शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

२५० शाळा झाल्या डिजिटल

By admin | Updated: March 3, 2017 01:02 IST

शिक्षण विभागाच्या निर्देशानंतर गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २ हजार २३ शाळांपैकी सुमारे २५० शाळा फेब्रुवारी

लोकवर्गणीतून सहकार्य : मार्चपर्यंत सर्वच शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्टगडचिरोली : शिक्षण विभागाच्या निर्देशानंतर गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २ हजार २३ शाळांपैकी सुमारे २५० शाळा फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपर्यंत डिजिटल झाल्या आहेत. शाळांमध्ये अध्यापन करताना डिजिटल साधनांचा वापर झाल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयची गोडी वाढेल. त्याचबरोबर शिकताना त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होईल, असे शिक्षण तज्ज्ञांच्या लक्षात आल्यानंतर शाळांमध्ये अध्यापन करताना जास्तीत जास्त शैक्षणिक साधने व डिजिटल साधने यांचा वापर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले. जिल्ह्यातील सर्वच २ हजार २३ शाळा मार्चअखेरपर्यंत डिजिटल करण्याचे उद्दिष्ट जिल्हा शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने नोव्हेंबर महिन्यापासून नियोजन करण्यास सुरूवात केले. ग्रामपंचायतीची मदत, लोकवर्गणी यांच्या माध्यमातून शाळांनी निधी गोळा करीत जिल्हाभरातील २५० शाळा डिजिटल केल्या आहेत. शाळा डिजिटल करण्यासाठी संबंधित शाळेला एलईडी टीव्ही किंवा अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल, मॅग्नेफाईन ग्लास, मायक्रो कॉस्ट डिव्हाईस, प्रोजेक्टर आदी साधने खरेदी करावे लागतात. शाळेला डिजिटल करण्यासाठी किमान २५ हजार ते जास्तीत जास्त ८५ हजार रूपयांपर्यंतचा खर्च येतो. प्रत्येक वर्ग डिजिटल करण्याचे उद्दिष्ट असले तरी हे उद्दिष्ट एवढ्या लवकर साध्य करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम शाळेतील किमान एक वर्ग डिजिटल करण्याकडे विशेष भर दिला जात आहे. शाळा डिजिटल झाल्यास अध्यापनाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर डिजिटल साधनांचा वापर करून मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविता येणार असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमित राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची गळती कमी होण्यास मदत होईल, असा अंदाज शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळेला मोबाईल, मॅग्नेफाईन ग्लास व साऊंड वापरून शाळा डिजिटल करण्याची मूभा देण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत शाळा डिजिटल करण्याची प्रक्रिया गडचिरोली जिल्ह्यात अतिशय संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. तरीही गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता शाळा डिजिटल करण्याचे प्रयत्न निश्चितच वाखान्याजोगे आहेत. शाळा डिजिटल झाल्यामुळे शाळेचा दर्जा वाढून सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)जिल्हा परिषद शाळांनी असा उभारला निधीशिक्षण विभागाने शाळा डिजिटल करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना पत्र देऊन पाच टक्के पेसा निधी व १४ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीतून काही मदत शाळेला डिजिटल करण्यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार काही ग्रामपंचायतींनी शाळेला निधी उपलब्ध करून दिला आहे. सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून ५८ शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. यातील सर्वच शाळा उच्च प्राथमिक आहेत. प्रत्येक शाळेतील तीन वर्ग डिजिटल केले आहेत. यासाठी प्रत्येकी ८५ हजार रूपयांचा खर्च आला आहे.