शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

२० दिवसांत रुग्णसंख्या ६० टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:34 IST

शुक्रवारी १३ मृत्यूसह २०४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. त्या तुलनेत ३७९ कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत दररोज घट ...

शुक्रवारी १३ मृत्यूसह २०४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. त्या तुलनेत ३७९ कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत दररोज घट होताना दिसत आहे. नवीन बाधितांची संख्या कमी झालेली दिसत असली तरी त्यामागे चाचण्यांचे प्रमाण कमी होणे हेसुद्धा एक कारण आहे. कोरोनाच्या चाचण्या वाढल्यास कदाचित हे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २८ हजार ३६२ वर पोहोचला आहे. त्यापैकी २५ हजार ७६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १९३२ जण रुग्णालयात आणि गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

शुक्रवारच्या १३ मृतांमध्ये ४५ वर्षीय पुरुष आरदा, ता. सिंरोचा, ५० वर्षीय पुरुष गोंड मोहल्ला, ता. चामोर्शी, ८२ वर्षीय पुरुष विठ्ठलपूर, ता. चामोर्शी, ६७ वर्षीय पुरुष अंधारी, ता. कुरखेडा, ५० वर्षीय पुरुष मुरखडा चेक, ता. चामोर्शी, ७२ वर्षीय पुरुष दर्शनी चेक, ता. गडचिरोली, ६० वर्षीय पुरुष विवेकानंद नगर गडचिरोली, ७५ वर्षीय पुरुष आरमोठी, ता. आरमोरी, ४४ वर्षीय महिला नेताजीनगर, ता. चामोर्शी, ५७ वर्षीय पुरुष वडसा, ६२ वर्षीय महिला मुलचेरा, ७२ वर्षीय पुरुष इटखेडा, ता.अर्जुनी, जि. गोंदिया, ६० वर्षीय पुरुष रांजनगट्टा, ता. चामोर्शी यांचा समावेश आहे.

(बॉक्स)

असे आहेत नवीन बाधित व कोरोनामुक्त रुग्ण

- नवीन २०४ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ५३, अहेरी तालुक्यातील २६, भामरागड तालुक्यातील ४, चामोर्शी तालुक्यातील ३९, धानोरा तालुक्यातील ४, एटापल्ली तालुक्यातील ४, कोरची तालुक्यातील १, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये १०, मुलचेरा तालुक्यातील १४, सिरोंचा तालुक्यातील २६, तर देसाईगंज तालुक्यातील २३ जणांचा समावेश आहे.

- कोरोनामुक्त झालेल्या ३७९ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ९५, अहेरी ५२, आरमोरी १७, भामरागड ६, चामोर्शी ६४, धानोरा २१, एटापल्ली १३, मुलचेरा १४, सिरोंचा २०, कोरची ९, कुरखेडा १६ तसेच देसाईगंज येथील ५२ जणांचा समावेश आहे.

(बॉक्स)

आतापर्यंत कोरोनाचे ६७० बळी

गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपर्यंत, अर्थात डिसेंबर २०२० पर्यंत केवळ १०८ जणांच्या मृत्यूची नोंद होती. मात्र, गेल्या साडेचार महिन्यांत ५६२ मृत्यूची भर पडून हा आकडा ६७० वर पोहोचला आहे. यात २५ ते ३० टक्के रुग्ण दुसऱ्या जिल्ह्यातील असले तरी त्यांची नोंद गडचिरोलीत घेण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर २.३६ टक्के एवढा वाढला आहे.