शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रेल्वेला २ लाख ७० हजारांचा फटका

By admin | Updated: March 31, 2017 01:04 IST

दक्षिण पूर्व मध्यरेल्वे अंतर्गत गडचिरोली शहरात सुरू करण्यात आलेल्या रेल्वे आरक्षण केंद्राला सात दिवसांपासून लिंक फेलमुळे ...

सहा दिवसापासून लिंक फेल : गडचिरोलीतील आरक्षण केंद्रातील दोष बीएसएनएलला सापडला नाहीगडचिरोली : दक्षिण पूर्व मध्यरेल्वे अंतर्गत गडचिरोली शहरात सुरू करण्यात आलेल्या रेल्वे आरक्षण केंद्राला सात दिवसांपासून लिंक फेलमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. सहा दिवस उलटूनही भारत संचार निगमला येथील दोष अजूनही सापडलेला नसल्याने रेल्वे आरक्षण केंद्राचे काम पूर्णपणे ठप्प पडले आहे. मागील शुक्रवारपासून लिंक फेल झाली असून रेल्वे आरक्षण केंद्रावर तिकीट घेण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात वडसा देसाईगंज हे रेल्वे स्थानक असून गडचिरोली येथे तत्कालीन खासदार व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकारातून रेल्वे आरक्षण केंद्र नगर पालिका इमारतीच्या परिसरात सुरू करण्यात आले. सुरूवातीला सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार हे आरक्षण केंद्र सुरू राहत होते. त्यानंतर आता खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नामुळे या आरक्षण केंद्राचा वेळ एक तासाने वाढवून दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात आला आहे. या रेल्वे आरक्षण केंद्रावर जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिक आरक्षित तिकीट मिळविण्यासाठी येतात. दररोज रेल्वे आरक्षण केंद्राची उलाढाल ४० ते ४५ हजार रूपयांची आहे. मात्र आता उन्हाळ्याचा सिजन सुरू झाल्याने आरक्षण केंद्रावर दररोज गर्दी दिसून येत आहे. गेल्या शुक्रवारपासून रेल्वे आरक्षण केंद्रातील इंटरनेट सेवेत दोष निर्माण झाला असल्याने लिंक फेल झालेली आहे. येथील रेल्वे विभागाचे अधिकारी प्रशांत वैद्य यांनी लेखी व तोंडी स्वरूपात भारत संचार निगमच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविल्यानंतर दोन ते तीन दिवसाने दोष शोधण्याचे काम सुरू करण्यात आले. अजूनपर्यंत दोष सापडला नाही. बीएसएनएलचे पथक येथे बुधवारी काम करीत होते. परंतु त्यांना दोष मिळाला नाही. त्यामुळे मागील रविवार वगळता सहा दिवसात रेल्वे आरक्षण केंद्राला २ लाख ७० हजार रूपयांचा आर्थिक फटका बसला आहे. तत्काळ व सर्वसाधारण कोणतेच रिर्झवेशन लिंक फेल असल्याने मिळू शकत नाही. त्यामुळे रेल्वे आरक्षण केंद्राच्या अधिकाऱ्याचीही गोची झाली आहे. तिकीट घेण्यासाठी येणारे नागरिक केवळ चौकशी करून परत जात आहे. काहींना चंद्रपूर तर काहींना देसाईगंज येथे जाऊन तिकीट काढण्याची पाळी आली आहे. भारत संचार निगमने तत्काळ या आरक्षण केंद्रावरील लिंकचा दोष दूर करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)मागील शुक्रवारपासून रेल्वे आरक्षण केंद्रातील लिंक फेल झाली आहे. त्यामुळे कुठल्याच प्रकारचे आरक्षण तिकीट येथून निघत नाही. बीएसएनएलचे कर्मचारी दोष शोधण्यासाठी येऊन गेलेत. परंतु त्यांना दोष सापडला नाही. दररोज ४० ते ४५ हजार रूपयांच्या तिकीटा येथून काढल्या जातात. आता पूर्ण काम ठप्प झाले आहे. याबाबत आपण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहे. - प्रशांत वैद्य, अधिकारी, रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र गडचिरोली