शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

४४६८ जणांना मिळणार मोफत गॅस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST

केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत तीन महिने मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. धानोरा शहरातील गॅस एजंसीच्या वतीने तालुक्यातील एकूण ४ हजार ४६८ लाभार्थ्यांना तीन महिन्याचे सिलिंडर मोफत देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस धारकांना एप्रिल ते जून २०२० दरम्यान तीन सिलिंडर मोफत देण्याची योजना आखली आहे.

ठळक मुद्देसंचारबंदीत दिलासा : उज्ज्वला योजनेच्या तालुक्यातील लाभार्थ्यांना तीन महिने सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन घोषित केले आहे. परिणामी कामधंदे व व्यवसाय बंद पडून लोक रिकाम्या हाताने घरी बसले आहेत. परिणामी आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब सर्वसामान्य कुटुंबांसाठी तीन महिने मोफत सिलिंडर मिळाणार आहे. विशेष म्हणजे ही सुविधा उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे.केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत तीन महिने मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. धानोरा शहरातील गॅस एजंसीच्या वतीने तालुक्यातील एकूण ४ हजार ४६८ लाभार्थ्यांना तीन महिन्याचे सिलिंडर मोफत देण्यात येणार आहे.केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस धारकांना एप्रिल ते जून २०२० दरम्यान तीन सिलिंडर मोफत देण्याची योजना आखली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उज्ज्वला गॅसधारकांच्या बँक खात्यावर एका सिलिंडरची रक्कम ८०३.५० रूपये जमा करण्यात आली आहे. ग्राहकांनी आपल्या खात्यातून सदर रक्कम काढून अथवा आपल्याकडील रक्कम वापरून ३० एप्रिल २०२० च्या आत सिलिंडर घेतल्यास पुन्हा मे महिन्यात दुसऱ्या सिलिंडरची रक्कम जमा करण्यात येणार आहे. ३१ मे २०२० च्या आत दुसरा सिलिंडर सोडविल्यास पुन्हा जून महिन्यात तिसऱ्या सिलिंडरची रक्कम जमा होईल. लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर सिलिंडरची रक्कम जमा झाल्यावर त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅप किंवा ऑनलाईन अ‍ॅपने सिलिंडर बुकिंग केल्यानंतर गॅस एजंसीमार्फत लाभार्थ्यांना घरपोच गॅस सिलिंडर पोहोचविण्यात येणार आहे.लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने लाभार्थ्यांनी गॅस एजंसीमध्ये गर्दी न करता गावात गॅस एजंसीची गाडी आल्यावर एजंसीच्या कर्मचाऱ्यांकडून योजनेविषयी गॅस सिलिंडरची रक्कम जमा झाली किंवा नाही, याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन एजंसीच्या वतीने करण्यात आले आहे.रोकडसाठी करावी लागत आहे धावपळसरकारकडून गॅस सिलिंडर मोफत मिळत असला तरी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना रोख रक्कम देऊन सिलिंडर घ्यावे लागत आहे. कोरोनाच्या संचारबंदीमुळे साधनांअभावी वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी काही अंतरावर असलेल्या गावातील बँक शाखेत जाऊन पैैसे काढण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. ग्रामीण भागात बँकेचे जाळे नसल्याने संचारबंदीच्या काळात काही अंतरावर जाऊन पैैसे काढणे शक्य होत नाही. बँक खात्यातून ८०० रूपये काढण्यासाठी ५० ते ७० किमी अंतर गाठावे लागत आहे. धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागात रस्ते व वाहतुकीची समस्या आहे. त्यामुळे रोकडअभावी लाभार्थ्यांना अडचण जात आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर