शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

३० पासून बेमुदत उपोषण

By admin | Updated: March 20, 2015 01:24 IST

पेसा अधिसूचनेची जिल्ह्यात अंमलबजावणी केल्याने येथील गैर आदिवासींवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

गडचिरोली : पेसा अधिसूचनेची जिल्ह्यात अंमलबजावणी केल्याने येथील गैर आदिवासींवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेसा अधिसूचना रद्द करून सध्या सुरू असलेल्या पदभरतीला स्थगिती द्यावी अन्यथा ३० मार्च पासून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनातून पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, जिल्ह्यात एकुण लोकसंख्येच्या ६० टक्के जनता गैर आदिवासी आहे. तरीही ९ जून २०१४ रोजी तत्कालीन राज्यपालांनी अधिसूचना काढून जिल्ह्यातील गावांमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पदे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्याचा निर्णय घेतला. यामध्ये तलाठी, सर्वेक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, कृषी सहाय्यक, पशु सहाय्यक, परिचारिका, वनरक्षक व कोतवाल आदी पदांचा समावेश आहे. त्यामुळे सदर पद भरतीत गैर आदिवासींना स्थान मिळणार नाही. सर्वसाधारण पद भरतीत इतर मागास वर्गीयांना ६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पद भरतीत गैर आदिवासींवर अन्याय होत आहे, असे म्हटले आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी आव्हाड यांच्याशी चर्चा करून गैर आदिवासींच्या समस्या मांडल्या व पेसा अधिसूचना त्वरित रद्द करण्यासंबंधीचे निवेदन दिले. यावेळी जि. प. सभापती विश्वास भोवते, जि. प. सदस्य प्रशांत वाघरे, जगन्नाथ बोरकुटे, विनोद दशमुखे, सुनील वडेट्टीवार, विजय समर्थ, रवीकिरण समर्थ, राम लांजेवार, पंकज खरवडे, रामहरी उगले, महेंद्र शेंडे, मोहित धकाते, दिगांबर मानकर, जमाल सय्यद, उल्हास देशमुख, किशोर गद्देवार, संतोष बोलुवार, भाष्कर बुरे, विलास गावंडे उपस्थित होते.