शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

यावर्षी जिल्ह्याला मिळणार ४५ पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:11 IST

जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील नदी आणि नाल्यांवर पूलच नसल्यामुळे पावसाळ्याचे चार-पाच महिने त्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खंडित होते.

ठळक मुद्देअनेक मार्गांवरील अडचण : वाहतुकीचा मार्ग होणार मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील नदी आणि नाल्यांवर पूलच नसल्यामुळे पावसाळ्याचे चार-पाच महिने त्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खंडित होते. काही गावांना जाण्यासाठी तर वर्षभर पाण्यातूनच वाट काढत किंवा होडीने जावे लागते. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासूनची ही अडचण आता बऱ्याच प्रमाणात दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी यावर्षी तब्बल ४५ पुलांची उभारणी करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.या ४५ पुलांमध्ये ३३ पूल डावी कडवी विचारसरणीअंतर्गत रस्ते जोडणी प्रकल्पातून (प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) होणार आहेत. याशिवाय ६ पूल आदिवासी उपयोजनेतून मिळणाºया निधीतून, ३ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य मार्ग निधीतून तर ३ पूल नाबार्डकडून प्राप्त निधीतून उभारले जाणार आहेत. या पुलांच्या बांधकामासाठी सव्वाशे कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून होणाऱ्या ३३ पुलांमध्ये अहेरी तालुक्यात २, भामरागड तालुक्यात ४, एटापल्ली तालुक्यात १५, सिरोंचा तालुक्यात ४, गडचिरोली तालुक्यात ४ तर कोरची तालुक्यात ४ पूल होणार आहेत. हे सर्व पूल ८६ कोटी २५ लाख रुपयांचे आहेत. आदिवासी उपयोजनेतून मंजूर ६ पुलांमध्ये मुलचेरा तालुक्यात १ तर सिरोंचा तालुक्यात ५ पूल होणार आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य मार्ग निधीतून यावर्षीच्या अर्थसंकल्पात ३ पूल मंजूर झाले. त्यात भामरागड तालुक्यातील जुवी नाल्यावर मोठ्या आणि ५ लहान पुलांचे बांधकाम केले जाणार आहे. एटापल्ली-परसलगोंदी-गट्टा मार्गावर सुरजागड नाल्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम होणार आहे. तसेच कोरची-पुराडा-मालेवाडा-येरकड-गोदलवाही-कसनसूर-एटापल्ली-आलापल्ली रस्त्यावरील झुरी नाल्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम केले जाणार आहे. या तीन पुलांसाठी २९.५ कोटींची तरतूद केली आहे.नाबार्ड अंतर्गत सार्वजनिक बांधकाम मंडळाकडून मंजूर ३ पुलांमध्ये वडसा तालुक्यातील तुलसी-पोटेगाव रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम, धानोरा तालुक्यातील कारकारका पोचमार्ग ते राज्य महामार्गाला जोडणाºया रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम आणि एटापल्ली तालुक्यातील गोदलवाही मिचगाव पुलखल, पेंढरी जारावंडी कसनसूर रस्त्यावरील कंडोली नाल्यावर पुलाचे बांधकाम केले जाणार आहे. या पुलांची किंमत १० कोटी २९ लाख रुपये राहणार आहे.या सर्व पुलांमुळे पावसाच्या दिवसात बंद होणारे जिल्ह्यातील अनेक मार्ग बारमाही वाहतुकीसाठी सुरू होतील. त्यामुळे रहदारीची अडचण दूर होऊन अनेक गावे मुख्य मार्गाशी जोडले जाणार आहेत. यातून गावकºयांच्या विकासाचा मार्गही प्रशस्त होणार आहे.या मार्गावरील पुलांचे होणार कामअहेरी तालुक्यातील जिमलगट्टा-देचली, भामरागड तालुक्यातील हलवेर-कोठी, कमलापूर-दामरंचा, मन्नेराजाराम-ताडगाव, एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी तसेच घोट-रेगडी-कसनसूर आदीसह विविध मार्गावरील अनेक पुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, विद्यमान शासनाने वाहतूक व दळणवळण वाढविण्याच्या उद्देशाने रस्ते निर्मितीच्या कामावर भर दिला आहे. पूल बांधकामासाठी प्राधान्य दिले जात आहे. रस्ता हा विकासाचा आरसा असे म्हटले जाते. अपघातावर आळा घालण्यासाठी सुस्थितीत रस्ते व पुलाची निर्मिती शासनामार्फत करण्यात येणार आहे.अहेरी उपविभागाला झुकते मापप्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अहेरी उपविभागाच्या भामरागड, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा आदी तालुक्यातील मार्गांवर पूल निर्मितीचे काम प्राधान्याने मंजूर करण्यात आले आहे. नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागात पूल निर्मितीतून दळणवळणाचे जाळे निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे.