शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

१८ हजार बालके कुपोषणग्रस्त

By admin | Updated: July 13, 2015 01:52 IST

जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कुपोषणाची समस्या अजूनही सुटली नसून या तालुक्यांमधील सुमारे १८ हजार १४२ बालके कुपोषणग्रस्त आहेत.

लोकमत विशेषगडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कुपोषणाची समस्या अजूनही सुटली नसून या तालुक्यांमधील सुमारे १८ हजार १४२ बालके कुपोषणग्रस्त आहेत. विशेष म्हणजे यातील तीन हजार ४५७ बालके अतिकुपोषित असल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग नक्षलग्रस्त आहे. या भागामध्ये आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या वतीने शेकडो योजना राबविण्यात येत असल्या तरी या योजनांचा प्रत्यक्ष लाभ जंगलाने वेढलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या आदिवासी समुदायातील नागरिकांना होत नाही. कित्येक महिने गावात आरोग्यसेवकच पोहोचत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ दुर्गम भागातील नागरिकांना मिळत नाही. कमकुवत आर्थिक परिस्थिती व जनजागृतीअभावी लहान मुलांना योग्य पोषण आहार उपलब्ध करून देताना अडचण निर्माण होत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मार्फतीने मे महिन्यात कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सुमारे १८ हजार १४२ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले. यातील ३ हजार ४५७ बालके अतिकुपोषित आढळून आले. एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, कोरची यासारख्या दुर्गम व नक्षलप्रभावीत तालुक्यांमध्ये सर्वाधिक कुपोषणाची समस्या असल्याचे दिसून येते. बहुतांश पालक अशिक्षित असल्याने बालकांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, त्यांना कोणत्या प्रकारचा पोषण आहार द्यावा, हे माहित नसल्याने कुपोषणाची समस्या तीव्र होते. गरोदर माताही योग्य आहार घेत नाही. त्यामुळे कुपोषणग्रस्त बालक जन्माला येते. कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्न करीत असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येत असला तरी कुपोषणाच्या प्रमाणाकडे नजर टाकली असता, हा दावा फोल असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)दुर्गम भागातील पालकांमध्ये जनजागृती करण्याची गरजगडचिरोली जिल्ह्यात निरक्षर नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या नागरिकांना लहान बालकाची काळजी कशी घ्यावी, त्याला कोणत्या प्रकारचा पोषण आहार द्यावा, हे माहीत नाही. गरोदरपणातील कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गरोदर मातांना पोषण आहार पुरविल्या जातो. मातेला पोषण आहार घेण्याबाबत मार्गदर्शनही केले जाते. गरोदरपणाच्या कालावधीत विश्रांती घेणे गरजेचे असतानाही बहुतांश माता नवव्या महिन्यापर्यंत कष्टाची कामे करतात. त्यामुळेही कुपोषणाची समस्या वाढते. प्रसूतीनंतर किमान सहा महिने बाळाला एक-एक तासाच्या कालावधीनंतर स्तनपान करणे गरजेचे असले तरी एकदा शेतावर गेलेली माता सायंकाळशिवाय परतत नाही. तोपर्यंत बाळाला दूध मिळत नाही. त्यामुळेही कुपोषणाची समस्या तीव्र होत चालली आहे. याबाबत जनजागृती करण्याबरोबरच त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधासुद्धा पुरविण्यात याव्या, अशी मागणी आहे.गडचिरोली जिल्ह्यात निरक्षर नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या नागरिकांना लहान बालकाची काळजी कशी घ्यावी, त्याला कोणत्या प्रकारचा पोषण आहार द्यावा, हे माहीत नाही. गरोदरपणातील कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गरोदर मातांना पोषण आहार पुरविल्या जातो. मातेला पोषण आहार घेण्याबाबत मार्गदर्शनही केले जाते. गरोदरपणाच्या कालावधीत विश्रांती घेणे गरजेचे असतानाही बहुतांश माता नवव्या महिन्यापर्यंत कष्टाची कामे करतात. त्यामुळेही कुपोषणाची समस्या वाढते. प्रसूतीनंतर किमान सहा महिने बाळाला एक-एक तासाच्या कालावधीनंतर स्तनपान करणे गरजेचे असले तरी एकदा शेतावर गेलेली माता सायंकाळशिवाय परतत नाही. तोपर्यंत बाळाला दूध मिळत नाही. त्यामुळेही कुपोषणाची समस्या तीव्र होत चालली आहे. याबाबत जनजागृती करण्याबरोबरच त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधासुद्धा पुरविण्यात याव्या, अशी मागणी आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मे महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार गडचिरोली जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या १८ हजार १४२ असल्याचे दर्शविण्यात आले असले तरी कुपोषित बालकांचा प्रत्यक्षात आकडा यापेक्षा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश लहान गावांमध्ये अजूनही अंगणवाडी केंद्र स्थापन करण्यात आले नाही. त्यामुळे तेथील बालक व गरोदर मातांना पोषण आहार मिळत नाही. त्याचबरोबर त्या गावातील कुपोषित बालकांची संख्याही आरोग्य विभागाला नेमकी माहीत पडत नाही.