शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

२९,५९७ शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा

By admin | Updated: June 13, 2017 00:38 IST

शेतकऱ्यांच्या बहुचर्चित संप-आंदोलनानंतर सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याचे तत्त्वत: मान्य केले आहे.

१५२ कोटींची थकबाकी : अल्प व अत्यल्प भूधारकांच्या नवीन कर्जाचा मार्ग होणार मोकळालोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांच्या बहुचर्चित संप-आंदोलनानंतर सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याचे तत्त्वत: मान्य केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २९ हजार ५९७ शेतकऱ्यांकडे असलेले १५२ कोटी ४ लाख रुपयांचे थकीत कर्ज माफ होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यात अल्पभूधारकांना तातडीने कर्जमाफीचा लाभ देण्याचे जाहीर करण्यात आले असले तरी सोमवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत त्याबाबतचा आदेश बँकांकडे पोहोचलेला नव्हता. खरीप हंगामाला सुरूवात झाल्यामुळे आणि पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र जुन्या थकित कर्जामुळे नवीन हंगामासाठी कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी वैतागले होते. आता अल्प व अत्यल्पभूधारकांना ही कर्जमाफी लगेच लागू करण्याचे जाहीर झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.मार्च २०१७ पर्यंतच्या थकित कर्जाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास जिल्ह्यात सर्वाधिक २१ हजार २२१ शेतकरी ५० हजारापर्यंत कर्ज थकित असणारे आहेत. १ लाखापर्यंत कर्ज थकित असणारे ७ हजार १६७ शेतकरी, तर १ लाख ५० हजारापर्यंत कर्ज थकबाकी असणारे १ हजार २०९ शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना सर्वाधिक कृषी कर्ज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वाटप केले आहे. त्यामुळे या बँकेची थकबाकी सर्वाधिक ४८.७० कोटी रुपये आहे. त्या खालोखाल स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कृषी कर्जाची थकबाकी ४५.६९ कोटी आहे. इतर राष्ट्रीयकृत बँकांचे कर्जवाटप आणि थकबाकीही कमी आहे.एकूण थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये अत्यल्पभूधारक शेतकरी १० हजार ५५३ असून त्यांच्याकडे २९ कोटी ५ लाखांची थकबाकी आहे. अल्पभूधारक शेतकरी ११ हजार ४६२ आहे. त्यांच्याकडे ५५ कोटी ४३ लाखांची थकबाकी आहे, तर इतर मोठे शेतकरी ७५८४ असून त्यांच्याकडे ६७ कोटी ५६ लाखांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर आता कर्जमाफी होणारच असा विश्वास अनेकांना होता. पण सरकार आढेवेढे घेत असल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. आता एकदाची कर्जमाफी जाहीर केल्यामुळे पुढची प्रक्रियाही लवकरात लवकर करावी आणि नव्याने कर्ज देऊन खरीप हंगामाची सोय करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे ८४.४८ कोटींची थकबाकीजिल्ह्यात मार्च २०१७ पर्यंत कर्ज थकबाकी असणारे अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी २२ हजार १३ आहेत. त्यांच्याकडे ८४.४८ कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी तातडीने माफ केली जाणार असल्याचे घोषणा झाल्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. शासनाचा आदेश पोहोचताच या शेतकऱ्यांंना ‘नो ड्यू’ प्रमाणपत्र मिळण्याचा आणि नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शेतकऱ्यांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन बँकांनी योग्य व्यवस्था करणे गरजेचे आहे.आंदोलने शांतराज्यात शेतकऱ्यांचा संप तीव्र होत असताना सुरूवातीचे चार दिवस गडचिरोली जिल्ह्यात या संपाचा कोणताही परिणाम दिसत नव्हता. त्यानंतर शिवसेनेने दररोज एका-एका तालुक्यात रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यानंतर काँग्रेस पक्षानेही अधिकाऱ्यांना निवेदने देऊन संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत या आंदोलनात आपले अस्तित्व दाखविले नाही. कर्जमाफीची घोषणा होत नसल्याचे पाहून काँग्रेसने रस्त्यावरून उतरून आंदोलन करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र त्यांना ती संधी मिळालीच नाही. रविवारी कर्जमाफीच्या निर्णयानंतर सर्वांचीच आंदोलने शांत झाली. त्यातच दोन दिवसांपासून पावसाचे आगमन होत असल्याने आंदोलनापाठोपाठ वातावरणही थंड झाले आहे.