शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

४१% अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या

By admin | Updated: June 7, 2017 01:16 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचा कणा असणाऱ्या आणि ‘मिनी मंत्रालय’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा कारभार

मिनी मंत्रालय झाले पांगळे : अधिकाऱ्यांची १६० पदे तर कर्मचाऱ्यांची ५१६ पदे रिक्त मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचा कणा असणाऱ्या आणि ‘मिनी मंत्रालय’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा कारभार रिक्त पदांमुळे पांगळा झाला आहे. सध्या वर्ग १ व २ च्या अधिकाऱ्यांची ३८९ पैकी १६० पदे तर कर्मचाऱ्यांची ३५१४ पैकी ५१६ पदे रिक्त आहेत. याचा थेट परिणाम विविध योजनांच्या अंमलबजावणीवर होत आहे. जिल्हा परिषदेच्या १६ विभागांमार्फत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. कोट्यवधी रुपयांचा निधी त्यासाठी येतो. मात्र योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारीच नसल्यामुळे अनेक महत्वपूर्ण योजनांचे वाटोळे होत आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत वर्ग १ संवर्गाची १६१ पदे मंजूर आहेत. मात्र सध्या केवळ ९५ अधिकारी उपलब्ध असून ६६ पदे रिक्त आहेत. तसेच वर्ग २ ची २२८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १३४ कार्यरत आहेत तर ९४ रिक्त आहेत. गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त जिल्ह्याला विकसित जिल्ह्यांच्या रांगेत आणण्यासाठी राज्यच नाही तर केंद्र सरकारचेही या जिल्ह्याकडे लक्ष असते. असे असताना इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त का आहेत? हा प्रश्न कोड्यात टाकणारा आहे. अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमध्ये प्रामुख्याने बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची १२ पैकी ११ पदे रिक्त आहेत. यामुळे बालकांच्या पोषण आहारासारख्या योजनेवर परिणाम होऊन कुपोषण वाढत आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांचीही १०९ पैकी ५७ पदे रिक्त आहेत. पावसाळ्यात गुरांचे आजार वाढतात. अशा परिस्थितीत या विभागात अर्ध्यापेक्षा जास्त अधिकारी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या गुरांची हेळसांड होणार आहे. याशिवाय सहायक गटविकास अधिकाऱ्यांची १२ पैकी ५ पदे आणि सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांची (सनियंत्रण) १५ पैकी ७ पदे रिक्त आहेत. याकडे लक्ष न दिल्यास हा अनुशेष सतत वाढत जाण्याची शक्यता आहे. मंत्रालयातून रद्द करतात बदली गडचिरोली म्हटले की अधिकारी या जिल्ह्यात येण्यास तयारच होत नाही. काहीही आटापीटा करून ते मंत्रालयातून आपली बदली रद्द करून येतात. अनेक अधिकारी तर नाममात्र पदभार स्वीकारण्यासाठी गडचिरोलीत आले आणि दुसऱ्या अधिकाऱ्याकडे पदभार सोपवून दीर्घ रजेवर गेले. त्यानंतर ते पुन्हा गडचिरोलीत येण्याऐवजी येथून त्यांची बदली झाल्याचा संदेशच येथे पोहोचला. मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी येथे अधिकाऱ्यांनी यावे आणि चांगले काम करावे अशी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याने आधी गडचिरोलीत काम करावे असा नियम करण्याची आणि गडचिरोलीत रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती. मात्र ती घोषणा हवेतच विरल्याचे जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवरून दिसून येते. सरळ सेवा भरती बंद जिल्हा परिषदेत केवळ अधिकाऱ्यांचीच नाही तर कर्मचाऱ्यांचीही ५१६ पदे रिक्त आहेत. ही पदे रिक्त राहण्यासाठी शासनाने दोन वर्षांपासून बंद केलेली सरळ सेवा भरती हे कारण आहे. एकीकडे जुने कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे आणि नवीन भरती बंद आहे. त्यामुळे रिक्त पदांचा अनुशेष वाढतच आहे.