शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

देसाईगंज येथे ४११ जणांनी केले रक्तदान

By admin | Updated: April 30, 2016 01:21 IST

संत निरंकारी मंडळाच्या वतीने आरमोरी मार्गावर असलेल्या संत निरंकारी सत्संग भवनात शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

देसाईगंज : संत निरंकारी मंडळाच्या वतीने आरमोरी मार्गावर असलेल्या संत निरंकारी सत्संग भवनात शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात एकूण ४११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संत निरंकारी मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमादरम्यान जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी स्वत: रक्तदान करून उपक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने आमदार क्रिष्णा गजबे, नगराध्यक्ष शाम उईके, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, गटनेता किसन नागदेवे, भाजपा तालुकाध्यक्ष राजू जेठानी, संतोष शामदासानी, नसरूद्दीन भामानी, कोरचीचे नगराध्यक्ष कमल खंडेलवाल, उपाध्यक्ष मुरलीधर सुंदरकर, विलास साळवे, महेश पापडकर, शरद मुळे, करूणा गणवीर, आशा राऊत, बबलू हुसैनी, पं.स. सदस्य चांगदेव फाये, विलास गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते. संत निरंकारी मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५५० च्या वर रक्तदात्यांनी रक्तदानासाठी नोंदणी केली होती. मात्र प्रकृतीच्या कारणावरून अनेकांनी रक्तदान केले नाही. देसाईगंज येथील सिंधी समाजाच्या वतीने निरंकारी मिशनचे बाबा हरदेव यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान होणारे हे पहिलेच रक्तदान शिबिर असल्याने या उपक्रमांची प्रसंशा करण्यात आली. शिबिरादरम्यान ३४२ पुरूष व ६९ महिलांनी रक्तदान केले. निरंकारी मंडळाच्या वतीने उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली होती. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तसंक्रमण पेढीचे अधिकारी, ग्रामीण रूग्णालय देसाईगंज, उपजिल्हा रूग्णालय आरमोरी, कुरखेडा, प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूड, आष्टी, कोंढाळा येथील कर्मचारी तसेच संत निरंकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)बाबा हरदेव यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून तसेच इतर हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन संत निरंकारी मंडळाच्या वतीने करण्यात येते. सर्वाधिक रक्तदान करणारे हे जिल्ह्यातील एकमेव मंडळ आहे. मंडळाच्या या सेवाभावी वृत्तीचे अनेकांनी कौतुक केले आहे. अशा प्रकारचे उपक्रम इतर सामाजिक संस्थांनी राबवावे, अशी आशा सुध्दा व्यक्त करण्यात येत आहे.