शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

दुकानदारांचे २४ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:27 IST

पर्लकोटा नदीला आलेल्या पुराचे पाणी भामरागड शहरात शिरले. यामुळे व्यापाऱ्यांचे २४ लाख रूपयांचे नुकसान झाले

तहसीलदारांना निवेदन : भामरागडातील पंचनामे करून तत्काळ मदत द्यालोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : पर्लकोटा नदीला आलेल्या पुराचे पाणी भामरागड शहरात शिरले. यामुळे व्यापाऱ्यांचे २४ लाख रूपयांचे नुकसान झाले असून तलाठ्यांमार्फत पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तहसीलदारांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून भामरागड शहरातील व्यापाऱ्यांनी केली आहे.पुराचे पाणी रात्रीच्या सुमारास भामरागड शहरात शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांना दुकानातील सामान काढण्यासह सवड मिळाली नाही. परिणामी दुकानातील सामान पुराच्या पाण्याने खराब झाले. प्रत्येक व्यापाऱ्याचा लाखो रूपयांचा नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून केली. पुरामुळे आशिफ रहिमतुल्ला सुफी यांचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. सुधाकर मोंडय्या ऐतावार सात लाख, हमीद सब्बरबेग मोगल यांचे दीड लाख, अकमक पठाण यांचे दीड लाख, सलीम बब्बू शेख यांचे एक लाख, करणसिंग मोहनसिंग राठोड यांचे एक लाख, राजकुमार अवस्ती एक लाख, सर्फराजअली रियाजअली सय्यद यांचे ५० हजार, बहादूर भिकाजी आत्राम यांचे दीड लाख, सुजीत जतीन डे यांचे दोन लाख, महेश येनप्रेड्डीवार यांचे अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहेत. दुकानातील बहुतांश माल पाण्याने भिजून नष्ट झाला आहे. इमारत, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर काही दिवस दुकानही बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळेही दुकानदारांचे नुकसान होणार आहे. तत्काळ मदतीची मागणी आहे.