शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

रेल्वेला २ लाख ७० हजारांचा फटका

By admin | Updated: March 31, 2017 01:04 IST

दक्षिण पूर्व मध्यरेल्वे अंतर्गत गडचिरोली शहरात सुरू करण्यात आलेल्या रेल्वे आरक्षण केंद्राला सात दिवसांपासून लिंक फेलमुळे ...

सहा दिवसापासून लिंक फेल : गडचिरोलीतील आरक्षण केंद्रातील दोष बीएसएनएलला सापडला नाहीगडचिरोली : दक्षिण पूर्व मध्यरेल्वे अंतर्गत गडचिरोली शहरात सुरू करण्यात आलेल्या रेल्वे आरक्षण केंद्राला सात दिवसांपासून लिंक फेलमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. सहा दिवस उलटूनही भारत संचार निगमला येथील दोष अजूनही सापडलेला नसल्याने रेल्वे आरक्षण केंद्राचे काम पूर्णपणे ठप्प पडले आहे. मागील शुक्रवारपासून लिंक फेल झाली असून रेल्वे आरक्षण केंद्रावर तिकीट घेण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात वडसा देसाईगंज हे रेल्वे स्थानक असून गडचिरोली येथे तत्कालीन खासदार व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकारातून रेल्वे आरक्षण केंद्र नगर पालिका इमारतीच्या परिसरात सुरू करण्यात आले. सुरूवातीला सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार हे आरक्षण केंद्र सुरू राहत होते. त्यानंतर आता खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नामुळे या आरक्षण केंद्राचा वेळ एक तासाने वाढवून दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात आला आहे. या रेल्वे आरक्षण केंद्रावर जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिक आरक्षित तिकीट मिळविण्यासाठी येतात. दररोज रेल्वे आरक्षण केंद्राची उलाढाल ४० ते ४५ हजार रूपयांची आहे. मात्र आता उन्हाळ्याचा सिजन सुरू झाल्याने आरक्षण केंद्रावर दररोज गर्दी दिसून येत आहे. गेल्या शुक्रवारपासून रेल्वे आरक्षण केंद्रातील इंटरनेट सेवेत दोष निर्माण झाला असल्याने लिंक फेल झालेली आहे. येथील रेल्वे विभागाचे अधिकारी प्रशांत वैद्य यांनी लेखी व तोंडी स्वरूपात भारत संचार निगमच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविल्यानंतर दोन ते तीन दिवसाने दोष शोधण्याचे काम सुरू करण्यात आले. अजूनपर्यंत दोष सापडला नाही. बीएसएनएलचे पथक येथे बुधवारी काम करीत होते. परंतु त्यांना दोष मिळाला नाही. त्यामुळे मागील रविवार वगळता सहा दिवसात रेल्वे आरक्षण केंद्राला २ लाख ७० हजार रूपयांचा आर्थिक फटका बसला आहे. तत्काळ व सर्वसाधारण कोणतेच रिर्झवेशन लिंक फेल असल्याने मिळू शकत नाही. त्यामुळे रेल्वे आरक्षण केंद्राच्या अधिकाऱ्याचीही गोची झाली आहे. तिकीट घेण्यासाठी येणारे नागरिक केवळ चौकशी करून परत जात आहे. काहींना चंद्रपूर तर काहींना देसाईगंज येथे जाऊन तिकीट काढण्याची पाळी आली आहे. भारत संचार निगमने तत्काळ या आरक्षण केंद्रावरील लिंकचा दोष दूर करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)मागील शुक्रवारपासून रेल्वे आरक्षण केंद्रातील लिंक फेल झाली आहे. त्यामुळे कुठल्याच प्रकारचे आरक्षण तिकीट येथून निघत नाही. बीएसएनएलचे कर्मचारी दोष शोधण्यासाठी येऊन गेलेत. परंतु त्यांना दोष सापडला नाही. दररोज ४० ते ४५ हजार रूपयांच्या तिकीटा येथून काढल्या जातात. आता पूर्ण काम ठप्प झाले आहे. याबाबत आपण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहे. - प्रशांत वैद्य, अधिकारी, रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र गडचिरोली