शहरं
Join us  
Trending Stories
1
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
2
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
3
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
4
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
5
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
6
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
7
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
8
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
9
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
10
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
11
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
12
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
13
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
14
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
15
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
16
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
17
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
18
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
19
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
20
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
Daily Top 2Weekly Top 5

२६७ शाळांवर गंडांतर?

By admin | Updated: February 27, 2016 01:48 IST

शिक्षणावर होणार खर्च कमी करण्याबरोबरच दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून त्याऐवजी समूह शाळा स्थापन करण्याचा विचार शासन करीत आहे.

समूह शाळा होणार स्थापन : २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळादिगांबर जवादे गडचिरोलीशिक्षणावर होणार खर्च कमी करण्याबरोबरच दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून त्याऐवजी समूह शाळा स्थापन करण्याचा विचार शासन करीत आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभागाने माहिती मागितली असून जिल्हाभरात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सुमारे २६७ शाळा आढळून आल्या आहेत. या शाळा बंद होण्याची भिती शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. गाव तिथे शाळा या धोरणांतर्गत राज्य शासनाने राज्यातील काही अपवादात्मक गावे वगळता प्रत्येक गावात पहिली ते चवथ्या वर्गापर्यंतची शाळा सुरू केली आहे. मागील १० वर्षात इंग्रजी माध्यमांच्या शाळा, आश्रमशाळा व खासगी व्यवस्थापनांच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या शाळांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. काही शाळांची पटसंख्या २० पेक्षाही कमी आहे. मात्र त्या ठिकाणी दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या वेतनावर वर्षाकाठी १० लाख रूपयांचा खर्च शासन करीत आहेत. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्यावर वर्षाकाठी सरासरी ५० हजार रूपये खर्च होत आहेत. हा खर्च एका नामांकीत इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटपेक्षाही कितीतरी पटीने अधिक आहे. तरीही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिजे त्या प्रमाणात नाही. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून त्याऐवजी जवळपासच्या मोठ्या गावामध्ये समूह शाळा स्थापन केली जाणार आहे. या समूह शाळेत सभोवतालच्या गावातील विद्यार्थी स्कूलबसच्या सहाय्याने आणले जाणार आहेत. स्कूलबसचा संपूर्ण खर्च शासन उचलणार आहे. समूह शाळेवर शिक्षण विभागाचे अधिकारी विशेष लक्ष ठेवू शकणार आहेत. त्यामुळे गुणवत्ता वाढण्यास मदत होईल, असा शासनाचा अंदाज आहे. त्याचबरोबर शिक्षकांच्या वेतनावर होणारा खर्च कमी होईल, असाही अंदाज शासनाकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचा अहवाल शिक्षण विभागाने मागितला आहे. गडचिरोली जिल्ह्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सुमारे २६७ शाळा असल्याचे आढळून आले आहे. या शाळा बंद करून शासन समूह शाळा स्थापण करणार आहे.