शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

२००० ग्राहक वीज मीटरच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:14 IST

मागणीच्या तुलनेत महावितरणकडे कमी प्रमाणात मीटर उपलब्ध असल्याने मागील दोन महिन्यांपासून जवळपास दोन हजार वीज ग्राहकांचे अर्ज पडून आहेत. अनेकांनी डिमांड सुध्दा भरले आहे. मात्र वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले नाही.

ठळक मुद्देनागरिकांनी भरले डिमांड : दोन महिन्यांपासून अर्ज पडून

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागणीच्या तुलनेत महावितरणकडे कमी प्रमाणात मीटर उपलब्ध असल्याने मागील दोन महिन्यांपासून जवळपास दोन हजार वीज ग्राहकांचे अर्ज पडून आहेत. अनेकांनी डिमांड सुध्दा भरले आहे. मात्र वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले नाही.वाढत चालल्या घरांच्या संख्येबरोबरच वीज जोडणीची मागणी सुध्दा वाढत चालली आहे. काही नागरिक घर बांधकामापूर्वीच वीज जोडणीसाठी अर्ज करतात. तर काही नागरिक घराचे बांधकाम झाल्यानंतर अर्ज करतात. मात्र महावितरणकडे अपवाद वगळता नेहमीच वीज मीटरचा तुटवडा राहतो. वर्षभरापूर्वी मागणी एवढे मीटर प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन महावितरणच्या वतीने देण्यात आले होते. मात्र हे आश्वासन अल्पावधीतच फोल ठरले आहे. दोन महिन्यांपासून अर्ज करूनही वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले नाही. ग्राहक महावितरणच्या कार्यालयात जाऊन वीज मीटरबाबत विचारणा करीत आहेत. आठ दिवसात मीटर उपलब्ध होतील, असे आश्वासन महावितरणच्या अभियंत्यांकडून दिले जात आहे. पुढचे आठ दिवस म्हणत आता दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र मीटरचा पत्ता नाही. काही नागरिकांनी नवीन घरात राहण्यास सुरूवात केली. मात्र वीज जोडणी झाली नसल्याने आता या नागरिकांचे हाल होत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन मागणी एवढे वीज मीटर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. शेतकऱ्यांचेही अनेक अर्ज महावितरणकडे प्रलंबित आहेत.ग्राम स्वराज्य योजनेचा सामान्य वीज ग्राहकांना फटकागडचिरोली जिल्ह्यात १ जूनपासून ग्राम स्वराज्य अभियान टप्पा २ राबविला जात आहे. या अभियानात वीज विभागाचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी ५४ गावांची निवड करण्यात आली आहे. या ५४ गावातील ज्या नागरिकांच्या घरी वीज पुरवठा झाला नाही. त्यांना ३१ जुलैच्या आत कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे महावितरणने सर्वसामान्य ग्राहकांना वीज मीटर देणे बंद करून उपलब्ध असलेले मीटर ग्रामस्वराज्य अभियानात निवडलेल्या लाभार्थ्यांना लावले जात आहेत. सदर काम अतिशय गतीने सुरू आहे. १ जून ते १८ जुलै या कालावधीत सुमारे ८९६ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ५१, देसाईगंज ३३, कुरखेडा ८९, कोरची ५८, चामोर्शी ४६, एटापल्ली ९०, भामरागड १८२ आलापल्ली १७६, सिरोंचा तालुक्यात १७१ वीज जोडण्या दिल्या आहेत.ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत वंचित घरांना वीज पुरवठा देण्याचे काम सुरू आहे. महावितरणकडे उपलब्ध मीटर या योजनेंतर्गत लावले जात आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांना मीटर मिळण्यास विलंब होत आहे. लवकरच पुरेसे मीटर उपलब्ध होतील व सामान्य ग्राहकांनाही वीज मीटर मिळतील.- अनिल बोरसे, अधीक्षक अभियंता,महावितरण गडचिरोली

टॅग्स :electricityवीज