शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

२२२ घरांचे अवैध बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2017 00:46 IST

नगर परिषदेची परवानगी न घेताच गडचिरोली शहरात २२२ घरांचे बांधकाम सुरू असल्याचे नगर परिषदेच्या

अनधिकृत बांधकाम वाढले : नगर परिषदेच्या नोटीसला केराची टोपलीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर परिषदेची परवानगी न घेताच गडचिरोली शहरात २२२ घरांचे बांधकाम सुरू असल्याचे नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेदरम्यान दिसून आले आहे. संबंधितांना नगर परिषदेने नोटीस बजाविली असून नगर परिषदेची परवानगी घेण्यास बजावले आहे. नगर परिषदेच्या हद्दीत होणारे बांधकाम नियमानुसार व्हावे, यासाठी नगर परिषदेचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. त्यामुळे नगर परिषद क्षेत्रात होणाऱ्या प्रत्येक बांधकामासाठी नगर परिषदेची परवानगी घेणे आवश्यक आहे. घर बांधणाऱ्या संबंधित नागरिकाने नगर परिषदेकडे परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर नगर परिषदेचे पथक संबंधिताच्या जागेची पाहणी करून नियमानुसार घराचे बांधकाम असल्यास त्याला परवानगी देतात. यासाठी नगर परिषद ३ हजार ५०० रूपये ते १० हजार रूपयांपर्यंत विकास शुल्क आकारते. या माध्यमातून नगर परिषदेला उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते. मात्र काही नागरिक नियम धाब्यावर बसवून घराचे बांधकाम करतात. त्याचबरोबर विकास शुल्क वाचविण्याच्या उद्देशानेही नगर परिषदेकडून परवानगी घेत नाही. परवानगी न घेताच घराचे बांधकाम सुरू असल्याची बाब नगर परिषदेच्या लक्षात आल्यानंतर संबंधित पथक पाहणी करून घर मालकाला नोटीस बजावते. मात्र नोटीस बजावण्याच्या व्यतिरिक्त नगर परिषद काहीच करू शकत नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या नोटीसला न जुमानता अनेक नागरिक आपल्याच पध्दतीने घराचे बांधकाम पुढे रेटत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत. एकदा घर उभे झाल्यानंतर नगर परिषद पाडत नाही. ही बाब नागरिकांना माहित असल्याने नगर परिषदेचेही अवैध बांधकामावर वचक राहिले नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी गडचिरोली शहरात मागील काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात अवैध घरांचे बांधकाम होत असल्याचे दिसून आहे. काही नागरिक तर अगदी समोरच्या रस्त्यापर्यंत घराचे बांधकाम बांधकाम करीत आहेत. परवानगी न घेताच नगर परिषद क्षेत्रात बांधकाम करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.कारवाई कधी होणार?परवानगी न घेताच बांधकाम केले तरी नगर परिषद नोटीस बजाविण्याच्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. याची पक्की खात्री नागरिकांना झाली असल्याने शहरातील नागरिक नगर परिषदेची परवानगी न घेताच बांधकाम करीत आहेत. परिणामी गडचिरोली शहरात अवैध बांधकामाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. अवैध बांधकामामुळे नगर परिषद तसेच खासगी दोन व्यक्तींमध्येही भांडणे वाढली आहेत. काही नागरिक अगदी रस्त्यापर्यंत इमारतीचे बांधकाम करतात. त्यानंतर त्या ठिकाणावरून नाली दुसऱ्या बाजुने वळविल्याशिवाय पर्याय राहत नाही. अवैध बांधकाम रोखण्यासाठी नगर परिषदेची परवानगी आवश्यक करणे गरजेचे आहे.अतिक्रमणामुळे चिचाळा तलावाचे अस्तित्व धोक्यातआरमोरी मार्गावरील चिचाळा तलाव परिसरात काही नागरिकांनी अतिक्रमण करून घराचे बांधकाम केले. अगदी तलाव बुजवून त्यावर बांधकाम केले आहे. पावसाळ्यादरम्यान तलाव भरत असल्याने तलावाचे पाणी घरांमध्ये शिरून घरांना धोका निर्माण झाला आहे. तलावात बांधकाम करू नये, याबाबत नगर परिषदेने अनेकवेळा या ठिकाणच्या नागरिकांना नोटीस बजावून इशारा दिला आहे. मात्र नगर परिषदेच्या नोटीसला न जुमानता अतिक्रमणाचा विस्तार होत असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाही तर अतिक्रमणधारकांनी तलावामध्ये पाणी साठवू नये, असा सल्ला नगर परिषदेला देऊन स्वत:चे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. अतिक्रमणामुळे या तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अतिक्रमणधारकांच्या दबावाला बळी पडत नगर परिषदेने ओव्हरफ्लोचे पाणी बाहेर पडण्यासाठी पटवारी भवनाच्या समोर पाईप टाकून बांधकाम केले आहे.