शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी जिल्ह्याला मिळणार ४५ पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:11 IST

जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील नदी आणि नाल्यांवर पूलच नसल्यामुळे पावसाळ्याचे चार-पाच महिने त्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खंडित होते.

ठळक मुद्देअनेक मार्गांवरील अडचण : वाहतुकीचा मार्ग होणार मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील नदी आणि नाल्यांवर पूलच नसल्यामुळे पावसाळ्याचे चार-पाच महिने त्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खंडित होते. काही गावांना जाण्यासाठी तर वर्षभर पाण्यातूनच वाट काढत किंवा होडीने जावे लागते. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासूनची ही अडचण आता बऱ्याच प्रमाणात दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी यावर्षी तब्बल ४५ पुलांची उभारणी करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.या ४५ पुलांमध्ये ३३ पूल डावी कडवी विचारसरणीअंतर्गत रस्ते जोडणी प्रकल्पातून (प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) होणार आहेत. याशिवाय ६ पूल आदिवासी उपयोजनेतून मिळणाºया निधीतून, ३ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य मार्ग निधीतून तर ३ पूल नाबार्डकडून प्राप्त निधीतून उभारले जाणार आहेत. या पुलांच्या बांधकामासाठी सव्वाशे कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून होणाऱ्या ३३ पुलांमध्ये अहेरी तालुक्यात २, भामरागड तालुक्यात ४, एटापल्ली तालुक्यात १५, सिरोंचा तालुक्यात ४, गडचिरोली तालुक्यात ४ तर कोरची तालुक्यात ४ पूल होणार आहेत. हे सर्व पूल ८६ कोटी २५ लाख रुपयांचे आहेत. आदिवासी उपयोजनेतून मंजूर ६ पुलांमध्ये मुलचेरा तालुक्यात १ तर सिरोंचा तालुक्यात ५ पूल होणार आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य मार्ग निधीतून यावर्षीच्या अर्थसंकल्पात ३ पूल मंजूर झाले. त्यात भामरागड तालुक्यातील जुवी नाल्यावर मोठ्या आणि ५ लहान पुलांचे बांधकाम केले जाणार आहे. एटापल्ली-परसलगोंदी-गट्टा मार्गावर सुरजागड नाल्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम होणार आहे. तसेच कोरची-पुराडा-मालेवाडा-येरकड-गोदलवाही-कसनसूर-एटापल्ली-आलापल्ली रस्त्यावरील झुरी नाल्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम केले जाणार आहे. या तीन पुलांसाठी २९.५ कोटींची तरतूद केली आहे.नाबार्ड अंतर्गत सार्वजनिक बांधकाम मंडळाकडून मंजूर ३ पुलांमध्ये वडसा तालुक्यातील तुलसी-पोटेगाव रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम, धानोरा तालुक्यातील कारकारका पोचमार्ग ते राज्य महामार्गाला जोडणाºया रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम आणि एटापल्ली तालुक्यातील गोदलवाही मिचगाव पुलखल, पेंढरी जारावंडी कसनसूर रस्त्यावरील कंडोली नाल्यावर पुलाचे बांधकाम केले जाणार आहे. या पुलांची किंमत १० कोटी २९ लाख रुपये राहणार आहे.या सर्व पुलांमुळे पावसाच्या दिवसात बंद होणारे जिल्ह्यातील अनेक मार्ग बारमाही वाहतुकीसाठी सुरू होतील. त्यामुळे रहदारीची अडचण दूर होऊन अनेक गावे मुख्य मार्गाशी जोडले जाणार आहेत. यातून गावकºयांच्या विकासाचा मार्गही प्रशस्त होणार आहे.या मार्गावरील पुलांचे होणार कामअहेरी तालुक्यातील जिमलगट्टा-देचली, भामरागड तालुक्यातील हलवेर-कोठी, कमलापूर-दामरंचा, मन्नेराजाराम-ताडगाव, एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी तसेच घोट-रेगडी-कसनसूर आदीसह विविध मार्गावरील अनेक पुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, विद्यमान शासनाने वाहतूक व दळणवळण वाढविण्याच्या उद्देशाने रस्ते निर्मितीच्या कामावर भर दिला आहे. पूल बांधकामासाठी प्राधान्य दिले जात आहे. रस्ता हा विकासाचा आरसा असे म्हटले जाते. अपघातावर आळा घालण्यासाठी सुस्थितीत रस्ते व पुलाची निर्मिती शासनामार्फत करण्यात येणार आहे.अहेरी उपविभागाला झुकते मापप्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अहेरी उपविभागाच्या भामरागड, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा आदी तालुक्यातील मार्गांवर पूल निर्मितीचे काम प्राधान्याने मंजूर करण्यात आले आहे. नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागात पूल निर्मितीतून दळणवळणाचे जाळे निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे.