शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

१७१ किमींच्या वीज वाहिन्यांची दुरूस्ती

By admin | Updated: July 17, 2015 01:41 IST

वीज तारा जमिनीकडे लोंबकळण्यामुळे त्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन स्पार्किंग होण्याची भीती राहते. त्याचबरोबर प्राणी किंवा मानवाचा स्पर्श होऊन अनुचित घटना घडण्याचीही शक्यता राहते. ...

तारांना दिला ताण : वीज महावितरणाची पावसाळ्याची तयारी; मुख्य लाईनकडे विशेष लक्षदिगांबर जवादे गडचिरोलीवीज तारा जमिनीकडे लोंबकळण्यामुळे त्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन स्पार्किंग होण्याची भीती राहते. त्याचबरोबर प्राणी किंवा मानवाचा स्पर्श होऊन अनुचित घटना घडण्याचीही शक्यता राहते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी गडचिरोली व आलापल्ली विभागातील सुमारे १७१ किलोमीटरच्या वीज वाहिन्यांना ताण देऊन त्या दुरूस्त करण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा ८० टक्के भूभाग घनदाट जंगलाने व्यापला आहे. या जंगलातूनच वीज वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात तारांवर झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना सर्वाधिक घडतात. परिणामी वीज कंपनीचा दुरूस्तीचा खर्च इतर जिल्ह्याच्या तुलनेत अधिक आहे. झाडांवर फांदी पडल्याने खांब वाकतात. त्याचबरोबर काही कालावधीनंतर तार आपोआप सैल होतो. तार खाली लोंबकळत राहते. दोन तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने स्पार्कींग होण्याची भीती राहते. स्पार्कींगमुळे आग लागते व विद्युत पुरवठाही खंडीत होतो. त्याचबरोबर विद्युततारा जमिनीकडे अधिकच लोंबकळल्यास प्राणी किंवा मानव यांचा स्पर्श होऊन जीव जाण्याचा धोकाही निर्माण होतो. हे सर्व धोके लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीच्या मार्फतीने पावसाळ्यापूर्वी वीज तारांना तान देणे सुरू केले आहे. मान्सूनपूर्वपर्यंत गडचिरोली विभागातील ११२ किमी व आलापल्ली विभागातील ५९ किमी असे एकूण १७१ किमीच्या ११ केव्ही वीज वाहिन्यांना तान देऊन त्या दुरूस्त करण्यात आल्या आहेत.विद्युत विभागाच्या मार्फतीने गडचिरोली जिल्ह्यात हजारो किमीचे विद्युत जाळे निर्माण करण्यात आले आहेत. वीज विभागाच्या मार्फतीने १७१ किमी वीज वाहिन्यांना तान देण्यात आले असले तरी शेकडो गावांमधील अजुनही अनेक खांबांवरील तार लोंबकळत असल्याचे दिसून येते. वीज विभागाचे कर्मचारी मुख्य लाईनकडे विशेष लक्ष देतात. मात्र दुर्गम भागातील वीज दुरूस्तीकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. महावितरणाने हे काम मार्गी लावणे गरजेचे आहे.ग्रामीण भागातील इन्सुलेटर व जंपर बदललेवीज खांबात विजेचा प्रवाह सुरू होऊ नये यासाठी इन्सुलेटर हे उपकरण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविते. इन्सुलेटर फुटल्यास वीज प्रवाह खंडीत होतो. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. जंगलात असलेल्या खांबावरील इन्सुलेटर फुटल्यास वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे इन्सुलेटरची दुरूस्ती करण्यास विशेष प्राधान्य दिल्या जाते. जूनअखेरपर्यंत गडचिरोली विभागातील ११९ तर आलापल्ली विभागातील १५६ इन्सुलेटर बदलवून ते नीट बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर १२९ ठिकाणचे जंपर बदलविण्यात आले आहेत. १० रोहित्रांमध्ये टाकले नवीन आॅईलगावाला वीज पुरवठा करण्यात रोहित्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविते. त्यामुळे रोहित्रामधील बिघाड गाववासीयांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन वीज विभागाने जिल्ह्यातील १० रोहित्रांची दुरूस्ती केली आहे. त्यामधील जुने आईल काढून त्या ठिकाणी नवीन आॅईल टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या रोहित्रामध्ये कमी आॅईल आहे, त्याही रोहित्रांमध्ये आॅईल टाकण्यात आले. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडीत होण्याच्या प्रकाराला आळा बसला आहे.११८ खाबांना ताणगडचिरोली विभागातील १४ व आलापल्ली विभागातील १०४ अशा एकूण ११८ खांबांना ताण देऊन ते सरळ करण्यात आले. वादळ वारा व तारांवर झाड कोसळण्यामुळे खांब वाकण्याच्या घटना घडतात. वाकलेल्या खांबांना तान देऊन दुरूस्त केले जाते.