शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

३८९ लाभार्थ्यांना विमा योजनेचा लाभ

By admin | Updated: December 15, 2014 22:56 IST

२००७ पासून सुरू झालेल्या आम आदमी विमा योजनेचा आजपर्यंत ३७९ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून या योजनेचे जिल्ह्यात ४७ हजार ७८२ सदस्य आहेत.

गडचिरोली : २००७ पासून सुरू झालेल्या आम आदमी विमा योजनेचा आजपर्यंत ३७९ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून या योजनेचे जिल्ह्यात ४७ हजार ७८२ सदस्य आहेत. गरीब व्यक्तीला विमा संरक्षण मिळावे यासाठी शासनाने आम आदमी विमा योजना राज्यात २७ आॅक्टोबर २००७ पासून सुरू केली आहे. या योजनेचा लाभ भूमिहीन शेतमजूर, १ हेक्टर बागायती किंवा २ हेक्टर कोरडवाहू शेती असलेल्या नागरिकाला देण्यात येतो. त्यासाठी लाभार्थ्याचे वय १८ ते ५९ यादरम्यान असणे आवश्यक असून सदर नागरिकाचे नाव बीपीएल यादीमध्ये असणे गरजेचे आहे. नागरिकाने आम आदमी विमा योजनेचा अर्ज तलाठ्याकडे भरून दिल्यानंतर सदर व्यक्तीचा शासनाकडून विमा काढला जातो. या लाभार्थ्याचा विम्याचा वार्षिक हप्ता २०० रूपये राज्य शासनाकडून भरण्यात येते. लाभार्थ्याला स्वत:कडचे पाचही पैसे खर्च करावे लागत नाही. विशेष म्हणजे एकदा तलाठ्याकडे अर्ज केल्यानंतर लाभार्थ्याला काहीच करावे लागत नाही. दरवर्षीचा विमा शासनाकडूनच भरल्या जातो. गडचिरोली जिल्ह्यात भूमिहीन व अल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे या योजनेचे अधिकाधीक सदस्य होतील, याकडे महसूल विभागाने विशेष लक्ष घातले आहे. व्यापक प्रमाणात या योजनेची जनजागृती करण्यात येत आहे. महसूल विभागाचे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन या योजनेविषयी जनजागृती करीत आहेत. योजनेच्या सुरूवातीपासून आजपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात या योजनेचे ४७ हजार ७८२ सदस्य झाले आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ६ हजार ४२२, धानोरा ४ हजार ४०५, चामोर्शी ८ हजार ७५७, मुलचेरा ३ हजार ४२८, आरमोरी २ हजार ५८५, देसाईगंज २ हजार २१३, कुरखेडा ५ हजार ८२, कोरची १ हजार ९३०, अहेरी २ हजार ८१५, सिरोंचा ४ हजार ३८६, एटापल्ली ३ हजार ७५३, भामरागड २ हजार १६७ लाभार्थी बनले आहेत. या सर्वांचा विमा काढण्यात आला आहे. योजनेचे सदस्य असलेल्या ३५७ नागरिकांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३० हजार रूपयांची मदत देण्यात आली आहे. अपघाती मृत्यू झालेल्या २१ लाभार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ७५ हजार रूपये मदत तर एका अपंग लाभार्थ्याला ३७ हजार ५०० रूपयांची मदत देण्यात आली आहे. यामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)