शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

३६ गावे बनली ११ कोटींची मालक

By admin | Updated: September 22, 2016 02:19 IST

१९९६ च्या पेसा कायद्याच्या अंमलबजावणीची अधिसूचना राज्यपालांनी सन २०१४ मध्ये काढली.

पेसा क्षेत्रातील ग्राम : बांबू तोड, विक्री, व्यवस्थापनात ग्रामसभांची भरीव कामगिरीदिलीप दहेलकर गडचिरोली१९९६ च्या पेसा कायद्याच्या अंमलबजावणीची अधिसूचना राज्यपालांनी सन २०१४ मध्ये काढली. या अधिसूचनेनुसार पेसा क्षेत्रातील गावांना गावालगतच्या जंगलातील तेंदू, बांबू व इतर वनोपजाची तोड, विक्री व व्यवस्थापन करण्याचा अधिकार व मालकी मिळाली. त्यानुसार तीन वन विभागातील तब्बल ३६ गावांनी सन २०१५-१६ या वर्षात बांबू व्यवस्थापनात भरीव कामगिरी करून ११ कोटी ४९ लाख ४४ हजार २८० रूपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. यातून सदर गावे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले आहेत. बांबू व्यवस्थापनाच्या माध्यमातून मिळालेल्या लाखो रूपयातून दुर्गम गावांमध्ये विविध प्रकारची विकास कामे सुरू करण्यात आली आहेत. शासनाच्या धोरणाचा गावांना फायदा होत आहे.गडचिरोली जिल्ह्यात ८० टक्के जंगल असून येथील आदिवासी नागरिक पारंपरिक वनोपजावर आपली उपजीविका भागवित होते. मात्र वनोपजांचे सर्व हक्क, अधिकार व मालकी वन विभागाला होते. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील गावांना या जंगलाचा फारसा फायदा होत नव्हता. त्यामुळे केंद्र शासनाने १९९६ मध्ये पेसा कायदा संमत केला. त्यानंतर राज्यपालांनी २०१४ मध्ये वनोपजाची मालकी ग्रामसभांना देण्याबाबत अधिसूचना काढली. या अधिसूचननेनुसार पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना तेंदू, बाबू व इतर वनोपजाची मालकी तसेच तोड, विक्री व व्यवस्थापन करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. या अधिसूचनेनुसार वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली वनवृत्तातील भामरागड, वडसा व गडचिरोली या तीन वन विभागातील एकूण ८१ ग्रामसभांनी सन २०१५-१६ या वर्षात तेंदू व्यवस्थापनात सहभाग घेतला. यापैकी ३६ ग्रामसभांनी बांबू व्यवस्थापनात भरीव कामगिरी करून ११ कोटी ४९ लाख ४४ हजार २८० रूपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. भामरागड वन विभागातील एकूण ६० ग्रामसभांनी बांबू व्यवस्थापनात सहभाग दर्शविला. यापैकी ३२ ग्रामसभांनी ८ कोटी १ लाख ४४ हजार २८० रूपयांचे उत्पन्न मिळविले. यामध्ये कसनसूर, एटापल्ली, गट्टा, ताडगाव व भामरागड वनपरिक्षेत्रातील ग्रामसभांचा समावेश आहे. वडसा वन विभागातील १२ ग्रामसभांनी बांबू व्यवस्थापनात सहभाग दर्शविला. यापैकी बेडगाव, पुराडा, देलनवाडी वनपरिक्षेत्रातील चार ग्रामसभांनी ३ कोटी ४८ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त केले. गडचिरोली वन विभागातील ९ ग्रामसभांनी बांबू व्यवस्थापनात सहभाग घेतला. मात्र एकाही ग्रामसभेने वन विभागाकडे मिळालेल्या आर्थिक उत्पन्नाची माहिती अद्यापही दिली नाही. ४५ ग्रामसभांची माहिती अप्राप्तसन २०१५-१६ या वर्षात भामरागड, वडसा व गडचिरोली या तीन वन विभागातील पेसा क्षेत्रातील एकूण ८१ ग्रामसभांनी बांबूची तोड, विक्री व व्यवस्थापन कार्यात सहभाग दर्शविला. बहुतांश ग्रामसभांनी जाहीर लिलाव प्रक्रिया राबवून बांबूची विक्री करून त्याची विल्हेवाट लावली. मात्र अद्यापही गडचिरोली वनवृत्त कार्यालयाला ४५ ग्रामसभांनी प्राप्त आर्थिक उत्पन्नाबाबतची माहिती दिली नाही. त्यामुळे या ४५ ग्रामसभांना बांबू व्यवस्थापनातून नेमके किती आर्थिक उत्पन्न मिळाले, याची माहिती वन विभागाला कळू शकली नाही. ११ लाख ५४ हजार बांबू बंडलची विक्रीभामरागड व वडसा वन विभागाच्या पेसा क्षेत्रातील ३६ ग्रामसभांनी सन २०१५-१६ या वर्षात एकूण ९ हजार लांब बांबूची विक्री केली. तसेच लिलाव प्रक्रिया राबवून ११ लाख ५४ हजार ६१२ इतक्या बांबू बंडलची विक्री केली. यामध्ये लांब बांबूतून ३६ ग्रामसभांना २ लाख ५० हजार रूपये व बांबू बंडल्समधून ११ कोटी ४६ लाख ९४ हजार २८० असे एकूण ११ कोटी ४९ लाख ४४ हजार २८० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुढील वर्षात ग्रामसभांचा सहभाग वाढणारपेसा क्षेत्रातील ग्रामसभा (गावांनी) तेंदू व बांबू तोड, विक्री व व्यवस्थापन कार्यात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, यासाठी वन विभाग व जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत ग्रामसभेचे अध्यक्ष, सचिव यांची कार्यशाळा घेण्यात येत आहे. आतापर्यंत आठ ते दहा ठिकाणी अशा कार्यशाळा पार पडल्या आहेत. या कार्यशाळेत ग्रामसभेच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न वन विभाग व पंचायत विभागाचे अधिकारी करीत आहेत. त्यामुळे सन २०१६-१७ या वर्षात बांबू व तेंदूच्या व्यवस्थापन कार्यात ग्रामसभांचा सहभाग वाढणार आहे.