शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली व देसाईगंजमध्ये २९ इमारती धोकादायक

By admin | Updated: June 13, 2014 00:08 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज व गडचिरोली या दोन नगर पालिका क्षेत्रात २९ इमारती धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. यातील चार इमारती या अतिशय धोकादायक असल्याची माहिती

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज व गडचिरोली या दोन नगर पालिका क्षेत्रात २९ इमारती धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. यातील चार इमारती या अतिशय धोकादायक असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली आहे.गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज व गडचिरोली दोन नगर पालिकांतर्गत २९ धोकादायक इमारती आहेत. यामध्ये १० इमारती गडचिरोली शहरात आहेत. तर १९ इमारती देसाईगंजमध्ये आहेत. यातील चार या अतिशय धोकादायक आहेत. प्रत्येक पावसाळ्याच्यावेळी सदर इमारत मालकांना नोटीस बजाविली जाते. या पलिकडे कोणतीही कारवाई केली जात नाही. गडचिरोली नगर पालिकेने दोन वर्षापूर्वी एक इमारत पाडली. ज्या नागरिकांनी इमारती संदर्भात तक्रार दिली किंवा माहिती दिली तरच अशा ठिकाणी पालिका प्रशासनान जाऊन पोहोचते व त्या इमारतीची पाहणी करून तिच्या पाडण्याबाबतचा निर्णय घेतला जातो.

सध्यातरी या २९ इमारतींसह जिल्ह्यातील १२ तालुक्यात १२५ ते १५० इमारती या जीर्णावस्थेत असल्याच्या नोंदी त्या-त्या ग्रामपंचायतीकडे आहेत. परंतु गावतपातळीवर इमारत पाडण्याचे काम ग्रामपंचायतीची यंत्रणा करत नाही. अनेक इमारतींना टेकू लावून त्या इमारती तशाच ठेवल्या जातात. व पावसाळ्याच्या दिवसात भिंत कोसळून होणाऱ्या मृत्यूच्या घटनांना अशा इमारती कारणीभूत ठरतात. सिरोंचा तालुका मुख्यालयाच्या ठिकाणीही अनेक जुन्या इमारती आहेत. जिल्ह्यात अनेक शाळा अजूनही अशा इमारतीत चालतात. ग्रामीण भागात अनेक घरे मातीचे असून पावसाळ्याच्या दिवसात मातीच्या भिंती ओल्या होऊन कोसळू नये याकरीता या भिंतींना तुराट्यांचे कडे बांधले जातात. तसेच अनेक ठिकाणी फाटे लावून भिंतींना आधार दिला जातो. त्यामुळे ग्रामीण भागात मोडकळीस आलेल्या इमारती पाडण्याची कारवाई होत नाही. गडचिरोली व देसाईगंज नगर पालिकेच्या क्षेत्रातच २९ इमारती मोडकळीस आलेल्या व धोकादायक आहेत. गतवर्षी आरमोरी तालुक्यात पावसाळ्याच्या दिवसात भिंत कोसळून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गडचिरोली शहरात व देसाईगंमध्ये अशा इमारती अधिक असल्याने येथे पावसाळ्यापूर्वी पाडण्याची कारवाई होण्याची आवश्यकता आहे. परंतु नगर पालिका प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे दिसते. (जिल्हा प्रतिनिधी)