शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
4
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
5
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
6
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
7
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
8
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
9
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
10
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
11
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
12
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
13
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
14
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
15
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
16
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
17
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
18
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
19
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
20
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर

२००० ग्राहक वीज मीटरच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:14 IST

मागणीच्या तुलनेत महावितरणकडे कमी प्रमाणात मीटर उपलब्ध असल्याने मागील दोन महिन्यांपासून जवळपास दोन हजार वीज ग्राहकांचे अर्ज पडून आहेत. अनेकांनी डिमांड सुध्दा भरले आहे. मात्र वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले नाही.

ठळक मुद्देनागरिकांनी भरले डिमांड : दोन महिन्यांपासून अर्ज पडून

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागणीच्या तुलनेत महावितरणकडे कमी प्रमाणात मीटर उपलब्ध असल्याने मागील दोन महिन्यांपासून जवळपास दोन हजार वीज ग्राहकांचे अर्ज पडून आहेत. अनेकांनी डिमांड सुध्दा भरले आहे. मात्र वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले नाही.वाढत चालल्या घरांच्या संख्येबरोबरच वीज जोडणीची मागणी सुध्दा वाढत चालली आहे. काही नागरिक घर बांधकामापूर्वीच वीज जोडणीसाठी अर्ज करतात. तर काही नागरिक घराचे बांधकाम झाल्यानंतर अर्ज करतात. मात्र महावितरणकडे अपवाद वगळता नेहमीच वीज मीटरचा तुटवडा राहतो. वर्षभरापूर्वी मागणी एवढे मीटर प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन महावितरणच्या वतीने देण्यात आले होते. मात्र हे आश्वासन अल्पावधीतच फोल ठरले आहे. दोन महिन्यांपासून अर्ज करूनही वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले नाही. ग्राहक महावितरणच्या कार्यालयात जाऊन वीज मीटरबाबत विचारणा करीत आहेत. आठ दिवसात मीटर उपलब्ध होतील, असे आश्वासन महावितरणच्या अभियंत्यांकडून दिले जात आहे. पुढचे आठ दिवस म्हणत आता दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र मीटरचा पत्ता नाही. काही नागरिकांनी नवीन घरात राहण्यास सुरूवात केली. मात्र वीज जोडणी झाली नसल्याने आता या नागरिकांचे हाल होत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन मागणी एवढे वीज मीटर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. शेतकऱ्यांचेही अनेक अर्ज महावितरणकडे प्रलंबित आहेत.ग्राम स्वराज्य योजनेचा सामान्य वीज ग्राहकांना फटकागडचिरोली जिल्ह्यात १ जूनपासून ग्राम स्वराज्य अभियान टप्पा २ राबविला जात आहे. या अभियानात वीज विभागाचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी ५४ गावांची निवड करण्यात आली आहे. या ५४ गावातील ज्या नागरिकांच्या घरी वीज पुरवठा झाला नाही. त्यांना ३१ जुलैच्या आत कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे महावितरणने सर्वसामान्य ग्राहकांना वीज मीटर देणे बंद करून उपलब्ध असलेले मीटर ग्रामस्वराज्य अभियानात निवडलेल्या लाभार्थ्यांना लावले जात आहेत. सदर काम अतिशय गतीने सुरू आहे. १ जून ते १८ जुलै या कालावधीत सुमारे ८९६ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ५१, देसाईगंज ३३, कुरखेडा ८९, कोरची ५८, चामोर्शी ४६, एटापल्ली ९०, भामरागड १८२ आलापल्ली १७६, सिरोंचा तालुक्यात १७१ वीज जोडण्या दिल्या आहेत.ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत वंचित घरांना वीज पुरवठा देण्याचे काम सुरू आहे. महावितरणकडे उपलब्ध मीटर या योजनेंतर्गत लावले जात आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांना मीटर मिळण्यास विलंब होत आहे. लवकरच पुरेसे मीटर उपलब्ध होतील व सामान्य ग्राहकांनाही वीज मीटर मिळतील.- अनिल बोरसे, अधीक्षक अभियंता,महावितरण गडचिरोली

टॅग्स :electricityवीज