शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

४० सिंचन विहिरी अपूर्णच

By admin | Updated: May 24, 2016 01:30 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या तांत्रिक मान्यतेसह मंजूर झालेल्या ४० सिंचन विहिरी तीन वर्ष उलटूनही अपूर्ण स्थितीत आहेत.

तीन वर्षे उलटली : रोजगार हमी योजनेतून कामे मंजूरसिरोंचा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या तांत्रिक मान्यतेसह मंजूर झालेल्या ४० सिंचन विहिरी तीन वर्ष उलटूनही अपूर्ण स्थितीत आहेत. जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागाकडून सदर कामाची अंमलबजावणी होणे अपेक्षीत आहे. तथापी २०१६ चा खरीप हंगाम ऐन तोंडावर येऊनही संबंधित प्रशासनाकडून सिंचन विहीर बांधकामाबाबत हालचाली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये असंतोष व्याप्त आहे. उपरोक्त ४० सिंचन विहिरीच्या बांधकामासंदर्भात वरिष्ठ भूवैद्यानिकांनी रितसर शिफारस पत्रही दिले आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१२-१३ या वित्तीय वर्षात सिरोंचा तालुक्यातील एकूण १५८ सिंचन विहिरींचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सिरोंचा पंचायत समितीकडून सादर करण्यात आला. त्यानुसार सर्व विहिरींचा कार्यान्वय आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून पं.स. यंत्रणेस देण्यात आला. यापैकी आतापर्यंत ९८ लाभार्थ्यांच्या सिंचन विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले. उर्वरित ६० लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याच्या कारणामुळे त्यांच्या सिंचन विहिरींचे कामे स्थगित ठेवण्यात आली. या ६० विहिरींचा अनुशेष अद्यापही कायम आहे. असे असताना सन २०१३-१४ या वर्षात जि.प. सिरोंचा शाखेकडून नियोजनातल्या ४० विहिरींची प्रस्तावित यादी जिल्हाधिकारी कार्यालयास मंजुरीस्तव सादर करण्यात आली. हा प्रस्ताव कार्यकारी अभियंता (लघु पाटबंधारे विभाग) जि.प. गडचिरोली, सिरोंचा तहसीलदार तथा कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात आला. शिवाय कार्यकारी अभियंत्यांनी २९ आॅक्टोबर २०१३ च्या पत्रान्वये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकास पत्र दिले. या पत्रात भूजल उपलब्धता प्रमाणपत्रासह शिफारस व अभिप्राय देण्याची विनंती केली आहे.भूजल वैज्ञानिकांनी ७ डिसेंबर २०१३ च्या पत्रान्वये तशी अनुकूलता दर्शविणारी पत्र कार्यकारी अभियंत्यांना दिले. या पत्राच्या प्रतिलिपी सिरोंचा तहसीलदार, सिंचाई उपविभागाचे अहेरी स्थित उपविभागीय अधिकारी यांनाही दिले आहे. असे असूनही संबंधित लाभार्थी वंचितच आहेत. (तालुका प्रतिनिधी)असा आहे मंत्रालयीन आदेशशेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी संदर्भात शासन निर्णय क्रमांक नियोजन विभाग मग्रारोहयो / २०११ / प्र. क्र. २४/ रोहयो - १० अ / मंत्रालय मुंबई दिनांक १० मार्च २०११ चा सुस्पष्ट आहे. शासन निर्णय असूनही मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे पात्र लाभार्थ्यांनाही सिंचन विहिरीच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.