शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

२० दिवसांत रुग्णसंख्या ६० टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:34 IST

शुक्रवारी १३ मृत्यूसह २०४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. त्या तुलनेत ३७९ कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत दररोज घट ...

शुक्रवारी १३ मृत्यूसह २०४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. त्या तुलनेत ३७९ कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत दररोज घट होताना दिसत आहे. नवीन बाधितांची संख्या कमी झालेली दिसत असली तरी त्यामागे चाचण्यांचे प्रमाण कमी होणे हेसुद्धा एक कारण आहे. कोरोनाच्या चाचण्या वाढल्यास कदाचित हे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २८ हजार ३६२ वर पोहोचला आहे. त्यापैकी २५ हजार ७६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १९३२ जण रुग्णालयात आणि गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

शुक्रवारच्या १३ मृतांमध्ये ४५ वर्षीय पुरुष आरदा, ता. सिंरोचा, ५० वर्षीय पुरुष गोंड मोहल्ला, ता. चामोर्शी, ८२ वर्षीय पुरुष विठ्ठलपूर, ता. चामोर्शी, ६७ वर्षीय पुरुष अंधारी, ता. कुरखेडा, ५० वर्षीय पुरुष मुरखडा चेक, ता. चामोर्शी, ७२ वर्षीय पुरुष दर्शनी चेक, ता. गडचिरोली, ६० वर्षीय पुरुष विवेकानंद नगर गडचिरोली, ७५ वर्षीय पुरुष आरमोठी, ता. आरमोरी, ४४ वर्षीय महिला नेताजीनगर, ता. चामोर्शी, ५७ वर्षीय पुरुष वडसा, ६२ वर्षीय महिला मुलचेरा, ७२ वर्षीय पुरुष इटखेडा, ता.अर्जुनी, जि. गोंदिया, ६० वर्षीय पुरुष रांजनगट्टा, ता. चामोर्शी यांचा समावेश आहे.

(बॉक्स)

असे आहेत नवीन बाधित व कोरोनामुक्त रुग्ण

- नवीन २०४ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ५३, अहेरी तालुक्यातील २६, भामरागड तालुक्यातील ४, चामोर्शी तालुक्यातील ३९, धानोरा तालुक्यातील ४, एटापल्ली तालुक्यातील ४, कोरची तालुक्यातील १, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये १०, मुलचेरा तालुक्यातील १४, सिरोंचा तालुक्यातील २६, तर देसाईगंज तालुक्यातील २३ जणांचा समावेश आहे.

- कोरोनामुक्त झालेल्या ३७९ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ९५, अहेरी ५२, आरमोरी १७, भामरागड ६, चामोर्शी ६४, धानोरा २१, एटापल्ली १३, मुलचेरा १४, सिरोंचा २०, कोरची ९, कुरखेडा १६ तसेच देसाईगंज येथील ५२ जणांचा समावेश आहे.

(बॉक्स)

आतापर्यंत कोरोनाचे ६७० बळी

गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपर्यंत, अर्थात डिसेंबर २०२० पर्यंत केवळ १०८ जणांच्या मृत्यूची नोंद होती. मात्र, गेल्या साडेचार महिन्यांत ५६२ मृत्यूची भर पडून हा आकडा ६७० वर पोहोचला आहे. यात २५ ते ३० टक्के रुग्ण दुसऱ्या जिल्ह्यातील असले तरी त्यांची नोंद गडचिरोलीत घेण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर २.३६ टक्के एवढा वाढला आहे.