शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

२० हजार टीसीएम पाणी साठा उपलब्ध

By admin | Updated: August 4, 2016 01:25 IST

भाजपप्रणित राज्य सरकारने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून महत्त्वकांक्षी योजना म्हणून हाती घेतलेल्या

जलयुक्त शिवारचे यश : तीन हजारांहून अधिक कामे पूर्ण; जलयुक्त गावे जाहीर होणार गडचिरोली : भाजपप्रणित राज्य सरकारने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून महत्त्वकांक्षी योजना म्हणून हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात १५२ गावात जलसंधारणाची तब्बल ३ हजार ४२३ कामे पूर्ण करण्यात आली. या कामातून एकूण २०५२६.४० टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला असून ९३५६.३४ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी व्यर्थ जाऊ नये, पावसाळ्यातील पाण्याचा अपव्यय टाळून पाणीसाठ्याची क्षमता अधिकाधिक वाढविणे, सिंचन क्षेत्र वाढविणे तसेच टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सन २०१५-१६ या वर्षात १५२ गावांची निवड करण्यात आली व अभियानाच्या आढाव्यात या गावांचा समावेश करण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी विभाग, जिल्हा परिषद (मनरेगा), वन विभाग, जि.प. सिंचाई, लघुसिंचन व पाटबंधारे चंद्रपूर विभागाच्या वतीने एकूण ३ हजार ४२३ कामे पूर्ण करण्यात आली. १६७ कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे. पूर्ण करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये मजगीचे ७९७, भात खाचर ९, माती नाला बांध ४३, माती नाला दुरूस्तीचे ३४, सिमेंट नाला बांध ५२, सिमेंट नाला बंधारा २२९, शेततळे ८४४, बोडी दुरूस्ती नुतनीकरणाचे ५४६, गाळ काढण्याची ९२, वन तलाव ४, खोदतळे ४०२, सीसीटी २२६, मामा तलाव दुरूस्तीचे ३८, गावतलाव दुरूस्तीचे ५, कालवे दुरूस्तीचे तीन कामे पूर्ण करण्यात आली. साठवण बंधारा दुरूस्तीचे २७, कोल्हापुरी बंधारा निर्मितीचे ४३, साठवण बंधारातून गाळ काढण्याबाबतचे ३६, मामा तलावातील गाळ काढण्याचे ६२, सिंचन विहीर निर्मितीचे ८१ कामे पूर्ण करण्यात आले. शेततळे व इतर कामातून गतवर्षी शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपीक घेतले. तसेच भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सिंचन सुविधा निर्माण झाल्याने पुढील वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी) निर्माण झालेला पाणीसाठा मजगीच्या ७९७ कामातून ६०१७.३५ टीसीएम, ४३ माती नाला बांधकामातून ५१६ टीसीएम, सिमेंट नाला बांधकामातून ७८० टीसीएम, ८४४ शेततळ्याच्या कामातून ३७०६.८५ टीसीएम, बोडी नुतनीकरणातून ५८९६.८० टीसीएम, खोदतळ्यातून १७६५.५८, मामा तलाव दुरूस्तीतून १९० टीसीएम, कोल्हापुरी बंधारा दुरूस्तीतून १३५ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून जलयुक्त शिवारच्या पूर्ण झालेल्या कामातून जिल्हाभरात ९३५६.३४ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात दुष्काळ स्थिती निर्माण होणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी ए. एस. आर. यांनी घेतला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे उपस्थित होते. यावेळी जलयुक्त शिवार अंतर्गत गतवर्षी १५२ गावात विविध कामे घेण्यात आली. यंदाही १६९ गावात जलसंधारणाची अनेक कामे होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनी दिली. जलयुक्त शिवार कामातून सिंचन क्षेत्र वाढले असून भूजल पातळी वाढत आहे. जलयुक्त शिवारमधून निर्माण झालेल्या पाणीसाठ्याची अद्यावत गणना करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नायक यांनी दिले.