शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

४१% अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या

By admin | Updated: June 7, 2017 01:16 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचा कणा असणाऱ्या आणि ‘मिनी मंत्रालय’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा कारभार

मिनी मंत्रालय झाले पांगळे : अधिकाऱ्यांची १६० पदे तर कर्मचाऱ्यांची ५१६ पदे रिक्त मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचा कणा असणाऱ्या आणि ‘मिनी मंत्रालय’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा कारभार रिक्त पदांमुळे पांगळा झाला आहे. सध्या वर्ग १ व २ च्या अधिकाऱ्यांची ३८९ पैकी १६० पदे तर कर्मचाऱ्यांची ३५१४ पैकी ५१६ पदे रिक्त आहेत. याचा थेट परिणाम विविध योजनांच्या अंमलबजावणीवर होत आहे. जिल्हा परिषदेच्या १६ विभागांमार्फत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. कोट्यवधी रुपयांचा निधी त्यासाठी येतो. मात्र योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारीच नसल्यामुळे अनेक महत्वपूर्ण योजनांचे वाटोळे होत आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत वर्ग १ संवर्गाची १६१ पदे मंजूर आहेत. मात्र सध्या केवळ ९५ अधिकारी उपलब्ध असून ६६ पदे रिक्त आहेत. तसेच वर्ग २ ची २२८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १३४ कार्यरत आहेत तर ९४ रिक्त आहेत. गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त जिल्ह्याला विकसित जिल्ह्यांच्या रांगेत आणण्यासाठी राज्यच नाही तर केंद्र सरकारचेही या जिल्ह्याकडे लक्ष असते. असे असताना इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त का आहेत? हा प्रश्न कोड्यात टाकणारा आहे. अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमध्ये प्रामुख्याने बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची १२ पैकी ११ पदे रिक्त आहेत. यामुळे बालकांच्या पोषण आहारासारख्या योजनेवर परिणाम होऊन कुपोषण वाढत आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांचीही १०९ पैकी ५७ पदे रिक्त आहेत. पावसाळ्यात गुरांचे आजार वाढतात. अशा परिस्थितीत या विभागात अर्ध्यापेक्षा जास्त अधिकारी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या गुरांची हेळसांड होणार आहे. याशिवाय सहायक गटविकास अधिकाऱ्यांची १२ पैकी ५ पदे आणि सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांची (सनियंत्रण) १५ पैकी ७ पदे रिक्त आहेत. याकडे लक्ष न दिल्यास हा अनुशेष सतत वाढत जाण्याची शक्यता आहे. मंत्रालयातून रद्द करतात बदली गडचिरोली म्हटले की अधिकारी या जिल्ह्यात येण्यास तयारच होत नाही. काहीही आटापीटा करून ते मंत्रालयातून आपली बदली रद्द करून येतात. अनेक अधिकारी तर नाममात्र पदभार स्वीकारण्यासाठी गडचिरोलीत आले आणि दुसऱ्या अधिकाऱ्याकडे पदभार सोपवून दीर्घ रजेवर गेले. त्यानंतर ते पुन्हा गडचिरोलीत येण्याऐवजी येथून त्यांची बदली झाल्याचा संदेशच येथे पोहोचला. मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी येथे अधिकाऱ्यांनी यावे आणि चांगले काम करावे अशी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याने आधी गडचिरोलीत काम करावे असा नियम करण्याची आणि गडचिरोलीत रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती. मात्र ती घोषणा हवेतच विरल्याचे जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवरून दिसून येते. सरळ सेवा भरती बंद जिल्हा परिषदेत केवळ अधिकाऱ्यांचीच नाही तर कर्मचाऱ्यांचीही ५१६ पदे रिक्त आहेत. ही पदे रिक्त राहण्यासाठी शासनाने दोन वर्षांपासून बंद केलेली सरळ सेवा भरती हे कारण आहे. एकीकडे जुने कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे आणि नवीन भरती बंद आहे. त्यामुळे रिक्त पदांचा अनुशेष वाढतच आहे.