शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२० पटाखालील शाळा बंद करणे घटनाविरोधी- येलेकर

By admin | Updated: September 18, 2015 01:19 IST

राज्य घटनेच्या ८६ व्या घटनेदुरूस्तीनुसार ६ ते १४ वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकांचा शिक्षण हा मुलभूत अधिकार आहे.

गडचिरोली : राज्य घटनेच्या ८६ व्या घटनेदुरूस्तीनुसार ६ ते १४ वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकांचा शिक्षण हा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे ६ ते १४ वर्ष वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. असे न झाल्यास कायद्याचे उल्लंघन ठरू शकते. सर्व प्रकारचे खर्च थांबवून मूलभूत अधिकारांवर खर्च करणे बंधनकारक आहे. परंतु २० पटाखालील शाळा २० पटापुढे कशा नेता येईल यावर उपाययोजना सोडून त्या बंद करण्याचा शासनाचा प्रयत्न हा घटनाविरोधी आहे, असा आरोप डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी केला आहे. २० पटाखालील शाळा जास्तीत जास्त स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत. येथे अत्याधुनिक सोयी- सुविधा पुरवून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशासाठी आकृष्ट करणे शासनाची जबाबदारी आहे. त्यानुसार सर्वप्रथम यावर खर्च करणे शासनाला आवश्यक आहे. खेड्यापाड्यातील शाळांमध्ये गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे २० पटाखालील शाळा सुरू ठेवणे शासनाची जबाबदारी आहे. पूर्व प्राथमिक शाळेचे तीन वर्ग प्राथमिक शाळांना जोडले तर प्राथमिक शाळांचे शिक्षक या वर्गाना शिकवू शकतील. पुढे प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत होईल. शासनाला शाळा बंद कराव्या लागणार नाही. उगाच पटसंख्येचे कारण पुढे करून शाळा बंद करण्याचे धोरण अवलंबणे घटनाविरोधी आहे, असा आरोप प्रा. येलेकर यांनी केला आहे.