शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

३२ हजार विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 22:19 IST

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वतीने व्यसनमुक्ती जागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मागील चार वर्षात जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीबाबत ३२ हजार ६८२ विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा उपक्रम : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वतीने व्यसनमुक्ती जागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मागील चार वर्षात जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीबाबत ३२ हजार ६८२ विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले आहे.प्रौढ नागरिकांबरोबरच मुलांमध्येही व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेष करून गडचिरोली जिल्ह्यातील शाळकरी व महाविद्यालयीन युवक खर्रा, तंबाखू, सिगारेट या व्यसनांच्या अधिन झाले असल्याचे दिसून येते. या व्यसनांचा त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होत चालला आहे. व्यसनांपासून युवकांना दूर ठेवून सुदृढ भारत निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आॅगस्ट २०१४ पासून सुरू केला आहे. सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत शालेय व महाविद्यालयीन स्तरावर कार्यशाळा घेतल्या जात आहेत. कला पथक, चलचित्र आदींच्या माध्यमातून गावपातळीवर सायंकाळी पोहोचून मार्गदर्शन केले जात आहे.जिल्हा सामान्य रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व जिल्हाभरातील ग्रामीण रूग्णालयांमध्ये १३ तंबाखू नियंत्रण समुपदेशन केंद्र बाह्यरूग्ण विभागातर्फे सुरू करण्यात आले आहेत. विविध पत्रके, माहिती पुस्तिका, फलके, कला पथक, दवंडी इत्यादी साधनांचा वापर करून जनजागृती केली जात आहे. शाळा व महाविद्यालयीन स्तरावर सुमारे १४० कार्यक्रम घेण्यात आले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे ३२ हजार ६८२ विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेऊन व्यसनमुक्तीच्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग करून घेतला जात आहे.३५ शाळा तंबाखूमुक्त घोषिततंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आजपर्यंत ३५ शाळा तंबाखुमुक्त घोषीत झाल्या आहेत. याबाबतचे फलक संबंधित शाळांनी लावले आहेत. ५०८ नागरिकांनी तंबाखु सोडला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाने दिली आहे.आणखी अधिक शाळा तंबाखुमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच कार्यक्रमांतर्गत ५०५ तंबाखु व खर्रा विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ९६ हजार ७१० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग, पोलीस विभाग यांनी केली आहे. जिल्ह सामान्य रूग्णालयाच्या चमूने सुध्दा ४१ पानठेल्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४ हजार २८० विद्यार्थ्यांना दंड वसूल केला आहे.८८४ नागरिकांची कॅन्सर रोगाची तपासणीनागरिकांना व्यसनमुक्त करण्याबरोबरच त्यांची आरोग्य विषयक तपासणीही केली जात आहे. मागील चार वर्षाच्या कालावधीत शाळा, महाविद्यालय, रूग्णालये या ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून सुमारे ८८४ नागरिकांची कॅन्सर रोगाबाबतची तपासणी करण्यात आली आहे. तंबाखुच्या व्यसनामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याची सर्वाधिक शक्यता राहत असल्याने सदर तपासणी अतिशय फायद्याची आहे.