शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

यावर्षी जिल्ह्याला मिळणार ४५ पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:11 IST

जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील नदी आणि नाल्यांवर पूलच नसल्यामुळे पावसाळ्याचे चार-पाच महिने त्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खंडित होते.

ठळक मुद्देअनेक मार्गांवरील अडचण : वाहतुकीचा मार्ग होणार मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील नदी आणि नाल्यांवर पूलच नसल्यामुळे पावसाळ्याचे चार-पाच महिने त्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खंडित होते. काही गावांना जाण्यासाठी तर वर्षभर पाण्यातूनच वाट काढत किंवा होडीने जावे लागते. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासूनची ही अडचण आता बऱ्याच प्रमाणात दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी यावर्षी तब्बल ४५ पुलांची उभारणी करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.या ४५ पुलांमध्ये ३३ पूल डावी कडवी विचारसरणीअंतर्गत रस्ते जोडणी प्रकल्पातून (प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) होणार आहेत. याशिवाय ६ पूल आदिवासी उपयोजनेतून मिळणाºया निधीतून, ३ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य मार्ग निधीतून तर ३ पूल नाबार्डकडून प्राप्त निधीतून उभारले जाणार आहेत. या पुलांच्या बांधकामासाठी सव्वाशे कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून होणाऱ्या ३३ पुलांमध्ये अहेरी तालुक्यात २, भामरागड तालुक्यात ४, एटापल्ली तालुक्यात १५, सिरोंचा तालुक्यात ४, गडचिरोली तालुक्यात ४ तर कोरची तालुक्यात ४ पूल होणार आहेत. हे सर्व पूल ८६ कोटी २५ लाख रुपयांचे आहेत. आदिवासी उपयोजनेतून मंजूर ६ पुलांमध्ये मुलचेरा तालुक्यात १ तर सिरोंचा तालुक्यात ५ पूल होणार आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य मार्ग निधीतून यावर्षीच्या अर्थसंकल्पात ३ पूल मंजूर झाले. त्यात भामरागड तालुक्यातील जुवी नाल्यावर मोठ्या आणि ५ लहान पुलांचे बांधकाम केले जाणार आहे. एटापल्ली-परसलगोंदी-गट्टा मार्गावर सुरजागड नाल्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम होणार आहे. तसेच कोरची-पुराडा-मालेवाडा-येरकड-गोदलवाही-कसनसूर-एटापल्ली-आलापल्ली रस्त्यावरील झुरी नाल्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम केले जाणार आहे. या तीन पुलांसाठी २९.५ कोटींची तरतूद केली आहे.नाबार्ड अंतर्गत सार्वजनिक बांधकाम मंडळाकडून मंजूर ३ पुलांमध्ये वडसा तालुक्यातील तुलसी-पोटेगाव रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम, धानोरा तालुक्यातील कारकारका पोचमार्ग ते राज्य महामार्गाला जोडणाºया रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम आणि एटापल्ली तालुक्यातील गोदलवाही मिचगाव पुलखल, पेंढरी जारावंडी कसनसूर रस्त्यावरील कंडोली नाल्यावर पुलाचे बांधकाम केले जाणार आहे. या पुलांची किंमत १० कोटी २९ लाख रुपये राहणार आहे.या सर्व पुलांमुळे पावसाच्या दिवसात बंद होणारे जिल्ह्यातील अनेक मार्ग बारमाही वाहतुकीसाठी सुरू होतील. त्यामुळे रहदारीची अडचण दूर होऊन अनेक गावे मुख्य मार्गाशी जोडले जाणार आहेत. यातून गावकºयांच्या विकासाचा मार्गही प्रशस्त होणार आहे.या मार्गावरील पुलांचे होणार कामअहेरी तालुक्यातील जिमलगट्टा-देचली, भामरागड तालुक्यातील हलवेर-कोठी, कमलापूर-दामरंचा, मन्नेराजाराम-ताडगाव, एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी तसेच घोट-रेगडी-कसनसूर आदीसह विविध मार्गावरील अनेक पुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, विद्यमान शासनाने वाहतूक व दळणवळण वाढविण्याच्या उद्देशाने रस्ते निर्मितीच्या कामावर भर दिला आहे. पूल बांधकामासाठी प्राधान्य दिले जात आहे. रस्ता हा विकासाचा आरसा असे म्हटले जाते. अपघातावर आळा घालण्यासाठी सुस्थितीत रस्ते व पुलाची निर्मिती शासनामार्फत करण्यात येणार आहे.अहेरी उपविभागाला झुकते मापप्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अहेरी उपविभागाच्या भामरागड, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा आदी तालुक्यातील मार्गांवर पूल निर्मितीचे काम प्राधान्याने मंजूर करण्यात आले आहे. नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागात पूल निर्मितीतून दळणवळणाचे जाळे निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे.