शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

२१५ रोहित्रांमध्ये बिघाड

By admin | Updated: December 6, 2014 01:28 IST

जिल्ह्यातील रोहित्रांची वीज कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी देखभाल केली जात नसल्याने एप्रिल ते आॅक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील २१५ रोहित्रांमध्ये बिघाड निर्माण झाला होता.

गडचिरोली : जिल्ह्यातील रोहित्रांची वीज कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी देखभाल केली जात नसल्याने एप्रिल ते आॅक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील २१५ रोहित्रांमध्ये बिघाड निर्माण झाला होता. रोहीत्र (ट्रान्सफार्मर) बिघडल्यानंतर गावातील विद्युत पुरवठा किमान ८ ते १५ दिवस ठप्प राहत असल्याने गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागला आहे. मुख्य विद्युत लाईनच्या सहाय्याने गावापर्यंत विद्युत पुरवठा केला जातो. या मुख्य लाईनचा व्होल्टेज ४४० चा राहतो. या व्होल्टेजवर घरगुती उपकरणे जळण्याची शक्यता राहते. हे व्होल्टेज कमी करून २३० व्होल्टेजचा पुरवठा करण्यासाठी प्रत्येक गावाशेजारी विद्युत रोहीत्र बसविण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सद्यस्थितीत ४ हजार २५४ विद्युत रोहीत्र बसविण्यात आले आहेत. गावातील विद्युतचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी विद्युत रोहीत्र व्यवस्थित काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्युत रोहित्रांची वेळोवेळी देखभाल करणे या अंतर्गत एका विशिष्ट कालावधीनंतर त्यामध्ये असलेले तेल बदलविणे व विशिष्ट उपकरणे बदलविणे गरजेचे आहे. मात्र विद्युत कर्मचारी बऱ्याच वेळा विद्युत रोहित्रांची देखभाल करीत नाही. त्यामुळे विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड निर्माण होते. मुख्य लाईनमधून विद्युतचा पुरवठा ४४० व्होल्टपेक्षा अधिक झाल्यानेही विद्युत रोहीत्र जळण्याची अधिक शक्यता राहते. गडचिरोली जिल्ह्यात उद्योगांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे विद्युत दाब कमी-जास्त झाल्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी असले तरी देखभालीअभावी रोहित्र जळण्याचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी ग्रामीण व दुर्गम भागातील रोहित्रांची वेळोवेळी देखभाल घेत नसल्यानेच एप्रिल ते आॅक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे २१५ रोहित्रांमध्ये बिघाड निर्माण झाला. रोहित्रांमध्ये बिघाड आल्यावर गावातील वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प पडतो. रोहीत्र जळाल्यानंतर ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक याबद्दलची तक्रार करतात. मात्र वीज वितरण कंपनीचे कर्मचारी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन किमान १५ ते २० दिवस रोहीत्र दुरूस्त करीत नाही. परिणामी नागरिकांना अंधारातच कित्येक दिवस काढावे लागतात. पावसाळ्याच्या दिवसात रोहीत्र जळण्याचे प्रमाण सर्वाधिक राहत असून रस्त्यांअभावी रोहीत्र दुरूस्त करतानाही वीज कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या संख्येनुसार वीज कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या लोकसंख्येचे घनतेचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. ५ ते १० किमी अंतरावर एखादे खेडे असून त्यामध्ये केवळ १० ते २० च घरे आहेत. परिणामी वीज ग्राहकांची संख्याही कमी आहे. त्यामुळे एका वीज कर्मचाऱ्याकडे २० ते २५ किमी परिसरातील गावे सोपविली आहेत. एका कर्मचाऱ्याला किमान २५ ते ३० रोहित्रांच्या देखभालीचे काम करावे लागते. या सर्व परिस्थितीमुळे देखभालीकडे दुर्लक्ष होऊनरोहीत्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. (नगर प्रतिनिधी)