शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आझाद मैदानावर आंदोलन करावे, इतर कुठेही बसू नये; मुंबई पोलिसांचे आंदोलकांना आवाहन
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
5
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
6
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
7
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
8
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
9
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
15
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
16
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
17
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
18
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
19
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
20
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार

४२३ शौचालयाचे काम अपूर्ण

By admin | Updated: July 14, 2016 01:16 IST

भाजपप्रणीत केंद्र शासनाने ग्रामीण व दुर्गम भागातील गावांची गोदरीमुक्तीकडे वाटचाल वाढविण्यासाठी..

मुलचेरा तालुक्यातील स्थिती : यंदा ३ हजार ६७० शौचालयाचे उद्दिष्ट मुलचेरा : भाजपप्रणीत केंद्र शासनाने ग्रामीण व दुर्गम भागातील गावांची गोदरीमुक्तीकडे वाटचाल वाढविण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) सुरू करून वैयक्तिक शौचालय बांधण्याचा जम्बो कार्यक्रम हाती घेतला. या अभियानांतर्गत मुलचेरा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीमध्ये यंदा सन २०१६-१७ वर्षात एकूण ३ हजार ६७० वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. गतवर्षी सन २०१५-१६ मध्ये तालुक्यात केवळ २९८ शौचालयाचे काम पूर्ण करण्यात आले असून अद्यापही ४२३ शौचालयाचे काम अपूर्ण आहे. वार्षिक कृती आराखडा सन २०१६-१७ अंतर्गत शासनाकडून वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना १२ हजार रूपये अनुदान मिळणार आहे. यंदा २०१६-१७ वर्षात मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली माल, कालीनगर, बोलेपल्ली, गोविंदपूर, येल्ला, सुंदरनगर, शांतीग्राम, विवेकानंदपूर व कोठारी या ९ ग्रामपंचायतीअंतर्गत संबंधित गावांमध्ये एकूण ३ हजार ६७० लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालयाचा लाभ देण्यात येणार आहे. सन २०१५-१६ वर्षात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत मुलेचरा तालुक्यातील गोमणी, वेंगनूर व मल्लेरा या तीन ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतींच्या गावांमध्ये एकूण १ हजार १७७ वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र यापैकी ६९४ शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून अद्यापही ४२३ वैयक्तिक शौचालयाचे काम अपूर्ण स्थितीत आहेत. लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी २५ टक्के रक्कम अनुदान म्हणूून पं. स. स्तरावरून देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात शौचालय कामाला गती येणार आहे. (तालुका प्रतिनिधी) केवळ एकच गाव गोदरीमुक्त घोषित सन २०१५-१६ या वर्षात वैयक्तिक शौचालय बांधकामाच्या अनुदानाची रक्कम मुलचेरा पंचायत समितीस्तरावर उशिरा पाठविण्यात आली. त्यामुळे शौचालय बांधकाम मंदावले. परिणामी ४२३ शौचालयाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. मुलचेरा तालुक्यातील लगाम हे एकमेव गाव गोदरीमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. गोदरीमुक्तीसाठीचा मल्लेरा ग्रामपंचायतीचा प्रस्ताव यावर्षी प्रशासनाकडून शासनाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन मुलचेरा तालुक्यात शौचालय बांधकामाची गती वाढविण्याची गरज आहे.