शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

जोगीसाखरा भागातील १९ मजूर कर्नाटकात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

मागील चार महिन्यांपूर्वी जोगीसाखरा, शंकरनगर येथील मजूर रोजगारासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी कर्नाटकात गेले. महाराष्ट्राच्या पुणे येथील राज ग्रुप कंट्रक्शन कंपनीमार्फत कर्नाटक राज्याच्या बिजापूर जिल्ह्यातील बागेवाडी तालुक्यातील कोलार येथे गेले. दरम्यान देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरला. आता संचारबंदीमुळे हे मजूर अडकून पडले आहेत.

ठळक मुद्देकोरोना संचारबंदीचा परिणाम : सीसी रस्त्याच्या कामासाठी गेले होते

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : भूमिगत नाली व सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामावर मजूर म्हणून आरमोरी तालुक्याच्या जोगीसाखरा परिसरातील १९ मजूर कर्नाटक राजाच्या बिजापूर तालुक्यातील कोलार येथे चार महिन्यापूर्वी गेले. सदर मजूर कोरोनाच्या संचारबंदीमुळे कर्नाटक राज्यात अडकले आहेत. त्यांच्याकडील जीवनावश्यक साहित्य संपले असून काम बंद झाल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे.महाराष्ट्र सरकारने सदर १९ मजुरांना मदत करावी, अशी मागणी अडकलेल्या मजुरांनी केली आहे. मागील चार महिन्यांपूर्वी जोगीसाखरा, शंकरनगर येथील मजूर रोजगारासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी कर्नाटकात गेले. महाराष्ट्राच्या पुणे येथील राज ग्रुप कंट्रक्शन कंपनीमार्फत कर्नाटक राज्याच्या बिजापूर जिल्ह्यातील बागेवाडी तालुक्यातील कोलार येथे गेले. दरम्यान देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरला. आता संचारबंदीमुळे हे मजूर अडकून पडले आहेत. त्यांच्याकडील जीवनावश्यक वस्तू व इतर साधन सामग्री पूर्णत: संपल्याने १९ मजुरांना कोलारचे पोलीस स्टेशन गाठले. आम्हाला महाराष्ट्र राज्यात जाण्याची परवानगी द्या, नाही तर भोजनाची व्यवस्था करा, अशी विनंती केली. मात्र त्यांना हवी तशी मदत मिळाली नाही. तसेच जाण्यासाठी परवानगी मिळाली नाही. अशी माहिती लोकमत प्रतिनिधीला दिली. देशभर संचारबंदी लागू झाली असून जिल्हा बंदी करण्यात आली आहे. गाव सोडून कर्नाटक राज्यातील कोलार शहरातील गेलेले १९ मजूर अडकून पडले. या मजुरांना सरकारने मदत करावी, अशी मागणी मजुरांनी केली आहे. अडकून पडलेल्या मजुरांमध्ये अनिल चौके, नितीन मानकर, विकास देवनाथ, देव्रत माझी, निखील सूर्यवशी, देवेंद्र राय, सुनिल माझी, पंकज सरकार, सचिन ठाकरे, रियाज शेख, अश्विन नेवारे, अजय मडावी, मुकेश माझी, त्रिलोक धोगडे, शूक्षय मंडल, सपन मुजुमदार, त्रिदेव मित्री, प्रदिप माटे, सुजल सरकार व दिनेश माझी आदींचा समावेश आहे.नेहरपायलीतील १४ मजूर अडकलेकुरखेडा तालुक्याच्या नेहरपायली या गावातील १४ मजूर मिरची तोडण्याच्या कामासाठी तेलंगणातील पिंजरमडगू गावात गेले. मात्र आता कोरोनामुळे संचारबंदी झाल्याने ते मजूर तेलंगणातच अडकून पडले आहेत. तेलंगणा राज्यातील खमम जिल्ह्याच्या कानपल्ली तालुक्यातील पिंजर मडगू गावात मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मिरची तोडण्यासाठी कुरखेडा तालुक्यातील मजूर या गावात रोजगारासाठी गेले. मात्र आता संचारबंदीने हे मजूर तेलंगणात अडकले आहेत. स्थानिकस्तरावर त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत.भेंडाळा परिसरातील नागरिकही दुसऱ्या राज्यातचामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा परिसरातील कान्होली, कळमगाव, एकोडी, सगणापूर, घारगाव, खोपुर्डी, रामाळा, दोटकुली, मोहुर्ली, फराडा, वाघोली, भेंडाळा, वेलतूर आदी गावातील मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्याकरिता गेले आहेत. कान्होली येथील जवळपास १०० नागरिक तेलंगणाच्या खमंग जिल्ह्यातील केसपल्ली येथे अडकले आहेत. परंतु संचारबंदी लागू असल्याने त्यांना स्वगावी येण्यासाठी अडचणी येत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसLabourकामगार