शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गडचिरोली व देसाईगंजमध्ये २९ इमारती धोकादायक

By admin | Updated: June 13, 2014 00:08 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज व गडचिरोली या दोन नगर पालिका क्षेत्रात २९ इमारती धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. यातील चार इमारती या अतिशय धोकादायक असल्याची माहिती

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज व गडचिरोली या दोन नगर पालिका क्षेत्रात २९ इमारती धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. यातील चार इमारती या अतिशय धोकादायक असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली आहे.गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज व गडचिरोली दोन नगर पालिकांतर्गत २९ धोकादायक इमारती आहेत. यामध्ये १० इमारती गडचिरोली शहरात आहेत. तर १९ इमारती देसाईगंजमध्ये आहेत. यातील चार या अतिशय धोकादायक आहेत. प्रत्येक पावसाळ्याच्यावेळी सदर इमारत मालकांना नोटीस बजाविली जाते. या पलिकडे कोणतीही कारवाई केली जात नाही. गडचिरोली नगर पालिकेने दोन वर्षापूर्वी एक इमारत पाडली. ज्या नागरिकांनी इमारती संदर्भात तक्रार दिली किंवा माहिती दिली तरच अशा ठिकाणी पालिका प्रशासनान जाऊन पोहोचते व त्या इमारतीची पाहणी करून तिच्या पाडण्याबाबतचा निर्णय घेतला जातो.

सध्यातरी या २९ इमारतींसह जिल्ह्यातील १२ तालुक्यात १२५ ते १५० इमारती या जीर्णावस्थेत असल्याच्या नोंदी त्या-त्या ग्रामपंचायतीकडे आहेत. परंतु गावतपातळीवर इमारत पाडण्याचे काम ग्रामपंचायतीची यंत्रणा करत नाही. अनेक इमारतींना टेकू लावून त्या इमारती तशाच ठेवल्या जातात. व पावसाळ्याच्या दिवसात भिंत कोसळून होणाऱ्या मृत्यूच्या घटनांना अशा इमारती कारणीभूत ठरतात. सिरोंचा तालुका मुख्यालयाच्या ठिकाणीही अनेक जुन्या इमारती आहेत. जिल्ह्यात अनेक शाळा अजूनही अशा इमारतीत चालतात. ग्रामीण भागात अनेक घरे मातीचे असून पावसाळ्याच्या दिवसात मातीच्या भिंती ओल्या होऊन कोसळू नये याकरीता या भिंतींना तुराट्यांचे कडे बांधले जातात. तसेच अनेक ठिकाणी फाटे लावून भिंतींना आधार दिला जातो. त्यामुळे ग्रामीण भागात मोडकळीस आलेल्या इमारती पाडण्याची कारवाई होत नाही. गडचिरोली व देसाईगंज नगर पालिकेच्या क्षेत्रातच २९ इमारती मोडकळीस आलेल्या व धोकादायक आहेत. गतवर्षी आरमोरी तालुक्यात पावसाळ्याच्या दिवसात भिंत कोसळून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गडचिरोली शहरात व देसाईगंमध्ये अशा इमारती अधिक असल्याने येथे पावसाळ्यापूर्वी पाडण्याची कारवाई होण्याची आवश्यकता आहे. परंतु नगर पालिका प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे दिसते. (जिल्हा प्रतिनिधी)