शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

४ लाख ७३ हजार प्रलंबित : मानधन शिक्षक अडचणीत

By admin | Updated: August 7, 2016 01:38 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यात १० हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चालविले जातात.

 गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यात १० हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चालविले जातात. यामध्ये माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच या शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागेवर गतवर्षी कंत्राटी स्वरूपात नऊ शिक्षक घेण्यात आले. या शिक्षकांच्या मानधनापोटी तब्बल ४ लाख ७३ हजार ९०६ रूपये जिल्हा परिषदेकडे प्रलंबित आहेत. परिणामी सदर शिक्षक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये गरज नसतानाही शिक्षकांची अनेक पदे भरण्यात आली आहे. तर काही मोठ्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असून विद्यार्थी व पालकांकडून ओरड होत आहे. मात्र या संदर्भात जि.प.चा शिक्षण विभाग सुस्त आहे. जिल्हा परिषद अंतर्गत गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, घोट, मोहल्ली, बेडगाव, कुरूड, सिरोंचा, कोनसरी व एटापल्ली या १० ठिकाणी हायस्कूल आहेत. यापैकी सहा शाळांमध्ये विज्ञान व कला शाखेचे ११ वी व १२ वीचे वर्ग आहेत. गडचिरोली येथील जि.प. हायस्कूलमध्ये विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शिक्षकांचे दोन तर घोट येथे एक पद रिक्त आहे. याशिवाय अन्य जि.प. हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटला तरी रिक्त असलेल्या या शाळांमध्ये मानधन तत्वावरील कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी रिक्त असलेल्या जागेवर आपल्या स्तरावर मानधन शिक्षकांची नियुक्ती केली असल्याची माहिती आहे. २७ नोव्हेंबर २००६ च्या शासन निर्णयानुसार जि.प.च्या शिक्षण विभागाने गतवर्षी पाच हायस्कूलमध्ये नऊ शिक्षकांची मानधन तत्वावर नियुक्ती केली. मात्र या शिक्षकांच्या मानधनाचे तब्बल ४ लाख ७३ हजार रूपये जि.प.कडे प्रलंबित आहे. सदर पैसे अदा करण्यासाठी निधी मिळावा यासाठी जि.प.च्या शिक्षण विभागामार्फत शासनाकडे अनेकदा पत्र पाठवून पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र शासनाकडून शिक्षकांचे मानधन देण्यासाठी निधी मिळाला नाही. (स्थानिक प्रतिनिधी) पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष गडचिरोली शहरासह तालुका ठिकाणच्या गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या मोठ्या शाळा आहेत. शिवाय येथे इयत्ता बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. मात्र या ठिकाणी महत्त्वाच्या विषयांच्या शिक्षकांचे पदे रिक्त असताना सदर पदे भरण्याची कार्यवाही गेल्या वर्षभरापासून थंडबस्त्यात आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या बाबीकडे जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.