शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

घनकचरा प्रकल्पासाठी १.८३ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:30 IST

गडचिरोली शहरातून दररोज निघणाऱ्या घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी राज्य शासनाने सोमवारी (दि.२८) घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गदर्शक सूचनांमुळे नगर परिषदेला सध्याच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे स्वरूप थोडे बदलावे लागणार आहे. त्यासाठी १ कोटी ८३ लाख ९ हजार रुपयांच्या निधीस नगर विकास विभागाकडून मंजुरी मिळाली.

ठळक मुद्देनवीन उपकरणांची खरेदी : कचऱ्याचे जागीच करावे लागणार विलगीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरातून दररोज निघणाऱ्या घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी राज्य शासनाने सोमवारी (दि.२८) घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गदर्शक सूचनांमुळे नगर परिषदेला सध्याच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे स्वरूप थोडे बदलावे लागणार आहे. त्यासाठी १ कोटी ८३ लाख ९ हजार रुपयांच्या निधीस नगर विकास विभागाकडून मंजुरी मिळाली.गडचिरोली नगर परिषदेकडून सध्या नाल्यांची सफाई करून निघणाºया गाळाची तसेच कंटेनरमध्ये गोळा होणाऱ्या कचऱ्याची वाहतूक करून विलगीकरण करीत विल्हेवाट लावणे यासाठी वार्षिक २ कोटी २३ लाख रुपयांचे तीन कंत्राट देण्यात आले आहेत. त्यात घनकचऱ्याचे विलगीकरण खरपुंडी येथील ४.६८ हेक्टर जागेवरील केंद्रावर माणसांच्या हातून केले जाते. मात्र आता यांत्रिकी पद्धतीने हे विलगीकरण जागेवरच करावे लागणार असून त्यासाठी नगर परिषदेला यंत्रसामग्रीची खरेदी करावी लागणार आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत (नागरी) शहरे स्वच्छ करण्याचा एक भाग म्हणून हा घनकचरा प्रकल्प गडचिरोली शहरासाठी मंजूर झाला. १.८३ कोटींच्या या प्रकल्पासाठी ६४ लाख केंद्र शासनाकडून ४२ लाख राज्य शासनाकडून तसेच १४ व्या वित्त आयोगामधून ७६ लाख रुपये मिळणार आहेत. हा निधी दोन टप्प्यात मिळणार आहे.नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी प्रकल्प मंजूर झाल्यानंतर मूळ प्रकल्पाच्या किमतीमध्ये कोणत्याही कारणास्तव वाढ झाली तरी राज्य शासनामार्फत त्यासाठी कोणतेही वाढीव अनुदान उपलब्ध केले जाणार नाही. प्रथम हप्त्याचा निधी मिळाल्यानंतर निधीचे विहित नमुन्यातील उपयोगिता प्रमाणपत्र राज्य शासनास सादर केल्यानंतर दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित केला जाणार आहे.शहरात निर्माण होणाऱ्या संपूर्ण घनकचऱ्याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करून तो कचरा वेगवेगळा संकलित करणे अत्यावश्यक राहणार आहे. या विलगीकरण केलेल्या ओल्या कचºयावर केंद्रीत अथवा विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. सध्या गडचिरोलीत नगर परिषदेच्या वतीने ओल्या कचºयापासून गांढूळ खताची निर्मिती केली जात आहे.