शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

३,६८० विद्यार्थ्यांनी दिली चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:56 IST

राष्टÑीय संपादणूक सर्वेक्षण २०१७ अंतर्गत जिल्ह्यातील संपूर्ण १२ तालुक्यात इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या वर्गाची संपादणूक चाचणी परीक्षा घेण्यात आली.

ठळक मुद्देराष्टÑीय संपादणूक परीक्षा : जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद, शिक्षकांनी भरली प्रश्नावली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्टÑीय संपादणूक सर्वेक्षण २०१७ अंतर्गत जिल्ह्यातील संपूर्ण १२ तालुक्यात इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या वर्गाची संपादणूक चाचणी परीक्षा घेण्यात आली. या चाचणीला चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्हाभरातील ३ हजार ६८० विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा दिली.राष्टÑीय अभ्यासक्रम ठरविताना तिसरी, पाचवी व आठवीचे वर्ग अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या वर्गांची चाचणी घेऊनच अभ्यासक्रम ठरविला जातो. सध्या अस्तित्वात असलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य आहे किंवा नाही हे जाणून घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शिकण्याची अभियोग्यता समजून घेण्याच्या उद्देशाने राष्टÑीयस्तरावर एकाच दिवशी राष्टÑीय संपादणूक पातळी चाचणी परीक्षा घेण्यात आली. तिसरीच्या १ हजार १४, पाचवीच्या १ हजार २४१ व आठवीच्या १ हजार ४२५ अशा एकूण ३ हजार ६८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही प्रश्नावली देण्यात आली होती. सुमारे ३८३ शिक्षकांनी प्रश्नावली भरून दिली. परीक्षा घेण्यासाठी २९० क्षेत्रीय अन्वेशकांची नेमणूक करण्यात आली होती. जिल्हास्थळावरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पथक व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे (डायट)चे बाराही तालुक्यात संपर्क अधिकारी नेमण्यात आले होते. गटसाधन केंद्रांमार्फत विशेष संनियंत्रकाचे नेमणूक करण्यात आली होती. डायटचे प्राचार्य डॉ. शरदचंद्र पाटील, ज्येष्ठ अधिव्याख्याता तथा जिल्हा समन्वयक राजेश रूद्रकार, जिल्हा सहसमन्वयक विठ्ठल हांडे यांनी या परीक्षेचे नियोजन केले. सर्व क्षेत्रीय अन्वेशकांना तीनदा प्रशिक्षण देण्यात आले होते. इयत्ता तिसरी व पाचवीकरिता भाषा, गणित व पर्यावरण या विषयाकरिता एकूण ४५ गुण ठेवण्यात आले होते. आठवीकरिता भाषा, गणित, पर्यावरण या विषयाबरोबरच सामाजिकशास्त्र हा विषयसुध्दा होता. त्यामुळे आठवीची परीक्षा ६० गुणांची होती.२० शाळांची निवडअहेरी : राष्ट्रीय गुणवत्ता सर्वेक्षण २०१७ अंतर्गत सोमवारी अहेरी तालुक्यात एकाच दिवशी व एकाच वेळी २० शाळेतील इयत्ता तीसरी, पाचवी व आठवीच्या एकूण ४३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात जिल्हा परिषदेच्या आठ शाळा व खाजगी व्यवस्थापनाच्या बारा शाळांची निवड करण्यात आली होती. इयत्ता तीसरीचे १२६ विद्यार्थी, पाचवीचे १५० विद्यार्थी व इयत्ता आठवीचे १६१ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०१७ ची परीक्षा दिली. या परीक्षेकरीता डायट संस्थेकडून अन्वेक्षकांची नीयुक्ती करण्यात आली होती. डायट संस्थेकडून अहेरी तालुका संपर्क अधिकारी म्हणून कुणाल कोवे, डी. जे. गायकवाड, बी. के. गडदे, निर्मला वैद्य, गटसमन्वयक ताराचंद भुरसे, प्रकाश दुर्गे, सुषमा खराबे, अरुण जकोजवार, प्रविणा कांबळे, दिपा रामटेके, कापगते, राजू नागरे, किशोर मेश्राम, जीतेंद्र राहुड, पंकज मानकर, तेजराम दुर्गे व शिक्षण विभागच्या इतर कर्मचाºयांनी सहकार्य केले.