शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
3
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
4
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
5
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
6
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
7
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
8
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
9
टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान
10
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
11
रशियाच्या शत्रू जमिनीवर गरजले भारताचे सुखोई ३० जेट; भारतीय पायलटनं उडवलं F15 विमान, चीन चिंतेत
12
Latur: अश्लील व्हिडीओ आणि तिसरीतील विद्यार्थ्याने वर्गमित्रासोबतच अनैसर्गिक...; लातुरमधील शाळेतील घटना
13
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
14
IPL स्टार खेळाडूवर अत्याचाराचा आरोप; तर तरुणी ब्लॅकमेल करत असल्याची क्रिकेटरची तक्रार
15
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
16
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
17
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
18
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
19
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
20
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
Daily Top 2Weekly Top 5

३४.५४ कोटींची मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:14 IST

पावसाची कमतरता आणि ढगाळ वातावरणामुळे धान व कापसावर आलेल्या रोगराईचा यावर्षी अनेक शेतकºयांना फटका बसला. या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीच्या निकषानुसार जिल्ह्यात ३४ कोटी ५४ लाख रुपयांची मदत ....

ठळक मुद्देरोगग्रस्त पिकांचे नुकसान : ६९ हजार ५१५ शेतकरी ठरले पात्र

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाची कमतरता आणि ढगाळ वातावरणामुळे धान व कापसावर आलेल्या रोगराईचा यावर्षी अनेक शेतकºयांना फटका बसला. या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीच्या निकषानुसार जिल्ह्यात ३४ कोटी ५४ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी ६९ हजार ५१५ शेतकरी पात्र ठरले आहेत.जिल्ह्यात धान या मुख्य पिकासोबत काही प्रमाणात कापसाचेही पीक घेतले जाते. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार यावर्षी १ लाख ३९ हजार ४८५ शेतकºयांनी १ लाख ७३ हजार २५९ हेक्टर क्षेत्रावर धानपीकाची लागवड केली होती. त्यापैकी ६८ हजार ६०३ शेतकऱ्यांच्या ३२ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रावरील धानपीकाचे मावा-तुडतुड्यामुळे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यात कोरडवाहू (जिरायती) क्षेत्रावरील पीक १४ हजार ४५५ हेक्टर तर बागायती क्षेत्रावरील पीक १८ हजार ३४२ हेक्टर आहे. शासनाच्या निकषानुसार जिरायती क्षेत्रावरील ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानीसाठी ९ कोटी ५६ लाख १२ हजार ५५६ रुपयांचा मदत तर बागायती क्षेत्रावरील पीकासाठी २४ कोटी ५६ लाख ५८ हजार २८५ रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे.यावर्षी ८५६० शेतकऱ्यांनी ११ हजार ६५७ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. त्यापैकी ९१२ शेतकºयांच्या ५९७ हेक्टरवरील पीकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यात जिरायती शेतीचे क्षेत्र ५८३ हेक्टर तर बागायती क्षेत्र अवघे १४ हेक्टर आहे. या शेतकऱ्यांना ४१ लाख ३६ हजार १४० रुपयांची मदत मिळणार आहे. कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी पात्र असणाºया या शेतकऱ्यांची माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठविली आहे. त्यांच्यामार्फत ही माहिती राज्य शासनाकडे गेल्यानंतर शासन स्तरावर प्रत्यक्ष मदतीची रक्कम मंजूर केली जाईल. त्यासाठी काही महिन्यांची प्रतीक्षा शेतकºयांना करावी लागणार आहे.शासन निर्णयानुसार ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान असणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा लाभ दिला जाणार आहे. विशेष म्हणजे सिरोंचा आणि एटापल्ली या दोन तालुक्यातील एकही शेतकरी धान किंवा कापूस पिकाच्या नुकसानीसाठी पात्र ठरलेला नाही.६८०० ते २७ हजारापर्यंत मदत मिळणारराज्य शासनाच्या जीआरनुसार जिरायती शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी ६८०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) तर बागायती शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) अशी मदत मिळणार आहे. त्यामुळे मदतीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना किमान ६८०० ते जास्तीत जास्त २७ हजार एवढी मदत मिळणार आहे.कृषी विभागामुळे अहवालास विलंबजिल्हाधिकाऱ्यांनी ८ डिसेंबरला काढलेल्या आदेशानुसार १५ दिवसात पिकांच्या सर्व्हेक्षणाचा अहवाल सादर करायचा होता. परंतु त्यासाठी कृषी विभागाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला. विशेष म्हणजे आॅक्टोबर २०१७ पर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा अहवालही कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेला नाही. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या कार्यप्रमाणीवर संताप व्यक्त केला जात आहे.