शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

२९,५९७ शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा

By admin | Updated: June 13, 2017 00:38 IST

शेतकऱ्यांच्या बहुचर्चित संप-आंदोलनानंतर सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याचे तत्त्वत: मान्य केले आहे.

१५२ कोटींची थकबाकी : अल्प व अत्यल्प भूधारकांच्या नवीन कर्जाचा मार्ग होणार मोकळालोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांच्या बहुचर्चित संप-आंदोलनानंतर सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याचे तत्त्वत: मान्य केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २९ हजार ५९७ शेतकऱ्यांकडे असलेले १५२ कोटी ४ लाख रुपयांचे थकीत कर्ज माफ होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यात अल्पभूधारकांना तातडीने कर्जमाफीचा लाभ देण्याचे जाहीर करण्यात आले असले तरी सोमवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत त्याबाबतचा आदेश बँकांकडे पोहोचलेला नव्हता. खरीप हंगामाला सुरूवात झाल्यामुळे आणि पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र जुन्या थकित कर्जामुळे नवीन हंगामासाठी कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी वैतागले होते. आता अल्प व अत्यल्पभूधारकांना ही कर्जमाफी लगेच लागू करण्याचे जाहीर झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.मार्च २०१७ पर्यंतच्या थकित कर्जाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास जिल्ह्यात सर्वाधिक २१ हजार २२१ शेतकरी ५० हजारापर्यंत कर्ज थकित असणारे आहेत. १ लाखापर्यंत कर्ज थकित असणारे ७ हजार १६७ शेतकरी, तर १ लाख ५० हजारापर्यंत कर्ज थकबाकी असणारे १ हजार २०९ शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना सर्वाधिक कृषी कर्ज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वाटप केले आहे. त्यामुळे या बँकेची थकबाकी सर्वाधिक ४८.७० कोटी रुपये आहे. त्या खालोखाल स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कृषी कर्जाची थकबाकी ४५.६९ कोटी आहे. इतर राष्ट्रीयकृत बँकांचे कर्जवाटप आणि थकबाकीही कमी आहे.एकूण थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये अत्यल्पभूधारक शेतकरी १० हजार ५५३ असून त्यांच्याकडे २९ कोटी ५ लाखांची थकबाकी आहे. अल्पभूधारक शेतकरी ११ हजार ४६२ आहे. त्यांच्याकडे ५५ कोटी ४३ लाखांची थकबाकी आहे, तर इतर मोठे शेतकरी ७५८४ असून त्यांच्याकडे ६७ कोटी ५६ लाखांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर आता कर्जमाफी होणारच असा विश्वास अनेकांना होता. पण सरकार आढेवेढे घेत असल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. आता एकदाची कर्जमाफी जाहीर केल्यामुळे पुढची प्रक्रियाही लवकरात लवकर करावी आणि नव्याने कर्ज देऊन खरीप हंगामाची सोय करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे ८४.४८ कोटींची थकबाकीजिल्ह्यात मार्च २०१७ पर्यंत कर्ज थकबाकी असणारे अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी २२ हजार १३ आहेत. त्यांच्याकडे ८४.४८ कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी तातडीने माफ केली जाणार असल्याचे घोषणा झाल्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. शासनाचा आदेश पोहोचताच या शेतकऱ्यांंना ‘नो ड्यू’ प्रमाणपत्र मिळण्याचा आणि नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शेतकऱ्यांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन बँकांनी योग्य व्यवस्था करणे गरजेचे आहे.आंदोलने शांतराज्यात शेतकऱ्यांचा संप तीव्र होत असताना सुरूवातीचे चार दिवस गडचिरोली जिल्ह्यात या संपाचा कोणताही परिणाम दिसत नव्हता. त्यानंतर शिवसेनेने दररोज एका-एका तालुक्यात रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यानंतर काँग्रेस पक्षानेही अधिकाऱ्यांना निवेदने देऊन संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत या आंदोलनात आपले अस्तित्व दाखविले नाही. कर्जमाफीची घोषणा होत नसल्याचे पाहून काँग्रेसने रस्त्यावरून उतरून आंदोलन करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र त्यांना ती संधी मिळालीच नाही. रविवारी कर्जमाफीच्या निर्णयानंतर सर्वांचीच आंदोलने शांत झाली. त्यातच दोन दिवसांपासून पावसाचे आगमन होत असल्याने आंदोलनापाठोपाठ वातावरणही थंड झाले आहे.