शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

२३० बालकांना शस्त्रक्रियेमुळे नवजीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:21 IST

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या जिल्हाभरातील सुमारे २३० विद्यार्थ्यांवर अवघड शस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन सुकर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम : प्रत्यक्ष शाळेत जाऊन बालकांची केली जाते आरोग्य तपासणी

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या जिल्हाभरातील सुमारे २३० विद्यार्थ्यांवर अवघड शस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन सुकर करण्यात आले आहे.केंद्र शासनाने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम १ एप्रिल २०१३ पासून सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केली जाते. यासाठी गडचिरोली जिल्ह्यात सुमारे २४ पथक आहेत. यातील आश्रमशाळांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र चार पथक आहेत. अंगणवाडी व आश्रमशाळांची तासणी करण्यासाठी २० शालेय आरोग्य तपासणी पथक आहेत. गडचिरोली, अहेरी, एटापल्ली, धानोरा, आरमोरी, सिरोंचा, कुरखेडा, चामोर्शी या तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन पथक आहेत. प्रत्येक पथकात एक पुरूष वैद्यकीय अधिकारी, एक महिला वैद्यकीय अधिकारी, औषधी निर्माता व परिचारिका यांचा समावेश आहे. शालेय आरोग्य तपासणी पथकाला स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. पथकातील डॉ. प्रत्यक्ष शाळा, अंगणवाडीला भेट देऊन बालकांची तपासणी करतात. अंगणवाडींची तपासणी वर्षातून दोन वेळा केली जाते. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत जिल्हाभरातील २ हजार ३७८ अंगणवाड्या तपासण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यापैकी २ हजार २१४ अंगणवाड्यांमधील १ लाख ३९१ बालकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यापैकी ८३ हजार २२१ बालकांची तपासणी झाली. ठरविलेल्या उद्दिष्टाच्या तपासणी झालेल्या बालकांचे प्रमाण ८३ टक्के एवढे आहे. त्यापैकी १६ हजार ८०५ बालक साधारण आजाराने ग्रस्त असल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आॅक्टोबर ते मार्च या कालावधीत २ हजार ३८९ अंगणवाड्या तपासणीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५४६ अंगणवाड्यांमधील २३ हजार ६० विद्यार्थ्यांची तपासणी झाली. त्यापैकी ५ हजार ७५० बालकांवर उपचार झाले. आश्रमशाळा तपासणीसाठी स्वतंत्र चार पथक नेमण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १२५ आमश्रशाळांमध्ये ३२ हजार ९१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चालू कालावधीत १२ हजार ५४० विद्यार्थ्यांची तपासणी झाली असून यापैकी ३ हजार ९३५ विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले.या रोगांच्या बालकांवर झाल्या शस्त्रक्रियाएप्रिल ते डिसेंबर या कालावधीत २८ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्याचबरोबर ४४ अस्थीव्यंग, ८ हायड्रोसील, १ किडनीग्रस्त, ३४ हर्निया, ३ अपेंडिक्स, ५ दुभंगलेले ओट, ४५ तिरळेपणा व मोतीबिंदू असलेली बालके, ३५ नाक-कान-घसाग्रस्त व इतर ५७ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.सिरोंचा व भामरागडातील पथकात डॉक्टरच नाहीसिरोंचा येथे दोन आरोग्य पथक व भामरागड येथे एक आरोग्य पथक आहे. मात्र यातील एकाही आरोग्य पथकात डॉक्टर नाही. त्यामुळे या तालुक्यांमधील बालकांची तपासणी ठप्प पडली आहे. याच बरोबर जिल्हाभरातील २४ पथकांमधील १६ डॉक्टरची पदे, एक औषध निर्माता व एक परिचारिकेचे पद रिक्त आहे.२५ हजार विद्यार्थ्यांवर उपचारएप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत एकूण १ हजार ९६८ शाळांमधील १ लाख ८७ हजार २२ विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १ हजार २०८ शाळांमधील ९३ हजार ८७९ विद्यार्थ्यांची तपासणी झाली. २५ हजार ३०४ विद्यार्थी विविध आजारांनी ग्रस्त आढळल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले.