शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

३,६८० विद्यार्थ्यांनी दिली चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:56 IST

राष्टÑीय संपादणूक सर्वेक्षण २०१७ अंतर्गत जिल्ह्यातील संपूर्ण १२ तालुक्यात इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या वर्गाची संपादणूक चाचणी परीक्षा घेण्यात आली.

ठळक मुद्देराष्टÑीय संपादणूक परीक्षा : जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद, शिक्षकांनी भरली प्रश्नावली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्टÑीय संपादणूक सर्वेक्षण २०१७ अंतर्गत जिल्ह्यातील संपूर्ण १२ तालुक्यात इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या वर्गाची संपादणूक चाचणी परीक्षा घेण्यात आली. या चाचणीला चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्हाभरातील ३ हजार ६८० विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा दिली.राष्टÑीय अभ्यासक्रम ठरविताना तिसरी, पाचवी व आठवीचे वर्ग अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या वर्गांची चाचणी घेऊनच अभ्यासक्रम ठरविला जातो. सध्या अस्तित्वात असलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य आहे किंवा नाही हे जाणून घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शिकण्याची अभियोग्यता समजून घेण्याच्या उद्देशाने राष्टÑीयस्तरावर एकाच दिवशी राष्टÑीय संपादणूक पातळी चाचणी परीक्षा घेण्यात आली. तिसरीच्या १ हजार १४, पाचवीच्या १ हजार २४१ व आठवीच्या १ हजार ४२५ अशा एकूण ३ हजार ६८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही प्रश्नावली देण्यात आली होती. सुमारे ३८३ शिक्षकांनी प्रश्नावली भरून दिली. परीक्षा घेण्यासाठी २९० क्षेत्रीय अन्वेशकांची नेमणूक करण्यात आली होती. जिल्हास्थळावरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पथक व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे (डायट)चे बाराही तालुक्यात संपर्क अधिकारी नेमण्यात आले होते. गटसाधन केंद्रांमार्फत विशेष संनियंत्रकाचे नेमणूक करण्यात आली होती. डायटचे प्राचार्य डॉ. शरदचंद्र पाटील, ज्येष्ठ अधिव्याख्याता तथा जिल्हा समन्वयक राजेश रूद्रकार, जिल्हा सहसमन्वयक विठ्ठल हांडे यांनी या परीक्षेचे नियोजन केले. सर्व क्षेत्रीय अन्वेशकांना तीनदा प्रशिक्षण देण्यात आले होते. इयत्ता तिसरी व पाचवीकरिता भाषा, गणित व पर्यावरण या विषयाकरिता एकूण ४५ गुण ठेवण्यात आले होते. आठवीकरिता भाषा, गणित, पर्यावरण या विषयाबरोबरच सामाजिकशास्त्र हा विषयसुध्दा होता. त्यामुळे आठवीची परीक्षा ६० गुणांची होती.२० शाळांची निवडअहेरी : राष्ट्रीय गुणवत्ता सर्वेक्षण २०१७ अंतर्गत सोमवारी अहेरी तालुक्यात एकाच दिवशी व एकाच वेळी २० शाळेतील इयत्ता तीसरी, पाचवी व आठवीच्या एकूण ४३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात जिल्हा परिषदेच्या आठ शाळा व खाजगी व्यवस्थापनाच्या बारा शाळांची निवड करण्यात आली होती. इयत्ता तीसरीचे १२६ विद्यार्थी, पाचवीचे १५० विद्यार्थी व इयत्ता आठवीचे १६१ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०१७ ची परीक्षा दिली. या परीक्षेकरीता डायट संस्थेकडून अन्वेक्षकांची नीयुक्ती करण्यात आली होती. डायट संस्थेकडून अहेरी तालुका संपर्क अधिकारी म्हणून कुणाल कोवे, डी. जे. गायकवाड, बी. के. गडदे, निर्मला वैद्य, गटसमन्वयक ताराचंद भुरसे, प्रकाश दुर्गे, सुषमा खराबे, अरुण जकोजवार, प्रविणा कांबळे, दिपा रामटेके, कापगते, राजू नागरे, किशोर मेश्राम, जीतेंद्र राहुड, पंकज मानकर, तेजराम दुर्गे व शिक्षण विभागच्या इतर कर्मचाºयांनी सहकार्य केले.