १५ हजार १७१ लाभार्थ्यांंना ११ कोटी ९ लाख ९७ हजार तर
निराधारांना ४५ कोटींची मदत
By admin | Updated: May 13, 2014 23:36 IST