शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

२५० शाळांची वीज कापली

By admin | Updated: February 2, 2015 23:04 IST

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक मिळून एकूण १ हजार ५५७ शाळा आहे. वीज असलेल्या गावातील शाळांना इलेक्ट्रिक तर वीज नसलेल्या शाळांना

थकीत विद्युत बिलाचा तिढा कायमगडचिरोली : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक मिळून एकूण १ हजार ५५७ शाळा आहे. वीज असलेल्या गावातील शाळांना इलेक्ट्रिक तर वीज नसलेल्या शाळांना सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करून प्रकाशमान करण्यात आले. वीज वितरण कंपनीकडून विद्युतीकरण झालेल्या शाळांना विद्युत कनेक्शन देण्यात आले. मात्र थकीत विद्युत बिलामुळे वीज वितरण कंपनीने आतापर्यंत जिल्ह्यातील २५० हून अधिक शाळांचा विद्युत पुरवठा खंडित करून वीज कापली आहे. त्यामुळे या शाळांमध्ये विद्युतीकरणाशी निगडीत सारेच उपक्रम थंडबस्त्यात असल्याची माहिती उजेडात आली आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे शाळांचे विद्युत बिल भरण्यासाठी स्वतंत्र तरतूद नाही. त्यामुळे शाळांच्या मुख्याध्यापकांना वर्गखोल्यांच्या संख्येनुसार ५ ते १५ हजार रूपयांचा निधी दिला जातो. वर्षाकाठी मिळणाऱ्या या सादिल निधीतून विद्युत बिले भरावी लागतात. याशिवाय त्यातून शाळा दुरूस्ती, रंगरंगोटी आदी खर्च भागवावा लागतो. त्यामुळे मुख्याध्यापकांना वीज बिल भरताना शाळांच्या अडचणी येतात. पूर्वी शाळांचे विद्युत बिल प्रतिमहा ३०० ते ४०० रूपये येत असे. त्यामुळे ही बिले मुख्याध्यापक व शिक्षकांच्या आवाक्यात होती. मात्र आता वीज वितरण कंपनीकडून थकबाकीसह विद्युत बिल दिल्या जात आहेत. त्यामुळे अनेक शाळांना विद्युत बिल अदा करणे त्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. परिणामी वीज वितरण कंपनीने ठोस पाऊले उचलून थकीत विद्युत बिल असणाऱ्या शाळांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. वीज बिलाचा प्रश्न जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत वेळोवेळी उपस्थित होत असतो. मात्र शाळांचे बिल भरण्यासाठी विशेष तरतूद नसल्याने वीज कंपनीकडून वीज जोडणी खंडित केली जात आहे. त्यामुळे शाळांची विद्युत बिल भरण्यासाठी आता लोकप्रतिनिधींच पुढाकार घेऊन शासन स्तरावरून स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी होत आहे. विद्यार्थ्यांना संगणकाची गोडी लागावी, पटसंख्या वाढावी तसेच विद्यार्थी संगणक साक्षर व्हावे, यासाठी शासनाकडून जिल्हा परिषद शाळांमध्ये नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ई-लर्निंगसोबतच संगणक प्रयोगशाळांची काही शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपूर्वी सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या. या उपक्रमातून बहुतांश शाळांना संगणक पुरविण्यात आले आहेत. त्यासोबतच त्या-त्या शाळेतील वीज कनेक्शन देण्यात आले आहे. मात्र थकीत विद्युत बिलाचा प्रश्न बिकट झाल्यामुळे जिल्ह्यातील २५० हून अधिक शाळांची वीज कापण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांमधील संगणक धूळखात पडले आहेत. वीज पुरवठा सुरू न झाल्यास त्याचाही उपयोग विद्यार्थ्यांना होणार नाही. या परिस्थितीमुळे पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)