शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

‘आरसेटी’कडून ४१२६ जणांना कौशल्य प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 23:46 IST

भारत सरकारच्या ग्रामिण विकास मंत्रालयांतर्गत बेरोजगार युवा वर्गाला स्वयंरोजगार उभारणीस चालना देण्यासाठी बँक आॅफ इंडियाच्या मदतीने ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून (आरसेटी) प्रशिक्षण दिले जात आहे.

ठळक मुद्दे२८२ जणांनी घेतले कर्ज : स्टार्ट अप योजनेअंतर्गत बँकांकडून कर्ज पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारत सरकारच्या ग्रामिण विकास मंत्रालयांतर्गत बेरोजगार युवा वर्गाला स्वयंरोजगार उभारणीस चालना देण्यासाठी बँक आॅफ इंडियाच्या मदतीने ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून (आरसेटी) प्रशिक्षण दिले जात आहे. २०१५ पासून आतापर्यंत १४२ प्रशिक्षण कार्यक्रमांमधून ४१२६ लोकांना प्रशिक्षित करण्यात आल्याची माहिती सदर संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.आरसेटीचे संचालक एस.पी. टेकाम, वरिष्ठ प्रशासन अधिकारी पी.डी. काटकर यांनी आतापर्यंतच्या कामाचा आढावा थोडक्यात सांगून जिल्ह्यातील महिला-युवतींसह बेरोजगारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.बँक आॅफ इंडियाच्या सीएसआर निधीतून या प्रशिक्षणाचा खर्च भागविला जात आहे. स्वयंरोजगार उभारण्यासाठी विविध खाद्यपदार्थ निर्मिती, मच्छीपालन, मधमाशी पालन, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, रेशिमकोश उत्पादन, ब्युटी पार्लर, अगरबत्ती उद्योग, कुक्कुटपालन, बांबू हस्तकला, नळ दुरूस्ती व फिटींग, बकरी पालन, भाजीपाला लागवड, वाहन चालन आदी अनेक प्रकारचे प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले जाते. १८ ते २५ वयोगटातील प्रशिक्षणार्थ्यांना त्यासाठी प्राधान्य असून प्रशिक्षणार्थ्यांच्या निवासाचीही सोय केली जाते. एका प्रशिक्षण सत्रात ३० जण असे वर्षाचे २५ प्रशिक्षण सत्र घेतले जातात. संबंधित विषयांच्या तज्ज्ञ लोकांना त्यासाठी अतिथी प्रशिक्षक म्हणून बोलविले जात असल्याची माहिती काटकर यांनी दिली. अलिकडे या प्रशिक्षण सत्रांनी गती पकडली आहे. नवीन आर्थिक वर्षाचे नियोजनही करण्यात आले आहे.महिला प्रशिक्षणार्थींची संख्या अधिकआतापर्यंत मोफत प्रशिक्षण सत्रांमध्ये सहभागी झालेल्या ४१२६ जणांमध्ये २३८६ महिला आणि १७४० पुरूषांचा समावेश आहे. त्यातील २०४० प्रशिक्षणार्थी बीपीएल गटातील होते. प्रशिक्षित झालेल्यांपैकी २८२ जणांनी विविध बँकांकडून ५ कोटी ५८ लाख ३८ हजार रुपयांचे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले. मुद्रा योजनेअंतर्गत १० लाखापर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही तारण ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन व्यवसाय सुरू करावेत, अशी अपेक्षा संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.गडचिरोली राज्यात दुसऱ्या क्रमांकावरगडचिरोलीत २०१० पासून आरसेटीने हे प्रशिक्षण सुरू केले असले तरी सुरूवातीला अनेक अडचणींनो या संस्थेला तोंड द्यावे लागले. त्यामुळे २०१० पासून या कामाला गती आली. सध्या प्रशिक्षण, कर्जपुरवठा आदी बाबींमध्ये गडचिरोली जिल्हा राज्यात दुसºया क्रमांकावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.कारागृह बंदींनी घेतले ८.५ लाखांचे उत्पन्नआरसेटीच्या वतीने गडचिरोलीच्या खुल्या कारागृहातील ६८ बंदींनाही प्रशिक्षित करण्यात आले. भाजीपाला लागवडीच्या प्रशिक्षणानंतर या बंदींनी गेल्यावर्षी ८ लाख ५० हजारांचे उत्पन्न कारागृहाच्या शेतातून घेतल्याची माहिती पी.डी.काटकर यांनी दिली. त्या बंदींना महिलांकडून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला जातो. त्यावेळी हे बंदी भावूक होत असल्याचे ते म्हणाले.