शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

२०४ मामा तलावांना मिळाली नवसंजीवनी

By admin | Updated: February 23, 2016 01:34 IST

जिल्ह्यात एकूण १ हजार ६०० मामा तलाव आहेत. यातील बहुतांश तलाव जुने असल्याने त्यांच्या पाळी फुटल्या

गडचिरोली : जिल्ह्यात एकूण १ हजार ६०० मामा तलाव आहेत. यातील बहुतांश तलाव जुने असल्याने त्यांच्या पाळी फुटल्या आहेत. त्याचबरोबर गाळ साचला असल्याने त्यांच्या दुरूस्तीचे काम रोहयोच्या माध्यमातून हाती घेण्यात आले. २००६ ते २०१५ या नऊ वर्षांच्या कालावधीत ४९६ मामा तलावांच्या दुरूस्तीला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी २०४ तलावांच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून ९२ तलावांचे काम प्रगतीपथावर आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. धानाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावात किमान दोन ते तीन मामा तलाव बांधण्यात आले आहेत. ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या तलावांची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे काही तलावांच्या पाळी फुटण्यास सुरुवात झाली. तर सातत्याने गाळ साचून मामा तलावांची पाणी साठवण क्षमता कमी झाली. त्यामुळे या तलावांच्या दुरूस्तीचे काम हाती घेणे आवश्यक होते. गडचिरोली जिल्ह्यातील ९० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे मामा तलावांची दुरूस्ती होणे अत्यंत गरजेचे होते. रोहयो विभागाच्या पुढाकारातून या मामा तलावांच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. २००६ ते २०१५ या कालावधीत रोहयो विभागाने सुमारे ४९६ मामा तलावांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. त्यातील २०४ कामे पूर्ण झाली आहेत. तर २९६ कामे सुरू आहेत. तलाव दुरूस्तीमुळे हजारो हेक्टरवरील धानपिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. (नगर प्रतिनिधी)३७० शेततळे बांधकामास मंजुरी४आकस्मिक स्थितीत शेतकऱ्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे खोदून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. रोहयो विभागाने जिल्हाभरात ३७० शेततळे बांधकामास मंजुरी दिली. त्यापैकी १४३ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. ७६ शेततळे अपूर्ण आहेत. तर १५० शेततळ्यांचे काम सेल्फवर घेण्यात आले आहे. शेततळ्यांमुळेही शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होत असल्याने शेतकरीवर्ग शेततळे खोदण्यास स्वत:हून तयार होत आहे.१ हजार ८२८ बोड्यांची झाली दुरूस्ती४धानाच्या पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात बोडींचाही सिंहाचा वाटा आहे. रोहयो विभागाच्या वतीने सुमारे ३ हजार ४०६ बोड्यांची दुरूस्ती करण्याच्या कामाला मंजुरी दिली. त्यापैकी १ हजार ८२८ बोड्यांची दुरूस्ती पूर्णपणे झाली आहे. ७२१ कामे अपूर्ण आहेत. तर ८५७ बोड्यांच्या दुरूस्तीच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात बोड्यांची संख्या १० हजारपेक्षा अधिक आहे. या सर्वच बोड्यांची पाणी साठवण क्षमता वाढल्यास येथील शेती सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे.