शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

२० हजार टीसीएम पाणी साठा उपलब्ध

By admin | Updated: August 4, 2016 01:25 IST

भाजपप्रणित राज्य सरकारने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून महत्त्वकांक्षी योजना म्हणून हाती घेतलेल्या

जलयुक्त शिवारचे यश : तीन हजारांहून अधिक कामे पूर्ण; जलयुक्त गावे जाहीर होणार गडचिरोली : भाजपप्रणित राज्य सरकारने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून महत्त्वकांक्षी योजना म्हणून हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात १५२ गावात जलसंधारणाची तब्बल ३ हजार ४२३ कामे पूर्ण करण्यात आली. या कामातून एकूण २०५२६.४० टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला असून ९३५६.३४ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी व्यर्थ जाऊ नये, पावसाळ्यातील पाण्याचा अपव्यय टाळून पाणीसाठ्याची क्षमता अधिकाधिक वाढविणे, सिंचन क्षेत्र वाढविणे तसेच टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सन २०१५-१६ या वर्षात १५२ गावांची निवड करण्यात आली व अभियानाच्या आढाव्यात या गावांचा समावेश करण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी विभाग, जिल्हा परिषद (मनरेगा), वन विभाग, जि.प. सिंचाई, लघुसिंचन व पाटबंधारे चंद्रपूर विभागाच्या वतीने एकूण ३ हजार ४२३ कामे पूर्ण करण्यात आली. १६७ कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे. पूर्ण करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये मजगीचे ७९७, भात खाचर ९, माती नाला बांध ४३, माती नाला दुरूस्तीचे ३४, सिमेंट नाला बांध ५२, सिमेंट नाला बंधारा २२९, शेततळे ८४४, बोडी दुरूस्ती नुतनीकरणाचे ५४६, गाळ काढण्याची ९२, वन तलाव ४, खोदतळे ४०२, सीसीटी २२६, मामा तलाव दुरूस्तीचे ३८, गावतलाव दुरूस्तीचे ५, कालवे दुरूस्तीचे तीन कामे पूर्ण करण्यात आली. साठवण बंधारा दुरूस्तीचे २७, कोल्हापुरी बंधारा निर्मितीचे ४३, साठवण बंधारातून गाळ काढण्याबाबतचे ३६, मामा तलावातील गाळ काढण्याचे ६२, सिंचन विहीर निर्मितीचे ८१ कामे पूर्ण करण्यात आले. शेततळे व इतर कामातून गतवर्षी शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपीक घेतले. तसेच भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सिंचन सुविधा निर्माण झाल्याने पुढील वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी) निर्माण झालेला पाणीसाठा मजगीच्या ७९७ कामातून ६०१७.३५ टीसीएम, ४३ माती नाला बांधकामातून ५१६ टीसीएम, सिमेंट नाला बांधकामातून ७८० टीसीएम, ८४४ शेततळ्याच्या कामातून ३७०६.८५ टीसीएम, बोडी नुतनीकरणातून ५८९६.८० टीसीएम, खोदतळ्यातून १७६५.५८, मामा तलाव दुरूस्तीतून १९० टीसीएम, कोल्हापुरी बंधारा दुरूस्तीतून १३५ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून जलयुक्त शिवारच्या पूर्ण झालेल्या कामातून जिल्हाभरात ९३५६.३४ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात दुष्काळ स्थिती निर्माण होणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी ए. एस. आर. यांनी घेतला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे उपस्थित होते. यावेळी जलयुक्त शिवार अंतर्गत गतवर्षी १५२ गावात विविध कामे घेण्यात आली. यंदाही १६९ गावात जलसंधारणाची अनेक कामे होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनी दिली. जलयुक्त शिवार कामातून सिंचन क्षेत्र वाढले असून भूजल पातळी वाढत आहे. जलयुक्त शिवारमधून निर्माण झालेल्या पाणीसाठ्याची अद्यावत गणना करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नायक यांनी दिले.