शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

२०० गावांचा संपर्क तुटला

By admin | Updated: July 11, 2016 01:14 IST

मागील तीन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे शनिवारी निर्माण झालेली पूर परिस्थिती रविवारीही कायम होती.

भामरागड शहर पाण्याखाली : दुसऱ्या दिवशीही पूरपरिस्थिती कायम; १० मार्ग बंदगडचिरोली : मागील तीन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे शनिवारी निर्माण झालेली पूर परिस्थिती रविवारीही कायम होती. जिल्ह्यातील जवळजवळ २०० गावांचा संपर्क अतिवृष्टीमुळे जिल्हा मुख्यालयाशी तुटलेलाच आहे. तर जवळजवळ १० ते १५ मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. अतिवृष्टीमुळे सिरोंचा तालुक्यात विठ्ठलरावपेठा येथे वीज पडून दोन म्हशी ठार झाल्या. गडचिरोली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे तसेच बाजूला असणाऱ्या गोसेखुर्द धरणातून विसर्ग चालू असल्याने सर्वच नद्या आणि नाल्यांची पाणी पातळी वाढत आहे. काही गावांना पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी देखील खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष ए. एस. आर नायक यांनी केले आहे.सर्व तहसीलदारांना रविवारी नदी आणी नाल्याजवळील गावांना भेट देउन बाधित होणा-या कुटुंबाना सतर्कतेचा इशारा द्यावा तसेच गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी हलवावे. जिवीत वा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहे. पुलावरून पाणी वाहते अशा ठिकाणी वाहतूक वेळीच बंद करण्यात यावी अशाही सुचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नायक यांनी दिली आहे.