शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

१९९ कोटी पीक कर्ज वाटपाचे दिले उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST

कर्जासाठी शेतकऱ्यावर सावकाराच्या दारात उभे राहण्याची पाळी येऊ नये, यासाठी शासनाने पीक कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी सदर शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्ज भरणे आवश्यक आहे. बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने शेतकरी सुध्दा बँकांकडून कर्जाची मागणी करतात.

ठळक मुद्देबँकांना निर्देश : को-आॅपरेटीव्ह बँकेला सर्वाधिक टार्गेट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०२० च्या खरीप व रबी हंगामात जिल्हाभरातील ३३ हजार १५६ शेतकऱ्यांना १९९ कोटी १८ हजार रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.कर्जासाठी शेतकऱ्यावर सावकाराच्या दारात उभे राहण्याची पाळी येऊ नये, यासाठी शासनाने पीक कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी सदर शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्ज भरणे आवश्यक आहे. बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने शेतकरी सुध्दा बँकांकडून कर्जाची मागणी करतात. बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास सहजासहजी तयार होत नसल्याने प्रत्येक बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. २०२० च्या खरीप व रबी हंगामासाठी ३३ हजार १५६ शेतकऱ्यांना किमान १९९ कोटी १८ हजार रुपयांचे कर्ज वितरित करावे, असे निर्देश दिले आहेत. प्रत्येक बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. ठरवून दिलेल्या उद्दिष्टापर्यंत बँका कधीच कर्ज वाटप करीत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी किती कर्ज वाटप करतात, याकडे लक्ष लागले आहे.कर्ज वितरण प्रक्रियेला कोरोनाचा फटकाकोरोनामुळे बँकेत शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच केवळ पैसे काढणे व पैसे घेणे यावर मुख्य भर द्यावा, असे निर्देश राष्ट्रीयकृत बँकांच्या मध्यवर्ती कार्यालयांनी बँकांना दिले आहेत. त्यामुळे आजपर्यंत केवळ पैसे काढणे व पैसे भरणे एवढेच व्यवहार केले जात होते. आता खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी पीक कर्जासाठी अर्ज करण्याबाबत विचारणा करीत आहेत. मात्र आणखी काही दिवस थांबा, असा सल्ला बँकांकडून दिला जात आहे.मागील वर्षी ९६ कोटींचे कर्ज वितरणमागील वर्षी खरीप हंगामासाठी १५७ कोटी तर रबी हंगामासाठी २३ कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. खरीप हंगामासाठी ९५ कोटी ७६ लाख रुपयांचे कर्ज वितरण झाले. तर रबी हंगामासाठी केवळ २६ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. शेतकऱ्यांकडे आता सिंचनाची सुविधा झाल्याने अनेक शेतकरी उन्हाळ्यातही रबी हंगामाचे पीक घेतात. मात्र रबी हंगामासाठी कर्ज दिले जाते. याची अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. त्यामुळे ते कर्ज घेत नसल्याचे दिसून येते. काही शेतकरी खरीप पिकाची तोडणी झाल्यावर त्याच शेतात रबी पिकांची लागवड करतात.

टॅग्स :bankबँकCrop Loanपीक कर्ज