शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

माडिया जमातीच्या २५० लाभार्थ्यांना मिळणार घरकूल

By admin | Updated: July 4, 2015 02:22 IST

आदिवासी समाजातील सर्वात दुर्गम भागात राहणाऱ्या माडिया जमातीसाठी आदिवासी विकास विभागाने यावर्षी २५० घरकूल मंजूर केले असून ...

गडचिरोली : आदिवासी समाजातील सर्वात दुर्गम भागात राहणाऱ्या माडिया जमातीसाठी आदिवासी विकास विभागाने यावर्षी २५० घरकूल मंजूर केले असून या घरकुलांचे बांधकाम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी अडीच कोटी रूपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी स्वतंत्र आदिवासी विकास विभाग स्थापन करून या विभागाच्या मार्फतीने शेकडो योजना राबविल्या जात आहेत. मात्र या योजनांचा लाभ आदिवासी समाजातील काही निवडक जमातींनाच मिळत आहे. आदिम जमाती मात्र या लाभापासून वंचित आहे. त्यामुळे त्यांचा अजुनही विकास झाला नसल्याचे दिसून आले आहे. अजुनही आदिम जमातीतील नागरिक झोपडीवजा घरामध्येच जीवन कंठत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात माडिया ही एकमेव आदिम जमात आहे. या जमातीसाठी यावर्षी २५० घरकूल मंजूर करण्यात आले आहेत. या घरकुलांचे बांधकाम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्रत्येक घरकुलासाठी एक लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया डीआरडीएसोबतच आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीनेही करण्यात येणार आहे. मागील वर्षी १६९ घरकूल मंजूर करण्यात आले होते. या घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. तर काही घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नवीन लाभार्थ्यांची निवड डीआरडीएकडे असलेल्या प्रतीक्षा यादीतून केली जाणार आहे. त्याव्यतिरिक्तच्या लाभार्थ्याने अर्ज केल्यास त्याचाही अर्ज स्वीकारला जाणार आहे. अधिकारी वर्गाकडून त्याच्या अर्जाची शहानिशा केल्यानंतरच घरकूल मंजूर केले जाणार आहे. घरकूल बांधकामासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे २ कोटी ५० लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. घरकूल लाभार्थ्यांची निवड लवकरच केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीने केले आहे.आदिवासीमध्ये मोडणाऱ्या आदिम जमाती या सर्वात मागास जमाती आहेत. या जमातीच्या विकासासाठी विशेष बाब म्हणून राज्य शासनाकडून विशेष योजना राबविल्या जातात. गडचिरोली जिल्ह्यात माडिया ही एकमेव आदिम जमात आहे. त्यामुळे या जमातीच्या नागरिकांसाठी घरकूल योजना राबविली जात असून याचा फायदा त्यांना देण्यात येणार आहे. घरकुलासाठी अर्ज करण्याची पध्दतया योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने त्याच्या ग्रामपंचायतीकडे या संदर्भातील अर्ज सादर करावा, अर्जासोबत पाणीपट्टीकर, विद्युत बिल, सातबारा, मालमत्ता नोंदणीपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्ड, सरपंच व तलाठ्याचा दाखला आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे जोडलेला अर्ज ग्रामपंचायतीच्या मार्फतीने पाठविता येणार आहे.