शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

४ लाख ७३ हजार प्रलंबित : मानधन शिक्षक अडचणीत

By admin | Updated: August 7, 2016 01:38 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यात १० हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चालविले जातात.

 गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यात १० हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चालविले जातात. यामध्ये माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच या शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागेवर गतवर्षी कंत्राटी स्वरूपात नऊ शिक्षक घेण्यात आले. या शिक्षकांच्या मानधनापोटी तब्बल ४ लाख ७३ हजार ९०६ रूपये जिल्हा परिषदेकडे प्रलंबित आहेत. परिणामी सदर शिक्षक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये गरज नसतानाही शिक्षकांची अनेक पदे भरण्यात आली आहे. तर काही मोठ्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असून विद्यार्थी व पालकांकडून ओरड होत आहे. मात्र या संदर्भात जि.प.चा शिक्षण विभाग सुस्त आहे. जिल्हा परिषद अंतर्गत गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, घोट, मोहल्ली, बेडगाव, कुरूड, सिरोंचा, कोनसरी व एटापल्ली या १० ठिकाणी हायस्कूल आहेत. यापैकी सहा शाळांमध्ये विज्ञान व कला शाखेचे ११ वी व १२ वीचे वर्ग आहेत. गडचिरोली येथील जि.प. हायस्कूलमध्ये विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शिक्षकांचे दोन तर घोट येथे एक पद रिक्त आहे. याशिवाय अन्य जि.प. हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटला तरी रिक्त असलेल्या या शाळांमध्ये मानधन तत्वावरील कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी रिक्त असलेल्या जागेवर आपल्या स्तरावर मानधन शिक्षकांची नियुक्ती केली असल्याची माहिती आहे. २७ नोव्हेंबर २००६ च्या शासन निर्णयानुसार जि.प.च्या शिक्षण विभागाने गतवर्षी पाच हायस्कूलमध्ये नऊ शिक्षकांची मानधन तत्वावर नियुक्ती केली. मात्र या शिक्षकांच्या मानधनाचे तब्बल ४ लाख ७३ हजार रूपये जि.प.कडे प्रलंबित आहे. सदर पैसे अदा करण्यासाठी निधी मिळावा यासाठी जि.प.च्या शिक्षण विभागामार्फत शासनाकडे अनेकदा पत्र पाठवून पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र शासनाकडून शिक्षकांचे मानधन देण्यासाठी निधी मिळाला नाही. (स्थानिक प्रतिनिधी) पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष गडचिरोली शहरासह तालुका ठिकाणच्या गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या मोठ्या शाळा आहेत. शिवाय येथे इयत्ता बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. मात्र या ठिकाणी महत्त्वाच्या विषयांच्या शिक्षकांचे पदे रिक्त असताना सदर पदे भरण्याची कार्यवाही गेल्या वर्षभरापासून थंडबस्त्यात आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या बाबीकडे जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.