शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांत जिल्ह्यात आदिवासींच्या ३४१ तर दलितांच्या २२ हत्या

By admin | Updated: July 11, 2015 02:29 IST

पोलीस विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार १९९० पासून आतापर्यंत १५ वर्षांच्या कालावधीत नक्षल्यांकडून गडचिरोली जिल्ह्यातील ३४१...

सुनील खोब्रागडे यांचा आरोप : दलित व आदिवासी नक्षल्यांच्या टार्गेटवरगडचिरोली : पोलीस विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार १९९० पासून आतापर्यंत १५ वर्षांच्या कालावधीत नक्षल्यांकडून गडचिरोली जिल्ह्यातील ३४१ आदिवासी नागरिकांच्या तर २२ दलित नागरिकांच्या हत्या झाल्या आहेत. जातीद्वेष भावनेतून नक्षल्यांकडून आदिवासी व दलितांच्या मोठ्या हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत, असा आरोप स्वारीप युथ रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष तथा एका वृत्तपत्राचे संपादक सुनील खोब्रागडे यांनी बुधवारी गडचिरोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.यावेळी बोलताना सुनील खोब्रागडे म्हणाले, महाराष्ट्र राज्यात दलित, आदिवासी व इतर दुर्बल घटकातील नागरिकांच्या अत्याचाऱ्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावर असून अहमदनगर जिल्हा अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. नक्षल चळवळीतील वरिष्ठ जातीच्या नेत्यांनी जातीय दृष्टिकोनातून गडचिरोली जिल्ह्यात गेल्या १५ वर्षांत दलित व आदिवासी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात हत्या केल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १५ वर्षांत ओबीसी प्रवर्गातील नऊ नागरिकांच्या हत्या झाल्याची नोंद पोलीस विभागाकडे आहे, असेही खोब्रागडे म्हणाले. नक्षल्यांकडून दलित व आदिवासी नागरिकांच्या झालेल्या हत्या संदर्भात संबंधित आरोपींवर भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास केला जातो. मात्र जातीय द्वेषभावनेतून आदिवासी व दलितांच्या हत्या झाल्या आहेत. या हत्यांच्या गुन्ह्याचा तपास पोलीस विभागाने जातीयदृष्टिकोनातून करावा, नक्षल्यांकडून आदिवासी व दलितांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी भादंविच्या विविध कलमासोबतच अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, तसेच या हत्या जातीय हत्या म्हणून घोषित करण्यात याव्या, अशी मागणी खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना आपण दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अहेरी तालुक्यातील दामरंचा येथील रहिवासी पत्रू दुर्गे याची २०१५ च्या मे महिन्यात नक्षल्यांनी जातीय द्वेषभावनेतून हत्या केली, असा आरोप खोब्रागडे यांनी केला. ग्राम पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर दामरंचाचे सरपंचपद अनुसूचित जातीकरिता राखीव करण्यात आले. त्यानंतर काही दिवसात नक्षल्यांनी पत्रू दुर्गे याची हत्या केली, असे स्वारिप युथ रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष खोब्रागडे यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)