शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

जिल्ह्यातील वृद्ध नागरिक व निराधारांना ४५ कोटींचे अनुदान

By admin | Updated: October 6, 2014 23:12 IST

वृद्ध नागरिक व निराधारांना स्वत:च्या तसेच कुटुंबाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यास मदत व्हावी यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. एप्रिलपर्यंत

गडचिरोली : वृद्ध नागरिक व निराधारांना स्वत:च्या तसेच कुटुंबाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यास मदत व्हावी यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १ हजार ८१८ नागरिकांना सुमारे ४५ कोटी १० लाख २ हजार रूपयांच्या अनुदानाचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फतीने करण्यात आले आहे. घरातील कर्त्याव्यक्तीचे निधन झाल्यानंतर संबंधित कुटुंबावर उपासमारीची पाळी येते. सदर व्यक्तीचे आजारानंतर निधन झाल्यास कधी- कधी कुटुंबाकडे दवाखान्याचे बीलही देण्यास पैसे राहत नाही. जमीन किंवा घरदार विकून घेतलेले कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला जातो. एकंदरीतच सदर कुटुंब उघड्यावर पडते. आयुष्यभर रक्ताचे पाणी करणाऱ्या काही वृद्ध नागरिकांनाही म्हातारपणात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र हातपाय गळून पडले असल्याने वृद्ध नागरिकांचा नाईलाज होते. याच कालावधीत दवाखाना व इतर खर्चातही वाढ होते. वृद्ध नागरिक व निराधार कुटुंबांना थोडाफार आधार व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून ६ योजना राबविल्या जातात. या योजनांतर्गत प्रत्येक व्यक्तीला मासिक ६०० रूपये अनुदान दिले जाते. एप्रिल महिन्यापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय वृद्धपकाळ योजनेचे ३२ हजार ४०९ लाभार्थी होते. त्यांना ६ कोटी ९३ लाख ८० हजार रूपयांचे अनुदान देण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजनेंतर्गत ६१९ कुटुंबांना १० कोटी ८० लाख रूपयांचे अनुदान देण्यात आले. राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे २ हजार २६ लाभार्थी आहेत. त्यांना ४५ लाख ४६ हजार रूपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले. राष्ट्रीय अपंग निवृत्त वेतन योजनेचे ३६८ लाभार्थी असून त्यांना ७ लाख ५६ हजार रूपयांचे अनुदान, संजय गांधी निराधार योजनेच्या १५ हजार १७१ लाभार्थ्यांना ११ कोटी ९ लाख ९७ हजार, श्रावण बाळ योजनेच्या ५१ हजार २२५ लाभार्थ्यांना २५ कोटी ४३ लाख ४३ हजार रूपयाच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. श्रावण बाळ सेवा योजना, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्त वेतन योजनेच्या लाभार्थ्यांची निवड तालुकास्तरीय समितीकडून करण्यात येते. मागील २ वर्षांपासून अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे धोरण अवलंबिले असल्याने भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)