शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या दुर्गम भागातही मिळणार ३-जी सेवा; ४० टॉवर्सला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 11:50 IST

जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात संपर्क माध्यमांची गरज लक्षात घेऊन बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ग्रामीण भागात नव्याने ४० टॉवर उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार ८१ टॉवर्सचे काम

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात भ्रमणध्वनी संपर्क अभावानेच होतो. या भागात संपर्क माध्यमांची गरज लक्षात घेऊन बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ग्रामीण भागात नव्याने ४० टॉवर उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या ४१ टॉवरच्या उभारणीचे कामही सुरू आहे.येत्या पावसाळ्यापूर्वी सर्व ८१ टॉवरची उभारणी करून दुर्गम भागात ३-जी आणि किमान २ जी सेवा पुरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नवीन टॉवरची उभारणी करताना जुन्या सर्व टॉवरची क्षमता वाढविली जात आहे. त्यावरून ३-जी इंटरनेट सेवा पुरविली जाणार आहे. सध्या ग्रामीण भागात खासगी मोबाईल कंपन्यांचे टॉवर मोजकेच आहेत. त्यामुळे नागरिकांना बीएसएनएल या सरकारी कंपनीची सेवा घ्यावी लागते. परंतु ही सेवाही अतिशय तोकड्या स्वरूपात आहे. मोबाईलचा आणि इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे योग्य सेवा देण्यासाठी बीएसएनएलने हालचाली सुरू केल्या आहेत. यापूर्वी मंजुरी मिळालेल्या ४१ टॉवरपैकी ५ गडचिरोली शहर व लगतच्या परिसरात तर ३६ शहराबाहेर लावले जात आहेत. आता आणखी ४० टॉवरला मंजुरी मिळाली असून ते सर्व ग्रामीण व दुर्गम भागात लागणार आहेत. ४०० किलोमीटरमध्ये पसरलेल्या या जिल्ह्यात सध्या बीएसएनएलचे केवळ १३८ टॉवर आहेत. याशिवाय सीआरपीएफच्या कॅम्पसाठी ४१ टॉवर लावले आहेत. त्यापैकी ३० टॉवरवरच इंटरनेट सुविधा आहे. मात्र आता सर्व टॉवरवरून हायस्पीड सेवा देण्यासाठी तयारी सुरू असल्याचे बीएसएनएलचे जिल्हा व्यवस्थापक एम.ए.जीवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.१९३ ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्याजिल्ह्यातील ग्रामपंचायती इंटरनेटने जोडण्यासाठी बीएसएनएलने काम सुरू केले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात २४० ग्रामपंचायतीत नेट सेवा सुरू केली जात आहे. आजमितीस त्यापैकी १९३ ग्रामपंचायती इंटरनेटने जोडण्यात आल्या असून उर्वरित काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांची अनेक कामे गावातूनच होणार आहेत. ग्रामपंचायतींसोबतच त्या गावातील शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालय, आरोग्य केंद्र, बँका व इतर शासकीय कार्यालयांमध्येही मागणीनुसार हायस्पीड इंटरनेट सेवा पुरविली जाणार आहे.

टॅग्स :Internetइंटरनेट