शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

१८८ कोटींचे कर्ज देणार

By admin | Updated: April 22, 2016 03:09 IST

खरीप हंगामात गतवर्षी २०१५ मध्ये ११२.२५ कोटी रूपयांचे पीक कर्ज वितरण करण्यात आले होते. त्या तुलनेत

गडचिरोली : खरीप हंगामात गतवर्षी २०१५ मध्ये ११२.२५ कोटी रूपयांचे पीक कर्ज वितरण करण्यात आले होते. त्या तुलनेत यावर्षी २०१६ मध्ये ११८ कोटींचे कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट खरीप आढावा बैठकीत निश्चित करण्यात आले. गुरूवारी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक पार पडली. त्या बैठकीत खरीप आढावा नियोजनावर चर्चा करण्यात आली.या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, जिल्हा कृषी अधीक्षक अनंत पोटे, कृषी अधिकारी राऊत आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी माहिती देताना सांगितले की, खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात २ लाख ३ हजार ९०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात भात १ लाख ८० हजार, तूर ८ हजार, सोयाबीन ३ हजार ५००, कापूस ८ हजार ५०० हेक्टरवर लावण्यात येणार आहे. भात हे प्रमुख पीक असल्याने २५ हजार ७४० क्विंटल बियाणे मागविण्यात येणार आहे. याशिवाय सोयाबीनचे २१००, तुरीचे २ हजार २५०, बीटी कापूस ६७.५० क्विंटल, मका १२५ क्विंटल असे एकूण २८ हजार २९६ क्विंटल बियाणे मागविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ४६ हजार ८०० मॅट्रिक टन खत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागणार आहे. यामध्ये युरिया २४ हजार २००, डीएपी ३८००, एसएसपी ९ हजार ७००, एमओपी ३ हजार, संयुक्त ७ हजार १०० मॅट्रिक टन लागतील, अशी माहिती त्यांनी दिली.यावेळी पालकमंत्र्यांनी राज्यात नव्याने सुरू झालेली पंतप्रधान पीक विमा योजना लागू झालेली आहे. सदर योजनेत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, पाऊस, थंडी, किड रोगाचा प्रादुर्भाव आदींमुळे पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनात घट आल्यास त्यास विमा संरक्षण दिले जाणार आहे. सदर योजनेमध्ये पेरणीपूर्व व काढणी पश्चात प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झाल्यास विमा सुरक्षेची तरतूद आहे, अशी माहिती देऊन या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घ्या, असे निर्देश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे या कार्यक्रमाचा आढावाही पालकमंत्र्यांनी घेतला.जलयुक्त शिवार अभियान ही चांगली योजना आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची माहिती त्यांच्या शेतापर्यंत जाऊन कृषी अधिकाऱ्यांनी पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)