शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

४० हजारांवर शेतकºयांना मिळणार कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:36 IST

राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी जिल्हा सहकारी बँक आणि राष्टÑीयकृत बँकांचे मिळून जिल्ह्यातील ४० हजारांच्या घरात शेतकरी पात्र ठरणार आहेत.

ठळक मुद्देजीडीसीसी बँकेचे सर्वाधिक : शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी अडली यादी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी जिल्हा सहकारी बँक आणि राष्टÑीयकृत बँकांचे मिळून जिल्ह्यातील ४० हजारांच्या घरात शेतकरी पात्र ठरणार आहेत. मात्र राज्य शासनाने त्या शेतकºयांच्या यादीला अजून अंतिम स्वरूप दिलेले नाही. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे यादी जाहीर करण्यास विलंब लागत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात यादीला अंतिम मान्यताच मिळाली नसल्याचे समजते.जिल्ह्यातील किती शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आणि त्यांचा सातबारा कधी कोरा होणार, याची प्रतीक्षा सर्वच शेतकºयांना लागली आहे. पण अनेक अटींच्या चाळणीमुळे पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी वेळ लागला. आता जिल्हास्तरावर पात्र शेतकºयांची यादी तयार झाली आहे. त्यातही केवळ गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदारांचीच माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आहे. त्यानुसार जीडीसीसी बँकेचे ३९ हजार ६३६ खातेधारक कर्जमाफीसाठी पात्र ठरले होते. परंतू काही ठिकाणी एकाच व्यक्तीचे दोन खाते तर काही ठिकाणी दोन खातेधारकांचा एकच आधार नंबर आढळला. त्यामुळे प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जीडीसीसी बँकेच्या शेतकºयांची संख्या २५ हजार ९६८ झाली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी ही पात्र शेतकºयांची संख्या ठरविली असली तरी राज्य शासनाकडून त्या यादीची स्क्रुटनी केल्यानंतर त्यातील काही नावे गळण्याची शक्यता नाकारता येत नाही.दिवाळीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समारंभात पालकमंत्र्यांच्या हस्ते १७ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. त्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. आता उर्वरित पात्र शेतकºयांची यादी ‘माझे सरकार’च्या ग्रीन सीटवर टाकण्यात आलेली नाही. माहिती तंत्रज्ञान विभागाकडून हे काम राज्यस्तरावर सुरू आहे.शासन स्तरावर नावे न गळल्यास ४५ हजार शेतकरी ठरणार पात्रविशेष म्हणजे या कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांची यादी तयार करण्याची जबाबदारी जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे असली तरी राष्टÑीयकृत बँकांकडून कर्ज घेणाºया पात्र शेतकºयांची यादी बँकांकडून थेट राज्य शासनाकडे पाठविली जात आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर ती यादी उपलब्धच नसल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. तरीही या बँकांचे जवळपास २० हजार शेतकरी पात्र ठरल्याचे सांगितले जाते. हे २० हजार आणि जीडीसीसी बँकेचे २६ हजार अशा एकूण ४६ हजार पात्र शेतकºयांपैकी शासन स्तरावर ५ ते ६ हजार शेतकºयांची नावे गळण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. तसे झाले तरी जिल्हाभरातील किमान ४० हजार शेतकºयांना कर्जमाफी मिळणार हे निश्चित आहे.कोणीही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही आणि कोणीही अपात्र शेतकरी लाभार्थी ठरणार नाही याची दक्षता घेत आम्ही अचूक यादी तयार करण्याचा प्रयत्न केला. यात अनेक अडचणीही आल्या. त्यामुळे अधिकारी-कर्मचाºयांनी अतिरिक्त वेळ देऊन हे काम शक्य तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न केला. आता अंतिम यादी मुंबईवरून जाहीर होईल.- सीमा पांडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था