शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार बालके कुपोषणग्रस्त

By admin | Updated: July 13, 2015 01:52 IST

जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कुपोषणाची समस्या अजूनही सुटली नसून या तालुक्यांमधील सुमारे १८ हजार १४२ बालके कुपोषणग्रस्त आहेत.

लोकमत विशेषगडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कुपोषणाची समस्या अजूनही सुटली नसून या तालुक्यांमधील सुमारे १८ हजार १४२ बालके कुपोषणग्रस्त आहेत. विशेष म्हणजे यातील तीन हजार ४५७ बालके अतिकुपोषित असल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग नक्षलग्रस्त आहे. या भागामध्ये आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या वतीने शेकडो योजना राबविण्यात येत असल्या तरी या योजनांचा प्रत्यक्ष लाभ जंगलाने वेढलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या आदिवासी समुदायातील नागरिकांना होत नाही. कित्येक महिने गावात आरोग्यसेवकच पोहोचत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ दुर्गम भागातील नागरिकांना मिळत नाही. कमकुवत आर्थिक परिस्थिती व जनजागृतीअभावी लहान मुलांना योग्य पोषण आहार उपलब्ध करून देताना अडचण निर्माण होत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मार्फतीने मे महिन्यात कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सुमारे १८ हजार १४२ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले. यातील ३ हजार ४५७ बालके अतिकुपोषित आढळून आले. एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, कोरची यासारख्या दुर्गम व नक्षलप्रभावीत तालुक्यांमध्ये सर्वाधिक कुपोषणाची समस्या असल्याचे दिसून येते. बहुतांश पालक अशिक्षित असल्याने बालकांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, त्यांना कोणत्या प्रकारचा पोषण आहार द्यावा, हे माहित नसल्याने कुपोषणाची समस्या तीव्र होते. गरोदर माताही योग्य आहार घेत नाही. त्यामुळे कुपोषणग्रस्त बालक जन्माला येते. कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्न करीत असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येत असला तरी कुपोषणाच्या प्रमाणाकडे नजर टाकली असता, हा दावा फोल असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)दुर्गम भागातील पालकांमध्ये जनजागृती करण्याची गरजगडचिरोली जिल्ह्यात निरक्षर नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या नागरिकांना लहान बालकाची काळजी कशी घ्यावी, त्याला कोणत्या प्रकारचा पोषण आहार द्यावा, हे माहीत नाही. गरोदरपणातील कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गरोदर मातांना पोषण आहार पुरविल्या जातो. मातेला पोषण आहार घेण्याबाबत मार्गदर्शनही केले जाते. गरोदरपणाच्या कालावधीत विश्रांती घेणे गरजेचे असतानाही बहुतांश माता नवव्या महिन्यापर्यंत कष्टाची कामे करतात. त्यामुळेही कुपोषणाची समस्या वाढते. प्रसूतीनंतर किमान सहा महिने बाळाला एक-एक तासाच्या कालावधीनंतर स्तनपान करणे गरजेचे असले तरी एकदा शेतावर गेलेली माता सायंकाळशिवाय परतत नाही. तोपर्यंत बाळाला दूध मिळत नाही. त्यामुळेही कुपोषणाची समस्या तीव्र होत चालली आहे. याबाबत जनजागृती करण्याबरोबरच त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधासुद्धा पुरविण्यात याव्या, अशी मागणी आहे.गडचिरोली जिल्ह्यात निरक्षर नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या नागरिकांना लहान बालकाची काळजी कशी घ्यावी, त्याला कोणत्या प्रकारचा पोषण आहार द्यावा, हे माहीत नाही. गरोदरपणातील कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गरोदर मातांना पोषण आहार पुरविल्या जातो. मातेला पोषण आहार घेण्याबाबत मार्गदर्शनही केले जाते. गरोदरपणाच्या कालावधीत विश्रांती घेणे गरजेचे असतानाही बहुतांश माता नवव्या महिन्यापर्यंत कष्टाची कामे करतात. त्यामुळेही कुपोषणाची समस्या वाढते. प्रसूतीनंतर किमान सहा महिने बाळाला एक-एक तासाच्या कालावधीनंतर स्तनपान करणे गरजेचे असले तरी एकदा शेतावर गेलेली माता सायंकाळशिवाय परतत नाही. तोपर्यंत बाळाला दूध मिळत नाही. त्यामुळेही कुपोषणाची समस्या तीव्र होत चालली आहे. याबाबत जनजागृती करण्याबरोबरच त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधासुद्धा पुरविण्यात याव्या, अशी मागणी आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मे महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार गडचिरोली जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या १८ हजार १४२ असल्याचे दर्शविण्यात आले असले तरी कुपोषित बालकांचा प्रत्यक्षात आकडा यापेक्षा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश लहान गावांमध्ये अजूनही अंगणवाडी केंद्र स्थापन करण्यात आले नाही. त्यामुळे तेथील बालक व गरोदर मातांना पोषण आहार मिळत नाही. त्याचबरोबर त्या गावातील कुपोषित बालकांची संख्याही आरोग्य विभागाला नेमकी माहीत पडत नाही.