शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

३४.५४ कोटींची मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:14 IST

पावसाची कमतरता आणि ढगाळ वातावरणामुळे धान व कापसावर आलेल्या रोगराईचा यावर्षी अनेक शेतकºयांना फटका बसला. या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीच्या निकषानुसार जिल्ह्यात ३४ कोटी ५४ लाख रुपयांची मदत ....

ठळक मुद्देरोगग्रस्त पिकांचे नुकसान : ६९ हजार ५१५ शेतकरी ठरले पात्र

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाची कमतरता आणि ढगाळ वातावरणामुळे धान व कापसावर आलेल्या रोगराईचा यावर्षी अनेक शेतकºयांना फटका बसला. या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीच्या निकषानुसार जिल्ह्यात ३४ कोटी ५४ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी ६९ हजार ५१५ शेतकरी पात्र ठरले आहेत.जिल्ह्यात धान या मुख्य पिकासोबत काही प्रमाणात कापसाचेही पीक घेतले जाते. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार यावर्षी १ लाख ३९ हजार ४८५ शेतकºयांनी १ लाख ७३ हजार २५९ हेक्टर क्षेत्रावर धानपीकाची लागवड केली होती. त्यापैकी ६८ हजार ६०३ शेतकऱ्यांच्या ३२ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रावरील धानपीकाचे मावा-तुडतुड्यामुळे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यात कोरडवाहू (जिरायती) क्षेत्रावरील पीक १४ हजार ४५५ हेक्टर तर बागायती क्षेत्रावरील पीक १८ हजार ३४२ हेक्टर आहे. शासनाच्या निकषानुसार जिरायती क्षेत्रावरील ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानीसाठी ९ कोटी ५६ लाख १२ हजार ५५६ रुपयांचा मदत तर बागायती क्षेत्रावरील पीकासाठी २४ कोटी ५६ लाख ५८ हजार २८५ रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे.यावर्षी ८५६० शेतकऱ्यांनी ११ हजार ६५७ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. त्यापैकी ९१२ शेतकºयांच्या ५९७ हेक्टरवरील पीकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यात जिरायती शेतीचे क्षेत्र ५८३ हेक्टर तर बागायती क्षेत्र अवघे १४ हेक्टर आहे. या शेतकऱ्यांना ४१ लाख ३६ हजार १४० रुपयांची मदत मिळणार आहे. कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी पात्र असणाºया या शेतकऱ्यांची माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठविली आहे. त्यांच्यामार्फत ही माहिती राज्य शासनाकडे गेल्यानंतर शासन स्तरावर प्रत्यक्ष मदतीची रक्कम मंजूर केली जाईल. त्यासाठी काही महिन्यांची प्रतीक्षा शेतकºयांना करावी लागणार आहे.शासन निर्णयानुसार ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान असणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा लाभ दिला जाणार आहे. विशेष म्हणजे सिरोंचा आणि एटापल्ली या दोन तालुक्यातील एकही शेतकरी धान किंवा कापूस पिकाच्या नुकसानीसाठी पात्र ठरलेला नाही.६८०० ते २७ हजारापर्यंत मदत मिळणारराज्य शासनाच्या जीआरनुसार जिरायती शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी ६८०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) तर बागायती शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) अशी मदत मिळणार आहे. त्यामुळे मदतीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना किमान ६८०० ते जास्तीत जास्त २७ हजार एवढी मदत मिळणार आहे.कृषी विभागामुळे अहवालास विलंबजिल्हाधिकाऱ्यांनी ८ डिसेंबरला काढलेल्या आदेशानुसार १५ दिवसात पिकांच्या सर्व्हेक्षणाचा अहवाल सादर करायचा होता. परंतु त्यासाठी कृषी विभागाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला. विशेष म्हणजे आॅक्टोबर २०१७ पर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा अहवालही कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेला नाही. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या कार्यप्रमाणीवर संताप व्यक्त केला जात आहे.