शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

२८४ किमीचे रस्ते होणार तयार

By admin | Updated: April 8, 2016 01:07 IST

राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत २०१५-१६ मध्ये ७९.९० व २०१६-१७ मध्ये २१३.८६ किमीचे रस्ते बांधले जाणार आहेत.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना : तालुकानिहाय दोन वर्षांच्या नियोजन आराखड्यास शासनाची मंजुरीगडचिरोली : राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत २०१५-१६ मध्ये ७९.९० व २०१६-१७ मध्ये २१३.८६ किमीचे रस्ते बांधले जाणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना कार्यालयाने याचे नियोजन केले आहे. या नियोजनात दुर्गम भागातील रस्त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. या नियोजनाला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे निर्माण होण्यास मदत होणार आहे. रस्त्यांचे महत्त्व ओळखून तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान ग्रामीण सडक योजना सुरू केली. या योजनेंतर्गत देशभरात लाखो किमीचे रस्ते बांधण्यात आले. मात्र या योजनेसाठी केंद्र शासनाने आता निधी देणे बंद केले आहे. त्यामुळे राज्य शासनाने याच योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली आहे. जो भाग रस्त्यांनी जोडला गेला नाही, अशा भागात रस्ते तयार करण्यावर विशेष प्राधान्य दिले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावे अजूनपर्यंत बारमाही रस्त्यांनी जोडण्यात आली नाही. त्यामुळे या योजनेत गडचिरोली जिल्ह्यासाठी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त किमीचे रस्ते मंजूर केले आहेत. २०१५-१६ मध्ये ७८ व २०१६-१७ मध्ये २०३ किमीचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री सडक योजना कार्यालयाने २०१५-१६ मध्ये ७९.९० व २०१६-१७ मध्ये २१३.८६ किमीचे रस्ते तयार करण्याबाबत तालुकानिहाय नियोजन केले आहे. या नियोजनाला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री सडक योजना पाच वर्ष राबविली जाणार असून त्याचे उद्दिष्टही आताच निश्चित केले आहे. (नगर प्रतिनिधी)लवकरच कामाला सुरुवातमुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. आजपर्यंत निधी नसल्याने नियोजन पूर्ण होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नव्हती. मात्र निधीची तरतूद झाल्याने दोन्ही वर्षांच्या कामाचे एकत्रित टेंडर काढले जाणार आहे. त्यामुळे सदर रस्त्यांची कामे एक महिन्यात सुरु होणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या रस्त्यांना जोडणारप्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ते तयार करताना जास्तीत जास्त गावे जोडण्यासाठी कोअर नेटवर्क तयार करण्यात आले होते. मात्र प्रधानमंत्री ग्राम सडक योजना बंद पडल्याने हे नेटवर्क अपुरे राहिले होते. त्यामुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेवर झालेला खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आता हे कोअर नेटवर्क पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे संबंधित गावे एकमेकांशी जोडण्यास फार मोठी मदत झाली आहे.