शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

२७ व २८ ला राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 01:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार युवावर्गात रुजविण्यासोबतच त्यांच्या समाजकार्य व राष्ट्रकार्याची ओढ निर्माण करण्याच्या उद्देशाने येत्या २७ व २८ जानेवारीला पंधरावे राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन धानोरा तालुक्यातील मेंढा-लेखा येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आदर्श ग्राम पाटोदा (जि.औरंगाबाद)चे शिल्पकार भास्कर पेरे पाटील राहणार असल्याची माहिती संमेलनाचे प्रवर्तक ...

ठळक मुद्देभास्कर पेरे पाटील अध्यक्ष : शाळा-महाविद्यालयात जाणार प्रबोधन दिंडी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार युवावर्गात रुजविण्यासोबतच त्यांच्या समाजकार्य व राष्ट्रकार्याची ओढ निर्माण करण्याच्या उद्देशाने येत्या २७ व २८ जानेवारीला पंधरावे राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन धानोरा तालुक्यातील मेंढा-लेखा येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आदर्श ग्राम पाटोदा (जि.औरंगाबाद)चे शिल्पकार भास्कर पेरे पाटील राहणार असल्याची माहिती संमेलनाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन गोंडावाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही. कल्याणकर यांच्या हस्ते होणार आहे. दि. २७ ला ‘आम्ही विद्यार्थ्यांच्या दारी’ हा उपक्रम घेऊन गडचिरोली व धानोरा येथील शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रबोधन दिंडी काढली जाईल. या दिंडीत प्रबोधनकार म्हणून संमेलनाध्यक्ष भास्कर पेरे पाटील, मेंढा-लेखा या गावाला सर्वप्रथम वनहक्क मिळवून देणारे देवाजी तोफा, ज्येष्ठ प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरूळकर, चंदू पाटील मारकवार, डॉ. सतीश गोगुलवार, माजी संमेलनाध्यक्ष डॉ.कन्ना मडावी, प्रा.संजय नाथे, डॉ.शिवनाथ कुंभारे, संमेलनाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक, राष्ट्रीय प्रबोधनकार रवी मानव आदी सहभागी होतील.याच दिवशी रात्री इंजिनिअर भाऊ थुटे (वर्धा) यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे.दि.२८ ला मेंढा-लेखा येथील कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य गावगणराज्य साहित्य नगरीत संमेलनाचे रितसर उद्घाटन होणार आहे. यानंतर दुपारी १२ ते ४ दरम्यान दोन परिसंवाद, दुपारी ४ ते ५ दरम्यान देवाजी तोफा आणि भास्कर पेरे पाटील यांची प्रकट मुलाखत ज्ञानेश्वर रक्षक आणि रवी मानव घेतील. सायंकाळी मनोरंजनातून प्रबोधनपर कार्यक्रम सादर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या पत्रपरिषदेला डॉ.शिवनाथ कुंभारे, पंडीतराव मुडके, सुखदेव वेठे, रवी मानव, छाया मानव आदी गुरूदेवसेवक उपस्थित होते.विशेष पुरस्कारगडचिरोली येथील डॉ. शिवनाथ कुंभारे, अड्याळ टेकडी येथील तेजराम बगमारे व चंद्रपूर जिल्ह्यातील ग्यानीवंत घोडमारे यांना राष्टÑसंत तुकडोजी महाराज सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती आयोजकांनी यावेळी दिली.भपकेबाजपणाला देणार फाटाहे राष्टÑसंत विचार साहित्य संमेलन भपकेबाजपणाला फाटा देत अगदी नैसर्गिक वातावरणात, खर्चिक बाबींना फाटा देत होणार आहे. संमेलनाचा मंचही गावातील झाडाखालच्या ओट्यावर राहणार आहे. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय होणाऱ्या या संमेलनातील श्रोते खुर्च्या, खाटा अशा कोणत्याही साधनांचा उपयोग करू शकतात. केवळ श्रोत्यांनी विचारांचे ग्रहण करून चिंतन करावे एवढीच आमची अपेक्षा असल्याचे आयोजकांनी सांगितले. या संमेलनाला इतर राज्यातीलही गुरूदेव सेवाश्रमाचे प्रतिनिधी येणार आहेत.