शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

४० हजारांवर शेतकºयांना मिळणार कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:36 IST

राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी जिल्हा सहकारी बँक आणि राष्टÑीयकृत बँकांचे मिळून जिल्ह्यातील ४० हजारांच्या घरात शेतकरी पात्र ठरणार आहेत.

ठळक मुद्देजीडीसीसी बँकेचे सर्वाधिक : शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी अडली यादी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी जिल्हा सहकारी बँक आणि राष्टÑीयकृत बँकांचे मिळून जिल्ह्यातील ४० हजारांच्या घरात शेतकरी पात्र ठरणार आहेत. मात्र राज्य शासनाने त्या शेतकºयांच्या यादीला अजून अंतिम स्वरूप दिलेले नाही. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे यादी जाहीर करण्यास विलंब लागत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात यादीला अंतिम मान्यताच मिळाली नसल्याचे समजते.जिल्ह्यातील किती शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आणि त्यांचा सातबारा कधी कोरा होणार, याची प्रतीक्षा सर्वच शेतकºयांना लागली आहे. पण अनेक अटींच्या चाळणीमुळे पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी वेळ लागला. आता जिल्हास्तरावर पात्र शेतकºयांची यादी तयार झाली आहे. त्यातही केवळ गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदारांचीच माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आहे. त्यानुसार जीडीसीसी बँकेचे ३९ हजार ६३६ खातेधारक कर्जमाफीसाठी पात्र ठरले होते. परंतू काही ठिकाणी एकाच व्यक्तीचे दोन खाते तर काही ठिकाणी दोन खातेधारकांचा एकच आधार नंबर आढळला. त्यामुळे प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जीडीसीसी बँकेच्या शेतकºयांची संख्या २५ हजार ९६८ झाली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी ही पात्र शेतकºयांची संख्या ठरविली असली तरी राज्य शासनाकडून त्या यादीची स्क्रुटनी केल्यानंतर त्यातील काही नावे गळण्याची शक्यता नाकारता येत नाही.दिवाळीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समारंभात पालकमंत्र्यांच्या हस्ते १७ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. त्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. आता उर्वरित पात्र शेतकºयांची यादी ‘माझे सरकार’च्या ग्रीन सीटवर टाकण्यात आलेली नाही. माहिती तंत्रज्ञान विभागाकडून हे काम राज्यस्तरावर सुरू आहे.शासन स्तरावर नावे न गळल्यास ४५ हजार शेतकरी ठरणार पात्रविशेष म्हणजे या कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांची यादी तयार करण्याची जबाबदारी जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे असली तरी राष्टÑीयकृत बँकांकडून कर्ज घेणाºया पात्र शेतकºयांची यादी बँकांकडून थेट राज्य शासनाकडे पाठविली जात आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर ती यादी उपलब्धच नसल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. तरीही या बँकांचे जवळपास २० हजार शेतकरी पात्र ठरल्याचे सांगितले जाते. हे २० हजार आणि जीडीसीसी बँकेचे २६ हजार अशा एकूण ४६ हजार पात्र शेतकºयांपैकी शासन स्तरावर ५ ते ६ हजार शेतकºयांची नावे गळण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. तसे झाले तरी जिल्हाभरातील किमान ४० हजार शेतकºयांना कर्जमाफी मिळणार हे निश्चित आहे.कोणीही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही आणि कोणीही अपात्र शेतकरी लाभार्थी ठरणार नाही याची दक्षता घेत आम्ही अचूक यादी तयार करण्याचा प्रयत्न केला. यात अनेक अडचणीही आल्या. त्यामुळे अधिकारी-कर्मचाºयांनी अतिरिक्त वेळ देऊन हे काम शक्य तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न केला. आता अंतिम यादी मुंबईवरून जाहीर होईल.- सीमा पांडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था