शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

बियाणांचा ४0 टक्के पुरवठा

By admin | Updated: May 29, 2014 02:18 IST

पाऊस पडताच शेतीच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे कृषी विभाग व शेतकरी वर्गाने ..

गडचिरोली : पाऊस पडताच शेतीच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे कृषी विभाग व शेतकरी वर्गाने बियाणे व खतांची जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली असून सध्यास्थितीत एकूण मागणीच्या ४0 टक्के बियाणे उपलब्ध झाले आहेत. प्रत्यक्ष बियाणे पेरणीला आणखी १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत शेतकर्‍यांना आवश्यक तेवढे बियाणे उपलब्ध होईल, असा विश्‍वास कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

काही वर्षापूर्वी शेतकरी वर्ग परंपरागत बियाणांचा वापर करीत होता. या बियाणांची उगवण क्षमता कमी राहत असल्याने बियाणांचा वापर जास्त करावा लागत होता. त्याचबरोबर या बियाणांमुळे उत्पादन वाढीस र्मयादा पडत होत्या. इतर क्षेत्राप्रमाणेच कृषी क्षेत्रातही संशोधन झाले. यामध्ये संकरीत वाणांचा शोध लावण्यात आला.

जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते. चालू खरीप हंगामात १ लाख ६५ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाणार आहे. एकूण उत्पादनात धान पिकाचा वाटा ८0 टक्केपेक्षाही जास्त आहे. चालू खरीप हंगामासाठी २५ हजार ७४0 क्विंटल बियाणांची गरज भासणार आहे. सध्यास्थितीत ११ हजार ४८२.३0 क्विंटल धान पिकाचे बियाणे उपलब्ध झाले आहे. धान पिकाचे पर्‍हे टाकण्यासाठी आणखी १५ ते २0 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत उर्वरीत बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे यावर्षी बियाणांची टंचाई भासणार नाही. यातून निर्माण होणारा काळाबाजारही थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.

नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोयाबिन या पिकाच्या पेर्‍यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सदर पीक मध्यम व कोरडवाहू जमीनीमध्ये घेता येत असल्याने दरवर्षी या पिकाखालील क्षेत्र वाढत असल्याचे दिसून येते.

धान पिकाच्या लागवडीपेक्षा सोयाबिन पिकाच्या लागवडीचा खर्च अत्यंत कमी आहे. एकदा पेरणी केल्यानंतर या पिकाची फारशी काळजी घेण्याची गरज राहत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग या पिकाकडे वळत चालला आहे. त्याचबरोबर जी जमीन आजपर्यंत पडीत होती. अशा जमीनीत सोयाबिनचे उत्पादन घेतले जात आहेत. चालू खरीप हंगामात ४ हजार ३५0 हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी १ हजार ९५७ क्विंटल बियाणांची गरज भासणार आहे. त्यापैकी ५७.६0 क्विंटल बियाणे उपलब्ध झाली आहेत.

उर्वरीत बियाणे पाऊस पडेपर्यंत उपलब्ध होतील, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे. सोयाबिन पिकानंतर तूर, कापूस, मका, उडीद याही पिकांचे जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यासाठीसुध्दा आवश्यक असलेले बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

(नगर प्रतिनिधी)