शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
4
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
5
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
6
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
7
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
8
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
9
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
10
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
11
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
12
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
13
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
14
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
15
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
16
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
17
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
18
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
19
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
20
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

२० दिवसांत रुग्णसंख्या ६० टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:34 IST

शुक्रवारी १३ मृत्यूसह २०४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. त्या तुलनेत ३७९ कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत दररोज घट ...

शुक्रवारी १३ मृत्यूसह २०४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. त्या तुलनेत ३७९ कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत दररोज घट होताना दिसत आहे. नवीन बाधितांची संख्या कमी झालेली दिसत असली तरी त्यामागे चाचण्यांचे प्रमाण कमी होणे हेसुद्धा एक कारण आहे. कोरोनाच्या चाचण्या वाढल्यास कदाचित हे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २८ हजार ३६२ वर पोहोचला आहे. त्यापैकी २५ हजार ७६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १९३२ जण रुग्णालयात आणि गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

शुक्रवारच्या १३ मृतांमध्ये ४५ वर्षीय पुरुष आरदा, ता. सिंरोचा, ५० वर्षीय पुरुष गोंड मोहल्ला, ता. चामोर्शी, ८२ वर्षीय पुरुष विठ्ठलपूर, ता. चामोर्शी, ६७ वर्षीय पुरुष अंधारी, ता. कुरखेडा, ५० वर्षीय पुरुष मुरखडा चेक, ता. चामोर्शी, ७२ वर्षीय पुरुष दर्शनी चेक, ता. गडचिरोली, ६० वर्षीय पुरुष विवेकानंद नगर गडचिरोली, ७५ वर्षीय पुरुष आरमोठी, ता. आरमोरी, ४४ वर्षीय महिला नेताजीनगर, ता. चामोर्शी, ५७ वर्षीय पुरुष वडसा, ६२ वर्षीय महिला मुलचेरा, ७२ वर्षीय पुरुष इटखेडा, ता.अर्जुनी, जि. गोंदिया, ६० वर्षीय पुरुष रांजनगट्टा, ता. चामोर्शी यांचा समावेश आहे.

(बॉक्स)

असे आहेत नवीन बाधित व कोरोनामुक्त रुग्ण

- नवीन २०४ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ५३, अहेरी तालुक्यातील २६, भामरागड तालुक्यातील ४, चामोर्शी तालुक्यातील ३९, धानोरा तालुक्यातील ४, एटापल्ली तालुक्यातील ४, कोरची तालुक्यातील १, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये १०, मुलचेरा तालुक्यातील १४, सिरोंचा तालुक्यातील २६, तर देसाईगंज तालुक्यातील २३ जणांचा समावेश आहे.

- कोरोनामुक्त झालेल्या ३७९ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ९५, अहेरी ५२, आरमोरी १७, भामरागड ६, चामोर्शी ६४, धानोरा २१, एटापल्ली १३, मुलचेरा १४, सिरोंचा २०, कोरची ९, कुरखेडा १६ तसेच देसाईगंज येथील ५२ जणांचा समावेश आहे.

(बॉक्स)

आतापर्यंत कोरोनाचे ६७० बळी

गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपर्यंत, अर्थात डिसेंबर २०२० पर्यंत केवळ १०८ जणांच्या मृत्यूची नोंद होती. मात्र, गेल्या साडेचार महिन्यांत ५६२ मृत्यूची भर पडून हा आकडा ६७० वर पोहोचला आहे. यात २५ ते ३० टक्के रुग्ण दुसऱ्या जिल्ह्यातील असले तरी त्यांची नोंद गडचिरोलीत घेण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर २.३६ टक्के एवढा वाढला आहे.