शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

३१ ग्रामपंचायतीची निवड

By admin | Updated: October 5, 2014 23:04 IST

वार्षिक कृती आराखड्यासाठी निवडलेल्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये किमान शौचालय नसलेली १०० कुटुंब नसतील, अशा जिल्ह्यातील ३१ ग्रामपंचायतीची निवड राष्ट्रीय स्वच्छता अभियानासाठी

वार्षिक कृती आराखडा : ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेवर प्रशासनाचा भरगडचिरोली : वार्षिक कृती आराखड्यासाठी निवडलेल्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये किमान शौचालय नसलेली १०० कुटुंब नसतील, अशा जिल्ह्यातील ३१ ग्रामपंचायतीची निवड राष्ट्रीय स्वच्छता अभियानासाठी करण्यात आलेली आहे. या अभियानातून ग्रामीण भागात स्वच्छतेवर भर देण्याचा प्रयत्न प्रशासनाने चालविलेला आहे. केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेवर आधारित राष्ट्रीय कार्यक्रमाला बळकटी देण्याकरिता २३ आॅक्टोबरपर्यंत राज्यभरात राष्ट्रीय स्वच्छता अभियान या नावाने जनसंवाद माध्यमातून जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय बैठक पार पडली असल्याची माहिती मिळाली आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका, निर्मल दुत, रोजगार सेवक, जलसुरक्षा तसेच परिसर यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. या अभियानादरम्यान ग्रामीण भागातील कुटुंबांना भेटी देऊन ग्रामस्थांना शौचालय बांधणे व त्याचा वापर करणे, शाळांमध्ये मुला, मुलींसाठी स्वच्छतागृहाची उपलब्धता, हात धुण्याचे महत्व, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व परिसर स्वच्छता, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी व साठा आदीबाबत संदेश पोहोचविण्यासाठी तसेच ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी अधिकाधिक गृहभेटी करण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने भर दिला आहे. तालुकास्तरावरील कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून ग्रामस्तरावर सदर अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जि. प. प्रशासनाने केले आहे. वार्षिक कृती आराखड्यात निवड करण्यात आलेल्या ३१ ग्रामपंचायतीमध्ये कोरची तालुक्यातील सातपुती, बेतकाठी, बेडगाव, कुरखेडा तालुक्यातील पलसगड, बेलगाव, अंगारा, आरमोरी तालुक्यातील वैरागड, देऊळगाव, देसाईगंज तालुक्यातील एकलपूर, आमगाव, गडचिरोली तालुक्यातील अडपल्ली, गोगाव, मुडझा, काटली आदी गावांचा समावेश आहे. देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव, पोटगाव, विहिरगाव, सावंगी, कुरूड, तुळशी, शंकरपूर, कोकडी, बोडधा तसेच धानोरा तालुक्यातील लेका, मुलचेरा तालुक्यातील लगाम, एटापल्ली तालुक्यातील जांभिया, अहेरी तालुक्यातील महागाव खुर्द व सिरोंचा तालुक्यातील वडधम, डोंगरगाव, विसोरा आदी गावांचा समावेश आहे.विशेष अभियानांतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना वयक्तीक शौचालय बांधकामासाठी जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कोरची तालुक्यातील बेलगाव घाट, कोसमी क्र. २, नांगपूर, कुरखेडा तालुक्यातील शिवणी, घाटी, चिरचाडी, कढोली, खेडेगाव, नरचुली, कासवी, गडचिरोली तालुक्यातील विहीरगाव, चुरचुरा, वसा, मुरखळा व कोटगल आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील कारवाफा, मिचगाव बुज, दराची, सुंदरनगर, गोमणी, चामोर्शी तालुक्यातील हळदवाही, आष्टी, दुर्गापूर, गिलगाव, सोनापूर, एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्ली, वाघेझरी आदी ग्रामपंचायतीचा तसेच अहेरी तालुक्यातील नागेपल्ली, वेलगुर, देवलमरी, बोरी व सिरोंचा तालुक्यातील विठ्ठलराव पेठा या एकमेव ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीच्या गावात शौचालयाची निर्मिती होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)