शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

१८८ कोटींचे कर्ज देणार

By admin | Updated: April 22, 2016 03:09 IST

खरीप हंगामात गतवर्षी २०१५ मध्ये ११२.२५ कोटी रूपयांचे पीक कर्ज वितरण करण्यात आले होते. त्या तुलनेत

गडचिरोली : खरीप हंगामात गतवर्षी २०१५ मध्ये ११२.२५ कोटी रूपयांचे पीक कर्ज वितरण करण्यात आले होते. त्या तुलनेत यावर्षी २०१६ मध्ये ११८ कोटींचे कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट खरीप आढावा बैठकीत निश्चित करण्यात आले. गुरूवारी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक पार पडली. त्या बैठकीत खरीप आढावा नियोजनावर चर्चा करण्यात आली.या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, जिल्हा कृषी अधीक्षक अनंत पोटे, कृषी अधिकारी राऊत आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी माहिती देताना सांगितले की, खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात २ लाख ३ हजार ९०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात भात १ लाख ८० हजार, तूर ८ हजार, सोयाबीन ३ हजार ५००, कापूस ८ हजार ५०० हेक्टरवर लावण्यात येणार आहे. भात हे प्रमुख पीक असल्याने २५ हजार ७४० क्विंटल बियाणे मागविण्यात येणार आहे. याशिवाय सोयाबीनचे २१००, तुरीचे २ हजार २५०, बीटी कापूस ६७.५० क्विंटल, मका १२५ क्विंटल असे एकूण २८ हजार २९६ क्विंटल बियाणे मागविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ४६ हजार ८०० मॅट्रिक टन खत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागणार आहे. यामध्ये युरिया २४ हजार २००, डीएपी ३८००, एसएसपी ९ हजार ७००, एमओपी ३ हजार, संयुक्त ७ हजार १०० मॅट्रिक टन लागतील, अशी माहिती त्यांनी दिली.यावेळी पालकमंत्र्यांनी राज्यात नव्याने सुरू झालेली पंतप्रधान पीक विमा योजना लागू झालेली आहे. सदर योजनेत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, पाऊस, थंडी, किड रोगाचा प्रादुर्भाव आदींमुळे पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनात घट आल्यास त्यास विमा संरक्षण दिले जाणार आहे. सदर योजनेमध्ये पेरणीपूर्व व काढणी पश्चात प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झाल्यास विमा सुरक्षेची तरतूद आहे, अशी माहिती देऊन या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घ्या, असे निर्देश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे या कार्यक्रमाचा आढावाही पालकमंत्र्यांनी घेतला.जलयुक्त शिवार अभियान ही चांगली योजना आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची माहिती त्यांच्या शेतापर्यंत जाऊन कृषी अधिकाऱ्यांनी पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)